शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाच्या वक्रदृष्टीने धान उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:32 IST

भंडारा : यावर्षीच्या खरिपात पूर, किडींचा प्रादुर्भाव व परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नासाडीमुळे धान उत्पादनात कमालीची घट ...

भंडारा : यावर्षीच्या खरिपात पूर, किडींचा प्रादुर्भाव व परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नासाडीमुळे धान उत्पादनात कमालीची घट आली आहे. त्यानंतर पिकाला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार' यासारखी झाली असून शेतकरी हा मजुरापेक्षाही दु:खी असल्याचे बोलले जात आहे. .

भंडारा जिल्ह्याची ओळख ही उद्योगविरहित, सिंचनाच्या सोयींचा अभाव, रबी मालासाठी उपलब्ध नसलेल्या बाजारपेठेचा जिल्हा म्हणून आहे. मुख्य पीक खरीप असल्याने जवळपास ९० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेती म्हणजेच सर्वस्व असल्याने येथील शेतकऱ्यांचे संसाराचे गाळे हे येणाऱ्या पिकावरच अवलंबून असते. अशातही अत्यल्प व कवडीमोल भाव यामुळे सर्व स्वप्नांना तिलांजली दिल्याशिवाय गत्यंतर नाही. इतकेच नाही तर शासनस्तरावरून विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नाहक कागदपत्रे व कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत असल्याने सामान्यांचा जीव मेटाकुटीस आलेला आहे.

जिल्ह्यात असलेल्या खरेदी केंद्रावर धानाची आवक वाढलेली असली तरीही शेतकऱ्यांना चुकाऱ्यांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी पडक्या दरात धानाची विक्री करीत आहे. अडत्याकडे धानांच्या भावांचे बोर्डसुध्दा नाहीत.

त्यामुळे अडत्याने जो भाव सांगितला, त्याच भावात आपला माल विकल्याशिवाय गत्यंतर नसल्याने शेतकरी वर्ग अधिकच खचत असून जीवनाचा अंत स्वीकारण्यास धजावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. म्हणूनच पाच एकर शेती असलेला शेतकरी हा मजुरापेक्षाही दु:खी आहे. तेव्हा 'बळी' न पडता बळीचे राज्य येण्यासाठी शासनाने कंबर कसून अभय देण्याची गरज आहे.

यावर्षी ऐन धान पीक कापणी योग्य असताना विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घट आली आहे. एकरी केवळ आठ ते दहा पोती उत्पादन होत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तर काही शेतकऱ्यांनी धान पिकावर मावा, तुडतुडा रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने धानाची कापणी न करता तसेच ठेवल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहेत.

याकडे सरकारने शेतकऱ्यांची शेती कसण्याची हिंमत असणार नाही. त्यांच्यामध्ये नवी उमेद निर्माण व्हावी, यासाठी कसून लक्ष घालण्याची व बीपीएल, एपीएल असे भेदभाव न करता शेतीसाठी पूरक व्यवसाय निर्माण करुन शेतकऱ्यांना सन्मानाने जीवन जगता यावे, त्यांची हिंमत, सन्मान ढासळणार नाही.

धान खरेदी केंद्रावर धानाची मोजणी विलंबाने होत आहे. आपला नंबर कधी येणार अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.