शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मागितले ४४ लाख, मिळाले १३.६८ लाख

By admin | Updated: February 4, 2015 23:08 IST

नैसर्गिक आपत्ती व शासकीय उदासीनतेत फसलेल्यांना जंगली श्वापदांच्या हल्ल्याचाही सामना करावा लागत आहे. जानेवारी २०१५ अखेरपर्यत जंगली श्वापदांच्या हल्ल्यात शेतपिक, पशुधन, मानव हानी,

अनुदान वाटपविषयी वनविभाग संभ्रमातदेवानंद नंदेश्वर - भंडारानैसर्गिक आपत्ती व शासकीय उदासीनतेत फसलेल्यांना जंगली श्वापदांच्या हल्ल्याचाही सामना करावा लागत आहे. जानेवारी २०१५ अखेरपर्यत जंगली श्वापदांच्या हल्ल्यात शेतपिक, पशुधन, मानव हानी, जखमी झालेल्या ६०४ जणांना अद्यापही मदतीची प्रतीक्षा कायम आहे. ६०४ जणांना अनुदान वाटपासाठी ४४ लाख रुपयांची गरज असताना केवळ १३ लाख ६८ हजारांचा अनुदान वनविभागाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे अनुदान वाटपविषयी वनविभागात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.जिल्ह्यात सातही तालुक्यात जंगलाचा काही भाग येत आहे. या जंगलातील श्वापदे अन्नाच्या शोधात येत लगतच्या शेतात धुडगूस घालतात. या श्वापदांकडून शेतातील कोणत्याही एका भागातील पिकाचे नुकसान होते. नुकसान करून पळून जाताना ही श्वापदे शेतातील पिकच तुडवत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात या श्वापदांनी एकूण १,५२० शेतकऱ्यांच्या शेतातील पीक उद्ध्वस्त केले. याची पाहणी वनविभागाच्यावतीने करण्यात आली असून ९७० शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तर ५५० शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना ३४ लाख रुपयांच्या अनुदानाची गरज आहे. या वन्य प्राण्यांनी केवळ शेतीचेच नाही तर शेतकऱ्यांच्या पशुधनावरही हल्ला चढविला आहे. त्यांनी जिल्ह्यात डिसेंबर २०१४ पर्यंत एकूण १११ जनावराची हानी झाली. तर ६२ व्यक्तींवर हल्ला केला आहे. यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या सर्व प्रकरणात वनविभागाच्यावतीने मदत देण्यात येत असली तरी या मदतीकरिता वनविभागाच्या कार्यालयात चकरा मारणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. अशात कधी नियमाची आडकाठी तर कधी अनुदान नसल्याचा रोडा असल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. फेब्रुवारी महिन्यात केवळ १३ लाख ६८ हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाल्यानंतर मदत वाटप करताना वनविभाग अधिकाऱ्यांना संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यावर शासनाच्यावतीेने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.