शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
3
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
4
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
5
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
6
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
7
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
8
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
9
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
10
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
11
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
12
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
13
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
14
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
15
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
16
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
17
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
18
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
19
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
20
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स

परप्रांतात वाढली भंडाऱ्यातील भेंडीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 21:58 IST

धानाच्या कोठाराला चुलबंद व वैनगंगा नदीने सुपीक केले. भातशेतीसोबतच शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळले आहे. लाखनी तालुक्यात तर भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. आता दर्जेदार भाजीपाल्यासोबतच भेंडीला परप्रांतात चांगली मागणी आहे.

ठळक मुद्दे३० रुपये किलो दर : दररोज होते २५ टन भेंडीची निर्यात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धानाच्या कोठाराला चुलबंद व वैनगंगा नदीने सुपीक केले. भातशेतीसोबतच शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळले आहे. लाखनी तालुक्यात तर भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. आता दर्जेदार भाजीपाल्यासोबतच भेंडीला परप्रांतात चांगली मागणी आहे. ३० ते ३२ रुपये किलो जाग्यावरूनच भेंडी विकली जात असून दररोज २५ टन भेंडी विविध प्रांतात निर्यात केली जात आहे.शेतमालाला बाजारपेठेची समस्या सर्वत्र दिसून येते. शेतकऱ्यांच्या हाती मुबलक पीक आले की बाजारात भाव पडतात. भाजीपाला विक्रीत तर व्यापारी, एजंट शेतकऱ्यांची लुबाडणूकच करतात. यावर मात करण्यासाठी भंडारा येथील बंडू बारापात्रे यांनी बीटीबी खासगी सब्जीमंडीची सुविधा सुरु केली. शेतकºयांना या सब्जीमंडीचा चांगलाच लाभ होऊ लागला. शेकडो शेतकरी येथे आपला भाजीपाला घेऊन येतात.अलीकडे शेतकरी भेंडी पिकाकडे वळल्याचे दिसून येत आहे. लाखनी तालुक्यातील खेडेपारचे नारायण धरमशहारे, सोमलवाडाचे सुखदेव टिचकुले, पालांदुरचे बळीराम बागडे, सामेवाडाचे देवराव बोळणे, भंडारा तालुक्यातील बेटाळाचे बंडू ईश्वरकर, गडपेंढरीचे नाजूक गायधने आदी मोठ्या प्रमाणात भेंडीचे पीक घेत आहेत. बाजारात अपेक्षित भाव मिळत असल्याने ते येथील बीटीबी मार्केटमध्ये आपली भेंडी विक्रीसाठी आणतात. सध्या भेंडीला ३० ते ३२ रुपये भाव मिळत असल्याचे या शेतकºयांनी सांगितले.भंडारा जिल्ह्यातील भेंडीला उत्तर प्रदेशातील बनारस, गोरखपूर, दमोह, मध्यप्रदेशातील जबलपूर, सागर, कटनी, शिवनी, छिंदवाडा, झांशी, टिकमगड, बिहारमधील पाटणा, छत्तीसगडमधील रायपूर, बिलासपूर, अंबीकापूर येथे मोठी मागणी आहे. येथून हा भेंडी विशिष्ट पद्धतीने पॅकींग करून पाठविला जातो. यासोबतच इतर भाजीपालाही परप्रांतात पाठविला जात आहे.भंडारा जिल्ह्यातील भाजीउत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांची लूट थांबून त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत आहे. आज भंडारातील भेंडीसह इतर भाजीपाला परप्रांतात जात आहे. भंडाराची ओळख भातासोबत भाजीउत्पादक म्हणूनही होत आहे. त्यातून शेतकऱ्यांना फायदा होत आहे.-बंडू बारापात्रे, अध्यक्ष बीटीबी सब्जीमंडी