शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

ऐन पावसाळ्यात देव्हाडीत पाणीटंचाई

By admin | Updated: June 30, 2017 00:29 IST

तुमसर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या देव्हाडी गावात भर पावसाळ्यात मागील पाच दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

नियोजनाचा अभाव : तहान लागल्यावर विहिर खोदण्याचा प्रकारलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या देव्हाडी गावात भर पावसाळ्यात मागील पाच दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तीन दिवसांपासून एक थेंब पाणी ग्रामस्थांना मिळाले नाही. मागील दोन दिवसांपासून एक वेळ तोही केवळ १५ मिनिटे पाणीपुरवठा केला जात आहे. नियोजनाचा अभाव येथे दिसत आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्यावर उपाययोजना करण्याचा केविलवाणा प्रकार येथे सुरू आहे.देव्हाडी गावाची लोकसंख्या सुमारे सात हजार ५०० इतकी आहे. मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर गाव वसले आहे. तालुक्यात मोठी ग्रामपंचायत म्हणून नोंद आहे. परंतु किमान मुलभूत समस्या सोडविण्यास ग्रामपंचायत असमर्थ ठरली आहे. मागील पाच दिवसापासून गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तीन दिवस ग्रामस्थांना एक थेंब पाणीपुरवठा करण्यात आला नाही. त्यानंतर ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा संदर्भात विशेष बैठक बोलाविली होती. त्यात विहिरीचा उपसा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार येथे दिसत आहे.गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर तुमसर-गोंदिया मार्गावर आहे. विहिरीपासून वैनगंगा नदीचे अंतर केवळ दोन मि.मी. इतके आहे. विहिरीत सध्या पाणी नाही. उन्हाळ्यात विहिरीचा उपसा करण्याची गरज होती, परंतु उपसा केला नाही. तीव्र पाणी टंचाईमुळे येथे उपसा करण्याचे सूचले. गावाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी जुनी झाली आहे. त्यामुळे लिकेजची समस्या येथे कायम आहे. पाईप लाईन फुटणे हे नित्याचेच झाले आहे. कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येईल. ग्रामपंचायत अयशस्वी ठरली आहे. येथे ग्रामविकास अधिकाऱ्यांचे पद आहे, परंतु नियोजनाचा अभाव येथे दिसून येतो. बांधकामांना येथे प्राधान्य देण्यात येते. सध्या येथे ग्रामपंचायत भवनाचे कामे सुरू आहेत. मुलभूत समस्येकडे कायम दुर्लक्ष केले जात आहे. बुधवारी सायंकाळी पाणी समस्येवरून मांढळ रस्त्यावर संघर्ष झाल्याची माहिती आहे. केवळ विहीर कोरडी पडली काय करणार, असे उत्तर ग्रामस्थांना मिळत आहे. सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीवर येथे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.पाणीपुरवठा योजना गावात यशस्वी राबवाव्या, अशा सूचना शासनाकडून आहेत. पाणीपुरवठा योजनेकरिता निधीसुद्धा शासनाकडून दिले जाते. त्याचा लाभ येथील पदाधिकाऱ्यांनी उचलण्याची गरज आहे.