शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

मागितले ४४ लाख, मिळाले १३.६८ लाख

By admin | Updated: February 4, 2015 23:08 IST

नैसर्गिक आपत्ती व शासकीय उदासीनतेत फसलेल्यांना जंगली श्वापदांच्या हल्ल्याचाही सामना करावा लागत आहे. जानेवारी २०१५ अखेरपर्यत जंगली श्वापदांच्या हल्ल्यात शेतपिक, पशुधन, मानव हानी,

अनुदान वाटपविषयी वनविभाग संभ्रमातदेवानंद नंदेश्वर - भंडारानैसर्गिक आपत्ती व शासकीय उदासीनतेत फसलेल्यांना जंगली श्वापदांच्या हल्ल्याचाही सामना करावा लागत आहे. जानेवारी २०१५ अखेरपर्यत जंगली श्वापदांच्या हल्ल्यात शेतपिक, पशुधन, मानव हानी, जखमी झालेल्या ६०४ जणांना अद्यापही मदतीची प्रतीक्षा कायम आहे. ६०४ जणांना अनुदान वाटपासाठी ४४ लाख रुपयांची गरज असताना केवळ १३ लाख ६८ हजारांचा अनुदान वनविभागाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे अनुदान वाटपविषयी वनविभागात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.जिल्ह्यात सातही तालुक्यात जंगलाचा काही भाग येत आहे. या जंगलातील श्वापदे अन्नाच्या शोधात येत लगतच्या शेतात धुडगूस घालतात. या श्वापदांकडून शेतातील कोणत्याही एका भागातील पिकाचे नुकसान होते. नुकसान करून पळून जाताना ही श्वापदे शेतातील पिकच तुडवत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात या श्वापदांनी एकूण १,५२० शेतकऱ्यांच्या शेतातील पीक उद्ध्वस्त केले. याची पाहणी वनविभागाच्यावतीने करण्यात आली असून ९७० शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तर ५५० शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना ३४ लाख रुपयांच्या अनुदानाची गरज आहे. या वन्य प्राण्यांनी केवळ शेतीचेच नाही तर शेतकऱ्यांच्या पशुधनावरही हल्ला चढविला आहे. त्यांनी जिल्ह्यात डिसेंबर २०१४ पर्यंत एकूण १११ जनावराची हानी झाली. तर ६२ व्यक्तींवर हल्ला केला आहे. यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या सर्व प्रकरणात वनविभागाच्यावतीने मदत देण्यात येत असली तरी या मदतीकरिता वनविभागाच्या कार्यालयात चकरा मारणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. अशात कधी नियमाची आडकाठी तर कधी अनुदान नसल्याचा रोडा असल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. फेब्रुवारी महिन्यात केवळ १३ लाख ६८ हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाल्यानंतर मदत वाटप करताना वनविभाग अधिकाऱ्यांना संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यावर शासनाच्यावतीेने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.