शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

कर्जासाठी सहकारी संस्थांचा नकार

By admin | Updated: July 28, 2016 00:34 IST

शेतकऱ्यांनी हातात असलेल्या थोड्याफा पुंजीतून सहकारी सोसायटी व बँकेतून घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन केले अन् त्यानंतर नव्याने कर्ज देण्यास बँकेने नकार दिल्याने ...

बळीराजा संकटात : सावकारी पाशात अडकणार, तेलही गेले तुपही गेले अशी अवस्थाराहुल भुतांगे  तुमसरशेतकऱ्यांनी हातात असलेल्या थोड्याफा पुंजीतून सहकारी सोसायटी व बँकेतून घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन केले अन् त्यानंतर नव्याने कर्ज देण्यास बँकेने नकार दिल्याने हातची पुंजी घालवून नवी पुंजी मिळेनाशी न झाल्याने तालुक्याती शेतकऱ्यांची अवस्था ‘तेलही गेले अन् तुपही गेले’ अशीच झाली आहे.तुमसर तालुक्यातील आष्टी जि.प. क्षेत्राअंतर्गत विविध विकास सोसायटीच्या सभासदांनी कर्जाचे पुनर्गठन व पीक कर्जाची मुदतीत परत फेड केली तरी देखिल सहकारी सोसायटी व जिल्हा बँकेकडून कोणत्याही प्रकारचे वाटप शेतकऱ्यांना केले जात नाही. शासनाचा निधी नसल्याने कर्ज देता येत नसल्याचे शेतकऱ्यांना सांगून या बँकेतून त्या बँकेत पाठविणे सुरू आहे. ऐन खरिपाच्या हंगामात पुनर्गठन करूनही कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यासमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. गत हंगामात असलेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना शेतात कुठलेच पीक घेता आले नाही. त्यामुळे घेतलेले कर्ज थकित झाले. परंतू शासन या कर्जाचे ३० जून २०१६ ला बँकेने पुनर्गठन केले तर सोसायटीच्या सभासदानी पिक कर्ज भरले तर ज्यांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले त्यांना आणि ज्यांनी नियमित कर्जाच्या भरणा केला त्यांना पुन्हा नव्याने कर्जपुरवठा होणे गरजेचे आहे. मात्र या संदर्भात शेतकरी सोयायट्या व जिल्हा बँकेचे हेलपाट्या खात आहेत. अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीच्या उत्तराशिवाय शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. याउलट बँकेत पैसे नाही, शासन जेव्हा देईल तेव्हाच बँकेत या असे सांगून शेतकऱ्यांची बोळवण केल्या जात आहे. पिक कर्ज मिळाले नाही. मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे व शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्यायच उरणार नाही.