शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
6
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
7
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
8
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
9
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
10
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
11
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
12
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
13
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
14
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
15
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
16
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
19
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
20
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?

गोसेखुर्द धरणावर प्रकल्पग्रस्तांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 06:00 IST

दुपारपासूनच भंडारा व नागपूर जिल्ह्यातील पाथरी, मेंढा, अर्जुनी, चिचखेडा, गोसीखुर्द, नवेगाव, बोथली, गाडेघाट, आंभोरा आदी गावातील प्रकल्पग्रस्त येत होते. दुपारी २ वाजता सर्व प्रकल्पग्रस्त येताच त्यांनी घोषणा, नारेबाजी करून गोसीखुर्द धरणाचा परिसर दणानून सोडला.

ठळक मुद्देघोषणांनी परिसर दणाणला : मागण्यांचे निवेदन दिले सरकारला

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : गोसीखुर्द धरणाच्या भूमिपुजनाला ३१ वर्ष होवूनही ना धरण पूर्ण झाले ना प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सुटल्या. अशा कैचीत सापडलेल्या गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांनी मोठ्या संख्येने धरणावर एकत्र येवून नागपूर येथील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काल गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने आयोजित केलेल्या विविध मागण्यांसाठी निदर्शने करून सरकारचे लक्ष वेधून घेतले.दुपारपासूनच भंडारा व नागपूर जिल्ह्यातील पाथरी, मेंढा, अर्जुनी, चिचखेडा, गोसीखुर्द, नवेगाव, बोथली, गाडेघाट, आंभोरा आदी गावातील प्रकल्पग्रस्त येत होते. दुपारी २ वाजता सर्व प्रकल्पग्रस्त येताच त्यांनी घोषणा, नारेबाजी करून गोसीखुर्द धरणाचा परिसर दणानून सोडला. प्रकल्पग्रस्त युवकांना रोजगार मिळालाच पाहिजे, मच्छीमार प्रकल्पग्रस्तांना धरणावर मासेमारीचा हक्क द्या, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे आदी घोषणा प्रकल्पग्रस्त देत होते. संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन करून त्यांच्या समस्या मांडल्या.गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे, पुनर्वसन स्थळी मुलभूत सुविधा मिळाव्या, प्रकल्पग्रस्तांना रोजगाराची साधने द्यावी, भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे अनेक कुटुंबांना दोन लाख ९० हजार रूपये वाटप केले नाही ते वाटप करावे, पाथरी व अनेक गावातील समस्या सोडवाव्या, धरणात मच्छीमार प्रकल्पग्रस्तांना मासेमारीचा हक्क मिळावा, भंडारा जिल्ह्यातील खापरी रेहपाडे व नागपूर जिल्ह्यातील टेकेपार, रूयाड आदी गावांचे पुनर्वसन व्हावे आदी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या होत्या.आंदोलनस्थळी दोन तासाचे पवनीचे नायब तहसीलदार मयूर चौधरी यांनी येवून मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासनाच्या नावाने प्रकल्पग्रस्तांनी दिलेले मागण्यांचे निवेदन स्विकारून सरकारला पाठविण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनावर प्रकल्पग्रस्तांनी आपले आंदोलन संपविले. आंदोलनाचे नेतृत्व संघर्ष समितीचे संयोजक विलास भोंगाडे यांनी केले. आंदोलनात धर्मराज भुरे, दादा आगरे, समीक्षा गणवीर, रमेश भेंडारकर, सीताराम रेहपाडे, गुलाब मेश्राम, सोमेश्वर भुरे, झिबल गणवीर, नामदेव तितिरमारे, किशोर समरीत, माणिक गेडाम, विनोद शेंडे आदींसह मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते. पवनी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प