शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
5
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
6
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
7
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
8
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
9
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
10
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
11
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
12
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
13
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
14
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
15
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
16
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
17
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
18
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
19
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
20
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात

१८ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:42 IST

तुमसर तालुक्यात १८ गट ग्रामपंचायतींची १५ जानेवारीला सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. परंतु तब्बल २० दिवसांनंतर या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, ...

तुमसर तालुक्यात १८ गट ग्रामपंचायतींची १५ जानेवारीला सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. परंतु तब्बल २० दिवसांनंतर या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंचपदी निवड झाली नाही. निवडणुकीच्या आधी या गट ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण घोषित करण्यात आले नाही. यामुळे पॅनल लढविताना अनेक पदाधिकाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत घोडेबाजार थांबविण्यासाठी सरपंचपदाचे आरक्षण विलंबाने घोषित करण्याचा संदेश समाजात गेला आहे. या विलंबाने गावांत असणारे मतभेद शांत करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. असे असले तरी गट ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक लढविताना सरपंच आरक्षित पदावरून उमेदवारांना पेचात ठेवण्यात आले आहे. निवडणूक आधीच सर्व ९७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत घेण्यात आली नाही. यामुळे गट ग्रामपंचायतची निवडणूक लढविणारे पॅनलचे प्रमुख व स्वतंत्र निवडणूक लढविणारे उमेदवार नाराज झाले आहेत. त्यांना सरपंचपदाच्या आरक्षणापासून अनभिज्ञ ठेवण्यात आले आहे. ७९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांना २ वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत ५ फेब्रुवारीला घेण्यात येत असल्याने त्यांना निवडणुकीमध्ये सरपंचपदी विराजमान होण्यासाठी सर्व संधी मिळणार आहेत. यामुळे गट ग्रामपंचायतची निवडणूक लढविणाऱ्या सदस्यांना विलंबाने आरक्षण सोडत अन्यायकारक वाटत आहे.

गट ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीप्रमाणे ७९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत सार्वत्रिक निवडणुकीनंतर घोषित करण्याची ओरड नवनिर्वाचित सदस्य करीत आहेत. यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये होणारा घोडेबाजार थांबविण्यासाठी हे मदतीचे ठरणार आहे. ७९ ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण घोषित होताच पॅनल ते पॅनल निवडणूक लढविण्यास या गावातील उमेदवारँना आयती संधी मिळणार आहे, अशी संधी मात्र गट ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना मिळत नाही. हा निर्णय अन्यायकारक असल्याचे बोलले जात आहे. आरक्षण सोडत करताना निर्णय मात्र दुहेरी घेण्यात येत आहे. ७९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर घोषित करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

बॉक्स

पंचवार्षिक निवडणुकीचे आरक्षण घोषित करा

९७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण घोषित करताना येणाऱ्या गट ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे सरपंचपदाचे आरक्षण घोषित करण्यात येत नाही. येत्या पंचवार्षिकमध्ये गट ग्रामपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात येईल. या ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण याच आरक्षण सोडतीमध्ये घोषित करण्याचा निर्णय घेण्यात यावा, असे मत गावकरी व्यक्त करीत आहेत. गट ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण घोषित करताना अन्य ग्रामपंचायतींवर अन्याय होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी गट ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण घोषित करताना पुढील पंचवार्षिक निवडणुकीचे आरक्षण घोषित करण्याचा सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी नागरिक करीत आहेत.