शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2017 01:40 IST

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच पुरोगामी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समन्वय साधून भंडारा

भंडारा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच पुरोगामी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समन्वय साधून भंडारा जिल्ह्यातील लाखनी, साकोली, लाखांदूर, पवनी, भंडारा, मोहाडी, तुमसर या तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे कर्ज बिना अट सरसकट माफ करून धान उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी भंडारा जिल्हा विकास संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष अशोक कान्हेकर, अनिल मेश्राम, नाना गजभिये, गौतम कान्हेकर, अशोक बागडे, धनराज कान्हेकर, राज मेश्राम यांनी एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.जिल्ह्यातील शेतकरी बांधव शेतीची मशागत, पेरणी, रोवणी, लागवड यासारखी कामे करण्यासाठी दरवर्षी सरकारी, खाजगी बँका व सावकारी कर्ज काढत असतात. परंतू शेती करत असताना कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट तर कधी पिकांवर विविध रोगांच्या प्रादुर्भाव होत असल्याने पिक उत्पादनात बरीच घट येत असते तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला खर्चावर आधारित हमी भाव मिळत नसल्याने धान उत्पादक शेतकरी बांधव आर्थिक विवंचनेत सापडत असतात. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी बांधवांना कर्ज फेडणे अशक्य होत असते. कर्ज फेडण्यासाठी संबंधित एजन्सी तगादा लावत असून जप्ती मारण्याची कारवाई करीत असल्याने शेतकरी बांधवांना नाईलाजास्तव कंटाळून आत्महत्या करावी लागत असून त्याचे कुटूंबावर मोठे संकट कोसळत असते. त्यामुळे शेतीची मशागत कशी करावी, मुलांचे शिक्षण, लग्न कसे करावे, उधार, उसणे, कर्जाची परतफेड कशी करावी असे अनेक प्रश्न धान उत्पादक शेतकरी बांधवासमोर आवासून उभे ठाकले आहे. ज्याप्रमाणे सरकार मोठ मोठ्या उद्योग पतीचे कर्ज माफ करते अगदी त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारने सम्यक विचार करून वेळीच दखल घेवून भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे कर्ज विना अट सरसकट माफ करणारा धोरणात्मक निर्णय मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेवून करणारा धोरणात्मक निर्णय मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेऊन योग्य न्याय प्रदान करावा, अशी मागणी अशोक कान्हेकर, अनिल मेश्राम, नाना गजभिये, अशोक नाकडे, गौतम कान्हेकर, राज मेश्राम, धनराज कान्हेकर, हितेंद्र मेश्राम, अशोक फुलेकर यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)