शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

३५ वर्षांपासून देवरी तलाव कोरडा

By admin | Updated: August 31, 2016 00:24 IST

परिसरातील शेती हरितक्रांती करण्यासाठी ३५ वर्षांपूर्वी देवरी (देव) तलाव रोजगार हमीतून तयार करण्यात आला.

पुनरूज्जीवनाची गरज : जलयुक्त शिवारातून वगळले, हरितक्रांतीचे स्वप्न कोसोदूरमुखरु बागडे पालांदूरपरिसरातील शेती हरितक्रांती करण्यासाठी ३५ वर्षांपूर्वी देवरी (देव) तलाव रोजगार हमीतून तयार करण्यात आला. १०० हेक्टरमध्ये तलावाची व्याप्ती आहे. मात्र शासनाच्या दप्तरदिरंगाईने आजही तलाव बादलीभर पाण्याकरिता आसुसलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तलावाचे पुनरूज्जीवन करण्याची गरज आहे.मागील दहा वर्षांपासून सातत्याने तलाव दुरुस्तीकरिता शासनदरबारी पाठपुरावा करीत असून प्रशासनाच्या सुस्त व वेळकाढू धोरणाने तलावाला न्याय मिळालेला नाही. जिल्हाधिकारी यांनी जलयुक्त शिवार अंतर्गत प्रस्तावित यादी तपासून देवरी तलावाला न्याय दिल्यास परिसरात हरितक्रांती घडण्यास मदत होईल. देवरी (गोंदी) हे गाव जलसिंचन शिवार योजनेत घेतले आहे. याकरिता सुमारे ७० लाखांचा निधी अपेक्षित असून शासनस्तरावर खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशीवार यांच्या मदतीने प्रकरणाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे.लाखोंचा खर्च केल्यानंतरही नागरिकांना शेतीकरिता पाण्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे यात मोठी अफरातफर झाल्याचे वरपांगी दिसून येत असतानाही कोणीही साधा ब्र काढलेला नाही. तलावाचे पुनरूज्जीवन झाल्यास परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमिन ओलीताखाली येईल. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनसुविधा उपलब्ध होईल. २००५ ला अतिवृष्टीने मुख्य गेटवर दबाव पडल्याने किंवा ऊन, वारा, पावसाने परिणाम होऊन मुख्य गेटवर तडे गेले. पाळ फुटली. तलावाचे पाणी शेतात घुसले. शेतकऱ्यांची मच्छीमारांची सुमार नुकसान झाले. या गावातील ढिवर समाजाला मिळणारा हक्काचा रोजगार हातून गेला. सिंचनाची आशा झाली धूसर१९७५ साली रोजगार हमी योजनेतून सुमारे ३० लाख रूपयांचा निधी खर्च करून १०० हेक्टर परिसरात तलावाचे बांधकाम करण्यात आले. तलावाचे म्हणजे नहराचे पाळीचे काम पूर्ण होऊन सिंचन होणार अशी आशा तत्कालीन अभियंत्यांनी शेतकऱ्यांना दाखविली. मात्र आजही आशेची निराशाच दिसत आहे. तलावाच्या दारांच्या चुकीच्या बनावटीमुळे शेतकरी सिंचनापासून मुकला. तलाव निर्मितीला ३५ वर्ष लोटूनही शासनाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.देवरी तलावावर शासनाने लाखोंचा खर्च केलेला आहे. मात्र तलावाचे काम बंद पडले. तलावाचे पुनरूज्जीवन केल्यास परिसरातील शेतकऱ्यांना हरितक्रांतीकरिता सहकार्य होईल. यातून त्यांचे जीवनमान उंचावेल. - भरत खंडाईत माजी जिल्हा परिषद सदस्य.