शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
2
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
3
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
4
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
5
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
6
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
7
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
8
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
9
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!
10
Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
11
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
12
PF Withdrawal : ना फॉर्मची चिंता ना कुठे जाण्याचं टेन्शन; EPF खात्यातून UPI द्वारे काढू शकता पैसे, आली मोठी अपडेट
13
ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज
14
Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाची नाइट शिफ्ट; दिवसा ब्रेक; भांडुपमध्ये भिंत कोसळली
15
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
16
आषाढारंभ:आषाढापासून ४ महिने आध्यात्मिक वातावरण आणि सण, उत्सव, व्रत, वैकल्याची रेलचेल!
17
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
18
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
19
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
20
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?

परप्रांतात वाढली भंडाऱ्यातील भेंडीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 21:58 IST

धानाच्या कोठाराला चुलबंद व वैनगंगा नदीने सुपीक केले. भातशेतीसोबतच शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळले आहे. लाखनी तालुक्यात तर भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. आता दर्जेदार भाजीपाल्यासोबतच भेंडीला परप्रांतात चांगली मागणी आहे.

ठळक मुद्दे३० रुपये किलो दर : दररोज होते २५ टन भेंडीची निर्यात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धानाच्या कोठाराला चुलबंद व वैनगंगा नदीने सुपीक केले. भातशेतीसोबतच शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळले आहे. लाखनी तालुक्यात तर भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. आता दर्जेदार भाजीपाल्यासोबतच भेंडीला परप्रांतात चांगली मागणी आहे. ३० ते ३२ रुपये किलो जाग्यावरूनच भेंडी विकली जात असून दररोज २५ टन भेंडी विविध प्रांतात निर्यात केली जात आहे.शेतमालाला बाजारपेठेची समस्या सर्वत्र दिसून येते. शेतकऱ्यांच्या हाती मुबलक पीक आले की बाजारात भाव पडतात. भाजीपाला विक्रीत तर व्यापारी, एजंट शेतकऱ्यांची लुबाडणूकच करतात. यावर मात करण्यासाठी भंडारा येथील बंडू बारापात्रे यांनी बीटीबी खासगी सब्जीमंडीची सुविधा सुरु केली. शेतकºयांना या सब्जीमंडीचा चांगलाच लाभ होऊ लागला. शेकडो शेतकरी येथे आपला भाजीपाला घेऊन येतात.अलीकडे शेतकरी भेंडी पिकाकडे वळल्याचे दिसून येत आहे. लाखनी तालुक्यातील खेडेपारचे नारायण धरमशहारे, सोमलवाडाचे सुखदेव टिचकुले, पालांदुरचे बळीराम बागडे, सामेवाडाचे देवराव बोळणे, भंडारा तालुक्यातील बेटाळाचे बंडू ईश्वरकर, गडपेंढरीचे नाजूक गायधने आदी मोठ्या प्रमाणात भेंडीचे पीक घेत आहेत. बाजारात अपेक्षित भाव मिळत असल्याने ते येथील बीटीबी मार्केटमध्ये आपली भेंडी विक्रीसाठी आणतात. सध्या भेंडीला ३० ते ३२ रुपये भाव मिळत असल्याचे या शेतकºयांनी सांगितले.भंडारा जिल्ह्यातील भेंडीला उत्तर प्रदेशातील बनारस, गोरखपूर, दमोह, मध्यप्रदेशातील जबलपूर, सागर, कटनी, शिवनी, छिंदवाडा, झांशी, टिकमगड, बिहारमधील पाटणा, छत्तीसगडमधील रायपूर, बिलासपूर, अंबीकापूर येथे मोठी मागणी आहे. येथून हा भेंडी विशिष्ट पद्धतीने पॅकींग करून पाठविला जातो. यासोबतच इतर भाजीपालाही परप्रांतात पाठविला जात आहे.भंडारा जिल्ह्यातील भाजीउत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांची लूट थांबून त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत आहे. आज भंडारातील भेंडीसह इतर भाजीपाला परप्रांतात जात आहे. भंडाराची ओळख भातासोबत भाजीउत्पादक म्हणूनही होत आहे. त्यातून शेतकऱ्यांना फायदा होत आहे.-बंडू बारापात्रे, अध्यक्ष बीटीबी सब्जीमंडी