शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

कर्जासाठी सहकारी संस्थांचा नकार

By admin | Updated: July 28, 2016 00:34 IST

शेतकऱ्यांनी हातात असलेल्या थोड्याफा पुंजीतून सहकारी सोसायटी व बँकेतून घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन केले अन् त्यानंतर नव्याने कर्ज देण्यास बँकेने नकार दिल्याने ...

बळीराजा संकटात : सावकारी पाशात अडकणार, तेलही गेले तुपही गेले अशी अवस्थाराहुल भुतांगे  तुमसरशेतकऱ्यांनी हातात असलेल्या थोड्याफा पुंजीतून सहकारी सोसायटी व बँकेतून घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन केले अन् त्यानंतर नव्याने कर्ज देण्यास बँकेने नकार दिल्याने हातची पुंजी घालवून नवी पुंजी मिळेनाशी न झाल्याने तालुक्याती शेतकऱ्यांची अवस्था ‘तेलही गेले अन् तुपही गेले’ अशीच झाली आहे.तुमसर तालुक्यातील आष्टी जि.प. क्षेत्राअंतर्गत विविध विकास सोसायटीच्या सभासदांनी कर्जाचे पुनर्गठन व पीक कर्जाची मुदतीत परत फेड केली तरी देखिल सहकारी सोसायटी व जिल्हा बँकेकडून कोणत्याही प्रकारचे वाटप शेतकऱ्यांना केले जात नाही. शासनाचा निधी नसल्याने कर्ज देता येत नसल्याचे शेतकऱ्यांना सांगून या बँकेतून त्या बँकेत पाठविणे सुरू आहे. ऐन खरिपाच्या हंगामात पुनर्गठन करूनही कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यासमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. गत हंगामात असलेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना शेतात कुठलेच पीक घेता आले नाही. त्यामुळे घेतलेले कर्ज थकित झाले. परंतू शासन या कर्जाचे ३० जून २०१६ ला बँकेने पुनर्गठन केले तर सोसायटीच्या सभासदानी पिक कर्ज भरले तर ज्यांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले त्यांना आणि ज्यांनी नियमित कर्जाच्या भरणा केला त्यांना पुन्हा नव्याने कर्जपुरवठा होणे गरजेचे आहे. मात्र या संदर्भात शेतकरी सोयायट्या व जिल्हा बँकेचे हेलपाट्या खात आहेत. अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीच्या उत्तराशिवाय शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. याउलट बँकेत पैसे नाही, शासन जेव्हा देईल तेव्हाच बँकेत या असे सांगून शेतकऱ्यांची बोळवण केल्या जात आहे. पिक कर्ज मिळाले नाही. मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे व शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्यायच उरणार नाही.