शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बधीर प्रशासनामुळे कमकासूरवासीयांची ‘दिवाळी अंधारात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 23:18 IST

५ आॅक्टोबरपासून आदिवासी बांधवांनी मुलभूत सोयी अभावी पुनर्वसित गाव सोडून मुळ गावी कमकासुरात धाव घेतली आहे.

ठळक मुद्देशासन-प्रशासनाच्या संवेदना हरविल्या : आदिवासी बांधवांनी केले प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : ५ आॅक्टोबरपासून आदिवासी बांधवांनी मुलभूत सोयी अभावी पुनर्वसित गाव सोडून मुळ गावी कमकासुरात धाव घेतली आहे. सुरुवातीला प्रशासनाने आदिवासी बांधवांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. दरम्यान जलसमाधी व काळी दिवाळीचा इशारा देताच लवकरच सोयी सुविधा पुरवा, आदिवासी बांधवांनी पुनर्वसित गावात परत जावे असे जिल्हा प्रशासनाने माध्यमातून सांगितले. परंतु तीच माहिती स्वत: येऊन सांगायला जिल्हा प्रशासन आले नाही.कमकासुरात दिवाळीच्या दिवशी शासन व प्रशासनाचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून काळोखात व उघड्यावर चटणीभात खाऊन काळी दिवाळी साजरी केली. मात्र बधीर प्रशासनाला जाग आली नाही.मध्य प्रदेश तथा महाराष्ट्र या दोन राज्याच्या मधोमध बावनथडी नदी वाहते.याच नदीवर बावनथडी सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. या प्रकल्पाच्या गळभरणीच्या वेळेस बुडीत क्षेत्रात येत असलेल्या कमकासुर येथील आदिवासी बांधवांना बंदुकीच्या धाकावर गावातून हाकलून लावण्यात आले. त्यांचे पुनर्वसन रामपूर येथे करण्यात आले. मात्र पाच वर्षापासून त्या ठिकाणी १८ नागरी मूलभूत सुविधा पुरविल्या गेल्या नव्हत्या. परिणामी अनेकदा निवेदने देऊन समस्या दूर करण्याची मागणी करण्यात आली. परंतु प्रशासनाने आदिवासी बांधवांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. अखेरीस ५ आॅक्टोबर रोजी सर्व आदिवासी बांधव लेकराबाळासह रामपूर पुनर्वसित गाव सोडून स्वगावी परतले. कमकासूर हे बुडीत गाव असल्याने त्याठिकाणी आता दलदल निर्माण झाली आहे.माणसाएवढी झुडपी वाढलेली आहे. परिसरात दाट जंगल असून या ठिकाणी जंगली व हिंस्त्र प्राण्याचा वावर आहे. सापांचा अधिवास त्या ठिकाणी आहे. तरीसुद्धा जोपर्यंत मुलभूत सुविधा पुरविण्यात येत नाही तोपर्यंत कमकासूरातच राहू अशी भूमिका घेत आदिवासींनी तंबूत संसार सुरु केला. दरम्यान आदिवासी बांधवांच्या आंदोलनाने उग्ररुप धारण करताच जिल्हाधिकाºयांनी पुनर्वसीत गाव रामपूर येथे मुलभूत सुविधा पुरविण्याचे आदेश संबंधित विभागाला दिल्याचे सांगून आदिवासी बांधवांनी पुनर्वसीत गावात परत जाण्याचे आवाहन केले. परंतु प्रत्यक्षात कमकासूरातील परिस्थिती जाणून घेण्याची व आदिवासी बांधवांना समजविण्याची तसदी घेतली नाही. जिल्हाधिकाºयांनी जसे प्रसार माध्यमातून आदिवासी बांधवांना आवाहन केले. त्याच प्रकारे कमकासुरात प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना पुनर्वसीत गावात जाण्यासाठी सांगितले असते तर कदाचित आदिवासी बांधवांनी आपल्या चिमुकल्यासह दिवाळी साजरी केली असती. परंतु तसे काही झाले नाही. आतातरी जिल्हाधिकाºयांनी आदिवासी बांधवांचे गºहाणे ऐकून त्यांची मरणयातनेतून मुक्तता करावी ही त्यांची अपेक्षा आहे.आदिवासी बांधव हा सहनशील आहे. प्रशासनाला वेळ हवा की आणखी काही हवे ते त्यांनी येथे येऊन प्रश्न सोडविला असता तर सुलभ झाले असते. आमची हीच मागणी होती.- अशोक उईके, आदिवासी नेताप्रसार माध्यमातून जिल्हाधिकाºयांनी पुनर्वसनाबाबतच्या दिलेल्या आकडेवारीत व प्रत्यक्ष आकडेवारीत तफावत आहे. तसे पुरावेही आहेत.- किशोर उईके, सरपंच कमकासूरआदिवासी आपल्या लेकराबाळांसह कोणत्या परिस्थितीत राहतात हे पाहल्यावर त्यांना कळेल. दिवाळी सारख्या सणात आम्ही आमच्या घरात नाही. यापेक्षा दुसरे दु:ख कोणते.- लक्ष्मी खंडाते, कमकासूर.