शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

बधीर प्रशासनामुळे कमकासूरवासीयांची ‘दिवाळी अंधारात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 23:18 IST

५ आॅक्टोबरपासून आदिवासी बांधवांनी मुलभूत सोयी अभावी पुनर्वसित गाव सोडून मुळ गावी कमकासुरात धाव घेतली आहे.

ठळक मुद्देशासन-प्रशासनाच्या संवेदना हरविल्या : आदिवासी बांधवांनी केले प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : ५ आॅक्टोबरपासून आदिवासी बांधवांनी मुलभूत सोयी अभावी पुनर्वसित गाव सोडून मुळ गावी कमकासुरात धाव घेतली आहे. सुरुवातीला प्रशासनाने आदिवासी बांधवांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. दरम्यान जलसमाधी व काळी दिवाळीचा इशारा देताच लवकरच सोयी सुविधा पुरवा, आदिवासी बांधवांनी पुनर्वसित गावात परत जावे असे जिल्हा प्रशासनाने माध्यमातून सांगितले. परंतु तीच माहिती स्वत: येऊन सांगायला जिल्हा प्रशासन आले नाही.कमकासुरात दिवाळीच्या दिवशी शासन व प्रशासनाचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून काळोखात व उघड्यावर चटणीभात खाऊन काळी दिवाळी साजरी केली. मात्र बधीर प्रशासनाला जाग आली नाही.मध्य प्रदेश तथा महाराष्ट्र या दोन राज्याच्या मधोमध बावनथडी नदी वाहते.याच नदीवर बावनथडी सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. या प्रकल्पाच्या गळभरणीच्या वेळेस बुडीत क्षेत्रात येत असलेल्या कमकासुर येथील आदिवासी बांधवांना बंदुकीच्या धाकावर गावातून हाकलून लावण्यात आले. त्यांचे पुनर्वसन रामपूर येथे करण्यात आले. मात्र पाच वर्षापासून त्या ठिकाणी १८ नागरी मूलभूत सुविधा पुरविल्या गेल्या नव्हत्या. परिणामी अनेकदा निवेदने देऊन समस्या दूर करण्याची मागणी करण्यात आली. परंतु प्रशासनाने आदिवासी बांधवांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. अखेरीस ५ आॅक्टोबर रोजी सर्व आदिवासी बांधव लेकराबाळासह रामपूर पुनर्वसित गाव सोडून स्वगावी परतले. कमकासूर हे बुडीत गाव असल्याने त्याठिकाणी आता दलदल निर्माण झाली आहे.माणसाएवढी झुडपी वाढलेली आहे. परिसरात दाट जंगल असून या ठिकाणी जंगली व हिंस्त्र प्राण्याचा वावर आहे. सापांचा अधिवास त्या ठिकाणी आहे. तरीसुद्धा जोपर्यंत मुलभूत सुविधा पुरविण्यात येत नाही तोपर्यंत कमकासूरातच राहू अशी भूमिका घेत आदिवासींनी तंबूत संसार सुरु केला. दरम्यान आदिवासी बांधवांच्या आंदोलनाने उग्ररुप धारण करताच जिल्हाधिकाºयांनी पुनर्वसीत गाव रामपूर येथे मुलभूत सुविधा पुरविण्याचे आदेश संबंधित विभागाला दिल्याचे सांगून आदिवासी बांधवांनी पुनर्वसीत गावात परत जाण्याचे आवाहन केले. परंतु प्रत्यक्षात कमकासूरातील परिस्थिती जाणून घेण्याची व आदिवासी बांधवांना समजविण्याची तसदी घेतली नाही. जिल्हाधिकाºयांनी जसे प्रसार माध्यमातून आदिवासी बांधवांना आवाहन केले. त्याच प्रकारे कमकासुरात प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना पुनर्वसीत गावात जाण्यासाठी सांगितले असते तर कदाचित आदिवासी बांधवांनी आपल्या चिमुकल्यासह दिवाळी साजरी केली असती. परंतु तसे काही झाले नाही. आतातरी जिल्हाधिकाºयांनी आदिवासी बांधवांचे गºहाणे ऐकून त्यांची मरणयातनेतून मुक्तता करावी ही त्यांची अपेक्षा आहे.आदिवासी बांधव हा सहनशील आहे. प्रशासनाला वेळ हवा की आणखी काही हवे ते त्यांनी येथे येऊन प्रश्न सोडविला असता तर सुलभ झाले असते. आमची हीच मागणी होती.- अशोक उईके, आदिवासी नेताप्रसार माध्यमातून जिल्हाधिकाºयांनी पुनर्वसनाबाबतच्या दिलेल्या आकडेवारीत व प्रत्यक्ष आकडेवारीत तफावत आहे. तसे पुरावेही आहेत.- किशोर उईके, सरपंच कमकासूरआदिवासी आपल्या लेकराबाळांसह कोणत्या परिस्थितीत राहतात हे पाहल्यावर त्यांना कळेल. दिवाळी सारख्या सणात आम्ही आमच्या घरात नाही. यापेक्षा दुसरे दु:ख कोणते.- लक्ष्मी खंडाते, कमकासूर.