शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

परप्रांतात वाढली भंडाऱ्यातील भेंडीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 21:58 IST

धानाच्या कोठाराला चुलबंद व वैनगंगा नदीने सुपीक केले. भातशेतीसोबतच शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळले आहे. लाखनी तालुक्यात तर भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. आता दर्जेदार भाजीपाल्यासोबतच भेंडीला परप्रांतात चांगली मागणी आहे.

ठळक मुद्दे३० रुपये किलो दर : दररोज होते २५ टन भेंडीची निर्यात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धानाच्या कोठाराला चुलबंद व वैनगंगा नदीने सुपीक केले. भातशेतीसोबतच शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळले आहे. लाखनी तालुक्यात तर भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. आता दर्जेदार भाजीपाल्यासोबतच भेंडीला परप्रांतात चांगली मागणी आहे. ३० ते ३२ रुपये किलो जाग्यावरूनच भेंडी विकली जात असून दररोज २५ टन भेंडी विविध प्रांतात निर्यात केली जात आहे.शेतमालाला बाजारपेठेची समस्या सर्वत्र दिसून येते. शेतकऱ्यांच्या हाती मुबलक पीक आले की बाजारात भाव पडतात. भाजीपाला विक्रीत तर व्यापारी, एजंट शेतकऱ्यांची लुबाडणूकच करतात. यावर मात करण्यासाठी भंडारा येथील बंडू बारापात्रे यांनी बीटीबी खासगी सब्जीमंडीची सुविधा सुरु केली. शेतकºयांना या सब्जीमंडीचा चांगलाच लाभ होऊ लागला. शेकडो शेतकरी येथे आपला भाजीपाला घेऊन येतात.अलीकडे शेतकरी भेंडी पिकाकडे वळल्याचे दिसून येत आहे. लाखनी तालुक्यातील खेडेपारचे नारायण धरमशहारे, सोमलवाडाचे सुखदेव टिचकुले, पालांदुरचे बळीराम बागडे, सामेवाडाचे देवराव बोळणे, भंडारा तालुक्यातील बेटाळाचे बंडू ईश्वरकर, गडपेंढरीचे नाजूक गायधने आदी मोठ्या प्रमाणात भेंडीचे पीक घेत आहेत. बाजारात अपेक्षित भाव मिळत असल्याने ते येथील बीटीबी मार्केटमध्ये आपली भेंडी विक्रीसाठी आणतात. सध्या भेंडीला ३० ते ३२ रुपये भाव मिळत असल्याचे या शेतकºयांनी सांगितले.भंडारा जिल्ह्यातील भेंडीला उत्तर प्रदेशातील बनारस, गोरखपूर, दमोह, मध्यप्रदेशातील जबलपूर, सागर, कटनी, शिवनी, छिंदवाडा, झांशी, टिकमगड, बिहारमधील पाटणा, छत्तीसगडमधील रायपूर, बिलासपूर, अंबीकापूर येथे मोठी मागणी आहे. येथून हा भेंडी विशिष्ट पद्धतीने पॅकींग करून पाठविला जातो. यासोबतच इतर भाजीपालाही परप्रांतात पाठविला जात आहे.भंडारा जिल्ह्यातील भाजीउत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांची लूट थांबून त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत आहे. आज भंडारातील भेंडीसह इतर भाजीपाला परप्रांतात जात आहे. भंडाराची ओळख भातासोबत भाजीउत्पादक म्हणूनही होत आहे. त्यातून शेतकऱ्यांना फायदा होत आहे.-बंडू बारापात्रे, अध्यक्ष बीटीबी सब्जीमंडी