शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांच्या मागण्यांबाबत भाकप व किसान सभेतर्फे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 23:40 IST

राज्य किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या देशव्यापी आवाहनानुसार १९ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकºयांच्या ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके व....

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांना निवेदन : समस्यांकडे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या देशव्यापी आवाहनानुसार १९ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकºयांच्या ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके व किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष सदानंद इलमे यांच्या नेतृत्वात निदर्शने आंदोलन करण्यात आले व निवासी उपजिल्हाधिकारी शैलेन्द्र मेश्राम यांना खालील १४ मागण्यांचे निवेदन देण्यात आले.जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, शेतकºयांना सरसकट कर्जमुक्ती द्या, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजवणी करा, धानासाठी आधारभूत किंमत तीन हजार रूपये जाहीर करा, ६० वर्षावरील शेतकरी, शेतमजूर व असंघटीत कामगारांना १० हजार रूपये पेंशन द्या, सिंचनाच्या पुरेशा सोयी उपलब्ध करा, टेकेपार उपसा सिंचन प्रकल्पाचे पाणी सोडा, लोडशेडिंग बंद करा व शेतीला २४ तास वीज पुरवठा करा, पेट्रोल व डिझेलचे भात कमी करून अर्ध्यावर आणा, एसटी बसची प्रस्तावित भाडेवाढ रद्द करा, वनरक्षक व महसुली कायद्या अंतर्गत जबरान जोतदार व अतिक्रमण धारकांना शेतीचे व घराचे पट्टे द्या तसेच गावठाण व शेतीच्या जागेवरील झुडपी जंगलाचे निर्वणीकरण करा, बेघर व भूमिहीन कुटुंबांना घरे व शेतीसाठी जमीन द्या आणि शहरी व ग्रामीण आवास घरकुल योजनेची अंमलबजावणी करा, गोसीखुर्द प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा वाढीव पॅकेजचा उर्वरित मोबदला मेंढावासीयांना देण्यात यावा, सुरेवाडा ता. भंडारा येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, नागरी सुविधा व भुखंडाच्या अनियमिततेची चौकशी करून योग्य कार्यवाही करा आदी मागण्यांची दखल घेवून त्याची माहिती पक्षाला देण्यात येईल, असे उपजिल्हाधिकाºयाने सांगितले. या निदर्शने आंदोलनात हिवराज उके, सदानंद इलमे, अरुण पडोळे, माणिकराव कुकउकर, गजानन पाचे, वसंत मुंडले, मोहनलाल शिंगाडे, गोपाल वैद्य, मंगेश माटे, ताराचंद आंबाघरे, दिलीप ढगे, आसाराम वैद्य, महोदव पेशवे, रमेश पंधरे, किसान सुर्यवंशी, देविदास कान्हेकर, प्रकाश उईके, विठोबा बोरसरे, चंद्रकुमार रामटेके, मिताराम उके, अभिमन साखरकर, अर्जून पाचे, गोपाल चोपकर, वामनराव चांदेवार आदी सहभागी होते.