शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

ग्रामरोजगार सेवकांचे प्रलंबित प्रवासभाडे मानधन देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:40 IST

ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी योजना सुरू केले. रोजगार हमी योजनेचा उद्देश हा ग्रामीण ...

ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी योजना सुरू केले. रोजगार हमी योजनेचा उद्देश हा ग्रामीण भागातील जनतेला, गावातच रोजगार उपलब्ध करणे व त्यांचे रोजगारासाठी ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारे स्थलांतर थांबविणे हा आहे. यासाठी ग्रामीण स्तरावर शासनाने प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर ग्राम रोजगार सेवक हे महत्त्वाचे केंद्रबिंदू मानले आहेत. रोजगार सेवकांच्या माध्यमातून चौमुखी मनरेगाची कामे करून घेत आहेत.

यात नमुना एक, नमुना चार व सात भरणे, नवीन जॉब कार्ड तयार करणे, हजेरीपत्रक काढणे व पंचायत समितीला सादर करणे, वार्षिक कृती आराखडा शेतकऱ्यांच्या बांधावर शेतावर जाऊन लाभार्थी निवड करणे, आवास योजनेची देखरेख व एक ते सात प्रकारांची मनरेगाची दस्ताऐवज अद्यावत करणे, वेळोवेळी पंचायत समिती सभेला हजर राहणे आणि कुशल, अकुशल कामाचे एस्टिमेट तयार करण्यासाठी लागणारे दाखल्यांची विविध कार्यालयाशी संपर्क साधून, पंचायत समितीमध्ये जमा करणे, आदी कामांकरिता महिन्यातून पाच ते सहा वेळापेक्षा जास्त दिवस ये-जा करावी लागतेय. यासाठी शासनाने देऊ केलेले रोजगार सेवकांना प्रवासभाडे सन २०१७ पासून थकीत आहेत. तर मानधन मागील एप्रिल महिन्यापासून रोजगार सेवकांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. करिता या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना तालुका भंडाराद्वारे गट विकास अधिकारी नूतन सावंत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदन देणाऱ्यांमध्ये तालुका अध्यक्ष - शंकर बोड्डे, सचिव- हेमंत देवगडे, सहसचिव - लोकेश मारवाडी, कोषाध्यक्ष - वामन शहारे, मुकेश जगनाडे, चेतन बोंद्रे, आशा ठवकर, रमेश खोकले, सारिका गजभिये, सिद्धार्थ कावळे, सुनील चामलाटे, यांचा समावेश आहे.