शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
3
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
5
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
6
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
7
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
8
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
9
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
10
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
11
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
12
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
13
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
14
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
15
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
16
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
17
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
18
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
19
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
20
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!

रस्त्याच्या नुतनीकरणात सदोष मोजमाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 22:07 IST

अत्यंत वर्दळीचा असलेल्या खांबतलाव चौक ते जिल्हा परिषद चौकापर्यंतच्या रस्त्याच्या नुतनीकरण कामात रस्त्याची सदोष मोजमाप केली जात आहे. आधीच या रस्त्याच्या नुतनीकरणाला सतराशे साठ विघ्न येत असताना प्रशासकीय चुकीमुळेच येथील नागरिकांना भविष्यात जीवाला मुकावे लागणार काय, अशी स्थिती निर्माण होत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून रस्ता बांधकामाचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज : खांबतलाव ते जिल्हा परिषद चौक रस्ता बांधकाम प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अत्यंत वर्दळीचा असलेल्या खांबतलाव चौक ते जिल्हा परिषद चौकापर्यंतच्या रस्त्याच्या नुतनीकरण कामात रस्त्याची सदोष मोजमाप केली जात आहे. आधीच या रस्त्याच्या नुतनीकरणाला सतराशे साठ विघ्न येत असताना प्रशासकीय चुकीमुळेच येथील नागरिकांना भविष्यात जीवाला मुकावे लागणार काय, अशी स्थिती निर्माण होत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून रस्ता बांधकामाचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.जवळपास दीड महिन्यांपुर्वी राजीव गांधी चौक ते जिल्हा परिषद चौकापर्यंतच्या रस्त्याच्या विस्तारीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला. मात्र आठवडाभरातच एनओसीचा मुद्दा समोर करीत पालिकेने बांधकाम थांबविले. त्यातही राजकीय व प्रशासकीय पेच प्रसंगात प्रशासनाच्या निर्देशानंतर आणन-फाणनमध्ये खोदण्यात आलेला रस्ता पुर्वीप्रमाणे मुरूम व चुरी टाकून समतल करण्यात आला. मागील पंधरा दिवसांपासून अशीच स्थिती असून धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.दुसरीकडे याच कालावधीत संबंधित यंत्रणेमार्फत रस्त्याचे मोजमाप करण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र या मोजणीत दुजाभाव होत असल्याचा स्पष्ट आरोप येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सदर रस्त्याचे नुतनीकरण करण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयामार्फत आली आहे. ते करताना दोन-तीनवेळा भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी मोजणी करत होते. त्यावेळेला कधी पाच फूट तर कधी दहा फुट आतमध्ये तर कधी सुरक्षा भिंतीपर्यंत मार्किंग करण्यात आली. आता तर या मार्गावरील घरांच्या भिंतीवर वेगवेगळे मार्किंग दिसत आहे. १९९२-९३ च्या नकाशाच्या आधारावर ही मोजणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र त्या कालावधीच्या प्रकाशनात त्रृटी असल्यामुळे त्यावर्षाचे प्रकाशन रद्द करण्यात आले होते. भूमिअभिलेख कार्यालयातील मागील बंदोबस्ताचा नकाशा १:४००० या स्केलप्रमाणे आहे. परंतु १९९२-९३ चा नकाशा १:५००० स्केलप्रमाणे आहे.भंडारा खास व पिंगलाई तसेच केसलवाडा येथे रेल्वे फाटकाजवळ शिवधुरा आहे. हे एका खाजगी ले-आऊटमध्ये स्पष्टपणे नोंद असतानाही सन १९९२-९३ च्या बंदोबस्त नकाशात शिवधुरा नाही. विद्यमान स्थितीत होत असलेली मोजणी अत्यंत चुकीची असून नझूलच्या नालीच्या जागेनंतरही मोजणी केली जात आहे. या पूर्ण प्रकरणात मोजमाप करताना दुजाभाव होत असून राजीव गांधी चौकापासून ते जिल्हा परिषद चौकाकडे जाणाºया डावीकडील भाग जास्त तर उजवीकडील भाग कमी प्रमाणात मोजला जात असल्याची ओरड आहे.रस्त्याच्या मध्यभागातून मोजणी करणे आवश्यक असताना रस्त्याचा मध्यबिंदूच बदलविण्यात येत आहे, ही अत्यंत निंदनिय बाब असल्याचेही नागरिकांची म्हणणे आहे. सदर रस्त्याच्या नूतनीकरणापुर्वी भविष्यात नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होणार नाही, ही बाब लक्षात घ्यावी, अशी मुख्य मागणी आहे.