शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

तालुका स्तरावर आरोग्य यंत्रणा बळकट करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:35 IST

पवनी : कोरोना संकटाचा सामना करीत एक वर्ष उलटले. वर्षभरात शासनाने तालुका स्तरावरील आरोग्य यंत्रणा बळकटीकरणासाठी नियोजन केलेले नाही. ...

पवनी : कोरोना संकटाचा सामना करीत एक वर्ष उलटले. वर्षभरात शासनाने तालुका स्तरावरील आरोग्य यंत्रणा बळकटीकरणासाठी नियोजन केलेले नाही. कोरोना संकटावर मात करण्यासाठी तालुका स्तरावर आरोग्य यंत्रणा बळकट करावी, अशी गरज निर्माण झाली आहे.

ग्रामीण रुग्णालय पवनीमार्फत सिंदपुरी (रुयाळ) येथील कोरोना सेंटरवर कोरोनाबाधित रुग्णावर उपचार केले जात आहेत. उपचारासाठी दर दिवसाला रुग्णसंख्येत वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येनुसार मनुष्यबळ, ऑक्सिजन साठा आणि रेमडेसिविर पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र, तालुकास्तरावरील आरोग्य यंत्रणेकडे शासनाचे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष नाही. ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी फक्त तीन वैद्यकीय अधिकारी आहेत उर्वरित सर्व डॉक्टर अस्थायी स्वरूपाचे आहेत त्यामुळे त्यांची खाजगी प्रॅक्टिसकडे विशेष लक्ष असते.

सिंदपुरी (रुयाळ) येथील कोरोना सेंटरवर कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. उपचार घेत असलेल्या पन्नास ते साठ रुग्णांपैकी एका वेळी सात ते आठ रुग्णांना ऑक्सिजन देण्याची सोय आहे. ट्रॉली आणि ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता असल्याने त्यापेक्षा जास्त रुग्णांना ऑक्सिजन दिल्या जाऊ शकत नाही. गंभीर रुग्णांना वेंटिलेटरची गरज भासते; पण ती सुविधा ग्रामीण रुग्णालय किंवा कोरोना केंद्रावर नाही. जिल्हा रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांना कोरोना केंद्रावर मृत्यूचा सामना करावा लागत आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध नाही. तसेच शववाहिनी व अंत्यसंस्कार करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. जिल्हा प्रशासनाने ग्रामीण रुग्णालय व कोरोना केंद्रावरील या मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी नागरिकांची रास्त अपेक्षा आहे.