शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

निसर्गाच्या वक्रदृष्टीने धान उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:32 IST

भंडारा : यावर्षीच्या खरिपात पूर, किडींचा प्रादुर्भाव व परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नासाडीमुळे धान उत्पादनात कमालीची घट ...

भंडारा : यावर्षीच्या खरिपात पूर, किडींचा प्रादुर्भाव व परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नासाडीमुळे धान उत्पादनात कमालीची घट आली आहे. त्यानंतर पिकाला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार' यासारखी झाली असून शेतकरी हा मजुरापेक्षाही दु:खी असल्याचे बोलले जात आहे. .

भंडारा जिल्ह्याची ओळख ही उद्योगविरहित, सिंचनाच्या सोयींचा अभाव, रबी मालासाठी उपलब्ध नसलेल्या बाजारपेठेचा जिल्हा म्हणून आहे. मुख्य पीक खरीप असल्याने जवळपास ९० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेती म्हणजेच सर्वस्व असल्याने येथील शेतकऱ्यांचे संसाराचे गाळे हे येणाऱ्या पिकावरच अवलंबून असते. अशातही अत्यल्प व कवडीमोल भाव यामुळे सर्व स्वप्नांना तिलांजली दिल्याशिवाय गत्यंतर नाही. इतकेच नाही तर शासनस्तरावरून विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नाहक कागदपत्रे व कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत असल्याने सामान्यांचा जीव मेटाकुटीस आलेला आहे.

जिल्ह्यात असलेल्या खरेदी केंद्रावर धानाची आवक वाढलेली असली तरीही शेतकऱ्यांना चुकाऱ्यांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी पडक्या दरात धानाची विक्री करीत आहे. अडत्याकडे धानांच्या भावांचे बोर्डसुध्दा नाहीत.

त्यामुळे अडत्याने जो भाव सांगितला, त्याच भावात आपला माल विकल्याशिवाय गत्यंतर नसल्याने शेतकरी वर्ग अधिकच खचत असून जीवनाचा अंत स्वीकारण्यास धजावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. म्हणूनच पाच एकर शेती असलेला शेतकरी हा मजुरापेक्षाही दु:खी आहे. तेव्हा 'बळी' न पडता बळीचे राज्य येण्यासाठी शासनाने कंबर कसून अभय देण्याची गरज आहे.

यावर्षी ऐन धान पीक कापणी योग्य असताना विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घट आली आहे. एकरी केवळ आठ ते दहा पोती उत्पादन होत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तर काही शेतकऱ्यांनी धान पिकावर मावा, तुडतुडा रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने धानाची कापणी न करता तसेच ठेवल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहेत.

याकडे सरकारने शेतकऱ्यांची शेती कसण्याची हिंमत असणार नाही. त्यांच्यामध्ये नवी उमेद निर्माण व्हावी, यासाठी कसून लक्ष घालण्याची व बीपीएल, एपीएल असे भेदभाव न करता शेतीसाठी पूरक व्यवसाय निर्माण करुन शेतकऱ्यांना सन्मानाने जीवन जगता यावे, त्यांची हिंमत, सन्मान ढासळणार नाही.

धान खरेदी केंद्रावर धानाची मोजणी विलंबाने होत आहे. आपला नंबर कधी येणार अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.