शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, शिवसेनेतर्फे दानवेंचा निषेध

By admin | Updated: May 13, 2017 00:15 IST

असभ्य भाषा वापरून महाराष्ट्रासह देशातील शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा काँग्रेस तथा शिवसेनेने जाहीर निषेध केला.

ठिकठिकाणी आंदोलन: प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन, काँग्रेसने घेतली पत्रपरिषदलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : असभ्य भाषा वापरून महाराष्ट्रासह देशातील शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा काँग्रेस तथा शिवसेनेने जाहीर निषेध केला. शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला ठेस पोहचविणाऱ्या दानवेंच्या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. जिल्ह्यातील तालुका मुख्यालयासह ठिकठिकाणी निदर्शने करून दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यात भंडारा येथे काँग्रेसने दुपारच्या सुमारास निदर्शने करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. शिवसेनेने सातही तालुक्यात आंदोलने करुन शेतकऱ्यांवर प्रहार करणाऱ्या दानवेंचा जाहिर निषेध केला.शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले- शिवसेनाशिवसेनेचे जिल्हाध्यक्ष इंजि. राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात निदर्शने करीत दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन करण्यात आले. शेतकऱ्यांना उद्देशून केलेल्या दानवे यांचे वक्तव्य शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. येणाऱ्या काळात हेच शेतकरी त्यांना त्यांचा जागा दाखवेल.शेतकरी अन्नदाते असून आमचे दैवत आहे. दानवे यांच्यासारख्या विचारांचे नेते कृषी प्रधान देशात कलंक आहेत, अशी प्रतिक्रीया शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले यांनी दिली. तुमसर येथे झालेल्या आंदोलनात असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.चिचाळ : पवनी तालुका शिवसेना कार्यालयात पवनी तालुका प्रमुख राजु ब्राम्हणकर यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेऊन त्या दानवे यांचा तिव्र निषेध करण्यात आला. दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारुन सिंदपूर टि-पॉर्इंटवर रोष व्यक्त केला. यावेळी राजु ब्रम्हणकर, अड्याळ विभाग प्रमुख प्रकाश मानापुरे, जितू इखार, भोजराम वैद्ये, गिरधर कोहपरे, अमित गडपायले, श्रीधर वैद्ये, प्रविण वंजारी, परसराम बावणकर, श्रावण वंजारी व शिवसैनिक उपस्थित होते. तर एक लाखांचे बक्षीसभंडारा : राज्यासह देशातील शेतकऱ्यांना ‘साले’ या शब्दात हिणावणाऱ्या दानवे यांना कुणी जोडा मारल्यास त्यांला एक लक्ष रूपयांचे मी स्वत: बक्षीस देईन, अशी जाहीर घोषणा काँग्रेसचे नेते डॉ. अजय तुमसरे यांनी वार्ताहर परिषदेत केली. मात्र ही घोषणा पक्षाची नसून व्यक्तीगत असल्याचे तुमसरे यांनी स्पष्ट केले.काँग्रेसतर्फे दानवे यांना "साले" ही पदवी प्रदान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभेचे खासदार रावसाहेब दानवे यांनी जालना येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज्यातील शेतकऱ्यासाठी "साले" या शब्दाचा वापर केल्यासंदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यात काँग्रेसतर्फे शेतकऱ्यांच्या वतीने खासदार दानवे यांना अतिशय सन्मानपूर्वक "साले" ही पदवी प्रदान करण्यात आली. या आशयाची माहितीही विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसने निदर्शने करीत दानवे यांचा निषेध केला. वार्ताहर परिषदेत जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर म्हणाले, दानवे यांची भाषा संस्कृतीला शोभणारी नाही. भाजपा नेत्यांच्या डोक्यात सत्तेची नशा गेल्याने ते बेताल वक्तव्ये करीत आहेत. राज्यातला तूर उत्पादक शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत असून, त्या शेतक-यांची सगळी तूर खरेदी करून शेतक-यांना दिलासा देण्याऐवजी शेतक-यांना शिवीगाळ करीत आहेत. शेतकरी भाजप नेत्यांची ही नशा उतरवतील, असे प्रेमसागर गणवीर म्हणाले. शेतकऱ्यांना अश्या विशेषणांनी "सन्माना" ची नव्हे तर कर्जमाफी, उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देणारा हमीभाव आणि शेतमालाच्या शासकीय खरेदीची नितांत आवश्यकता आहे. दानवे यांनी शेतकऱ्यांना दिलेली "साले" ही पदवी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने विनम्रतापूर्वक साभार परत करीत आहोत. त्याऐवजी त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी, उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देणारा हमीभाव आणि शेतमालाच्या शासकीय खरेदीची तरतूद सरकारमार्फत करून द्यावी, अशी मागणी सुद्धा करण्यात आली. "साले" ही पदवी धारण करण्याची आपली पात्रता नाही, असा टोलाही यावेळी गणवीर यांनी लगावला. पत्रपरिषदेला जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, मधुकर लिचडे, विकास राऊत, डॉ. अजय तुमसरे, महेंद्र निंबार्ते, राजकपूर राऊत आदी उपस्थित होते. ४जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, प्रदेश महासचिव जिया पटेल, मधुकर लिचडे, विनायक बुरडे, महेंद्र निंबार्ते, शफी लद्दानी, राजकपूर राऊत, सुनील गिहेपुंजे, प्रभु मोहतुरे, माणिकराव ब्राह्मणकर, शंकर राऊत, भूमेश्वर महावाडे, नंदू समरीत, विकास राऊत, मनोहरराव उरकूडकर, प्यारेलाल वाघमारे, रमेश डोंगरे, नीलकंठ कायतें, प्रेम वणवे, विजय सावरबांधे, अशोक कापगते, अजय तुमसर, मुकुंद साखरकर, अनिक जमा पटेल, माणिक भेंडारकर, सचिन घनमारे, अमर रगडे, प्रकाश पचारे, नीरज गौर, गणेश निमजे, भूषण टेम्भूरने, मंगेश हुमने, जयश्री बोरकर, भावना शेंडे, होमराज कापगते, संजय पिकलमुंडे, अजय गौरकार, जनार्धन निंबार्ते, दिनेश बोन्द्रे, शर्मिल बोदेले, प्रा. मारबते, विलास मोथरकर यशवंत, प्रीती बगडे, ज्ञानेश्वर रहांगडाले, भारती लिमजे, शमीम पठाण, अंकुश वंजारी, अशपाक शेख, शुभम साठवणे, सचिन फाले, विवेक गायधने, शुभम वैद्य,शालिक भुरे, रवीकुमार येरखेडे, प्रवीण भोंदे, मुकुंद नाकजोडे, राजू सूर्यवंशी, सुनील बांते, परमेश वलके, इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.