शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
3
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
5
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
6
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
7
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
8
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
9
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
10
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
11
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
12
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
13
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
14
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
15
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
16
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
17
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
18
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
19
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
20
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?

ग्रामरोजगार सेवकांचे प्रलंबित प्रवासभाडे मानधन देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:40 IST

ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी योजना सुरू केले. रोजगार हमी योजनेचा उद्देश हा ग्रामीण ...

ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी योजना सुरू केले. रोजगार हमी योजनेचा उद्देश हा ग्रामीण भागातील जनतेला, गावातच रोजगार उपलब्ध करणे व त्यांचे रोजगारासाठी ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारे स्थलांतर थांबविणे हा आहे. यासाठी ग्रामीण स्तरावर शासनाने प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर ग्राम रोजगार सेवक हे महत्त्वाचे केंद्रबिंदू मानले आहेत. रोजगार सेवकांच्या माध्यमातून चौमुखी मनरेगाची कामे करून घेत आहेत.

यात नमुना एक, नमुना चार व सात भरणे, नवीन जॉब कार्ड तयार करणे, हजेरीपत्रक काढणे व पंचायत समितीला सादर करणे, वार्षिक कृती आराखडा शेतकऱ्यांच्या बांधावर शेतावर जाऊन लाभार्थी निवड करणे, आवास योजनेची देखरेख व एक ते सात प्रकारांची मनरेगाची दस्ताऐवज अद्यावत करणे, वेळोवेळी पंचायत समिती सभेला हजर राहणे आणि कुशल, अकुशल कामाचे एस्टिमेट तयार करण्यासाठी लागणारे दाखल्यांची विविध कार्यालयाशी संपर्क साधून, पंचायत समितीमध्ये जमा करणे, आदी कामांकरिता महिन्यातून पाच ते सहा वेळापेक्षा जास्त दिवस ये-जा करावी लागतेय. यासाठी शासनाने देऊ केलेले रोजगार सेवकांना प्रवासभाडे सन २०१७ पासून थकीत आहेत. तर मानधन मागील एप्रिल महिन्यापासून रोजगार सेवकांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. करिता या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना तालुका भंडाराद्वारे गट विकास अधिकारी नूतन सावंत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदन देणाऱ्यांमध्ये तालुका अध्यक्ष - शंकर बोड्डे, सचिव- हेमंत देवगडे, सहसचिव - लोकेश मारवाडी, कोषाध्यक्ष - वामन शहारे, मुकेश जगनाडे, चेतन बोंद्रे, आशा ठवकर, रमेश खोकले, सारिका गजभिये, सिद्धार्थ कावळे, सुनील चामलाटे, यांचा समावेश आहे.