शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अतिक्रमण हटविण्याची मागणी

By admin | Updated: October 11, 2014 22:59 IST

वरठी-पांढराबोडी रस्ता अतिक्रमणामुळे बंद करण्यात आला. सदर रस्ता बंद झाल्यामुळे वरठी, सिरसी व पांढराबोडी येथील विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर व गावकऱ्यांना त्रास होत आहे. यासंदर्भात

वरठी : वरठी-पांढराबोडी रस्ता अतिक्रमणामुळे बंद करण्यात आला. सदर रस्ता बंद झाल्यामुळे वरठी, सिरसी व पांढराबोडी येथील विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर व गावकऱ्यांना त्रास होत आहे. यासंदर्भात अनेकदा मौका चौकशी झाली. पण रस्ता खुला करण्यात आला नाही. रस्ता बंद झाल्यामुळे जनतेची अडचण होत आहे. अधिकाऱ्यांना गावात न येवू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सदर रस्ता भंडारा-मोहाडी तालुक्याच्या सिमेवर येतो. जिल्हा मार्ग म्हणून या रस्त्याची शासकीय दफ्तरी नोंद आहे. भंडारा शहराला जाण्याकरीता 'शार्टकट' रस्ता असून वरठी मार्गे पांढराबोेडी येथे जाण्याकरीता एकमेव मार्ग आहे. या रस्त्याच्या उपयोग वरठी, पांढराबोडी व सिरसी येथील शेतकरी व विद्यार्थ्यांना होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजुला वरठी व सिरसी गावाची हद्दीत आहे. सनफ्लॅग कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेल्या वसाहती व सनफ्लॅग स्कूलला जाण्यासाठी हा सरळ रस्ता आहे. सदर रस्ता वरठी येथून जाणाऱ्या राज्य महामार्ग ३५५ ला जोडतो. वरठी-भंडारा या मार्गावर असलेली वाहनांच्या वर्दळीमुळे शेकडो दुचाकीस्वार या मार्गाचा वापर करून भंडारा येथे जातात. वरठी ते पांढराबोडी हे ५ कि़मी. चे अंतर आहे. पांढराबोडी पासून ते वरठीपर्यंत सदर रस्ता मोकळा असून वरठी येथील जगनाडे चौकातील टी-पार्इंटजवळ रस्ता अडकवण्यात आला आहे. एकंदरीत १०-२० फुट रस्ता अगदी टोकावर अडवल्यामुळे रस्ता पूर्णत: बंद झाला आहे. सदर रस्त्यावर तीनवेळा खडीकरण करून डांबरीकरण करण्यात आले आहे. भंडारा व मोहाडी तालुका भूमी अभिलेख कार्यालया मार्फत २०११ मध्ये मोजमाप झाले. जिल्हा परीषद भंडाराच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधकाम पाडले होते. तीन वर्षानंतर पुन्हा अतिक्रमणामुळे रस्ता बंद झाल्यामुळे लोकांच्या मनात संताप व्यक्त होत आहे. येथील नागरीकांनी मतदान न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (वार्ताहर)