शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

ग्रामरोजगार सेवकांना ५० लाखांचे सुरक्षा कवच प्रदान देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:37 IST

ग्रामीण भागात स्थानिक लोकांना काम मिळावे यासाठी रोजगार हमीद्वारे स्थानिक मजुरांना काम देण्यात येते. कोरोना काळात त्यांना त्यांची ...

ग्रामीण भागात स्थानिक लोकांना काम मिळावे यासाठी रोजगार हमीद्वारे स्थानिक मजुरांना काम देण्यात येते. कोरोना काळात त्यांना त्यांची रोजीरोटी निर्वाह व्हावी या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलण्यात आले आहे. याकरिता स्थानिक रोजगार सेवक इमानेइतबारे काम करीत असतात. दरम्यान, मागील महिन्यात काम करीत असताना एका रोजगार सेवकाचे कोरोना काळात निधन झाले. मात्र, रोजगार सेवकाला सुरक्षा कवच नसल्यामुळे त्यांचे सर्व कुटुंब सुरक्षा कवच यापासून वंचित झाले आहे. कोरोनाची बाधा होऊन काही प्रसंगी सेवा देणारे दगावत आहेत.

अशावेळी त्यांच्या कुटुंबीयांची वाताहत होऊ नये यासाठी २४ मार्च २०२१ पासून १८० दिवसांपर्यंत त्यांना हे कवच मिळाले आहे. मात्र, या १८० दिवसांच्या विमा सुरक्षा कवचामध्ये ग्रामरोजगार सेवक व तांत्रिक कर्मचारी यांना योजनेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यांना विमा सुरक्षा कवच याचा लाभ देण्यात यावा. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत प्रत्येक गावात मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून अथक परिश्रम घेत असलेल्या ग्रामरोजगार सेवक, तांत्रिक कर्मचारी यांना सुरक्षा कवच प्रदान करण्यात येणार नसेल तर ही एक शोकांतिका आहे.

याकरिता ग्राम रोजगार सेवक व तांत्रिक कर्मचारी यांनी सुरक्षा कवच देण्याची मागणी शासन दरबारी करण्यात आली आहे. शासनाने या गंभीर प्रश्नाकडे जातीने लक्ष देऊन समस्या सोडविण्यात यावी, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे रोजगार सेवक संघटनेने म्हटले आहे.