शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

तालुका स्तरावर आरोग्य यंत्रणा बळकट करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:35 IST

पवनी : कोरोना संकटाचा सामना करीत एक वर्ष उलटले. वर्षभरात शासनाने तालुका स्तरावरील आरोग्य यंत्रणा बळकटीकरणासाठी नियोजन केलेले नाही. ...

पवनी : कोरोना संकटाचा सामना करीत एक वर्ष उलटले. वर्षभरात शासनाने तालुका स्तरावरील आरोग्य यंत्रणा बळकटीकरणासाठी नियोजन केलेले नाही. कोरोना संकटावर मात करण्यासाठी तालुका स्तरावर आरोग्य यंत्रणा बळकट करावी, अशी गरज निर्माण झाली आहे.

ग्रामीण रुग्णालय पवनीमार्फत सिंदपुरी (रुयाळ) येथील कोरोना सेंटरवर कोरोनाबाधित रुग्णावर उपचार केले जात आहेत. उपचारासाठी दर दिवसाला रुग्णसंख्येत वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येनुसार मनुष्यबळ, ऑक्सिजन साठा आणि रेमडेसिविर पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र, तालुकास्तरावरील आरोग्य यंत्रणेकडे शासनाचे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष नाही. ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी फक्त तीन वैद्यकीय अधिकारी आहेत उर्वरित सर्व डॉक्टर अस्थायी स्वरूपाचे आहेत त्यामुळे त्यांची खाजगी प्रॅक्टिसकडे विशेष लक्ष असते.

सिंदपुरी (रुयाळ) येथील कोरोना सेंटरवर कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. उपचार घेत असलेल्या पन्नास ते साठ रुग्णांपैकी एका वेळी सात ते आठ रुग्णांना ऑक्सिजन देण्याची सोय आहे. ट्रॉली आणि ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता असल्याने त्यापेक्षा जास्त रुग्णांना ऑक्सिजन दिल्या जाऊ शकत नाही. गंभीर रुग्णांना वेंटिलेटरची गरज भासते; पण ती सुविधा ग्रामीण रुग्णालय किंवा कोरोना केंद्रावर नाही. जिल्हा रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांना कोरोना केंद्रावर मृत्यूचा सामना करावा लागत आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध नाही. तसेच शववाहिनी व अंत्यसंस्कार करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. जिल्हा प्रशासनाने ग्रामीण रुग्णालय व कोरोना केंद्रावरील या मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी नागरिकांची रास्त अपेक्षा आहे.