शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
2
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
3
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
4
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
5
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
6
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
7
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
8
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
9
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
10
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
11
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
12
पाकला पाठिंबा देणं तुर्कस्तान आणि अझरबैजानच्या अंगलट! भारताने थेट वर्मावरच घातला घाव
13
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
14
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
15
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
16
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
18
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
19
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
20
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

सासरा परिसरात ऊस क्षेत्रात घट

By admin | Updated: April 8, 2015 00:50 IST

सासरा व परिसरातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धानशेतीला तसेच अन्य बागायती शेतीला फाटा देवून मोठ्या उत्सुकतेने ऊस शेतीची निवड केली.

शेतकऱ्यांनी फिरविली पाठ : कारखान्यांचा नियोजनशून्य कारभारसासरा : सासरा व परिसरातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धानशेतीला तसेच अन्य बागायती शेतीला फाटा देवून मोठ्या उत्सुकतेने ऊस शेतीची निवड केली. सन २०११-१२ ला देव्हाडा साखर कारखान्याने शेतकऱ्यांना नानाविध प्रलोभने देवून ऊस शेती करायला भाग पाडले. त्यासाठी नियोजनाप्रमाणे ऊस तोडणी, उचलणी व बिलींग योग्य वेळेत पार पाडले. कारखान्याची नियोजनबद्धता व तत्परता विचारात घेवून सासरा व परिसरातील शेतकऱ्यांनी सन २०१२-१३ या गाळप हंगामात सानगडी केंद्रात १३४ हेक्टर शेतजमीनीत २१५ शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली. एकट्या सासरा गावात ११८ शेतकऱ्यांनी एकूण ६० हेक्टर जमिनीत लागवड केली होती. यापैकी आक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त प्रति टन १०० रूपये देऊ केले. या गाळप हंगामात देव्हाडा साखर कारखान्याच्या नियोजनशून्य कारभाराचा शेतकऱ्यांना प्रत्यय आला. हळूहळू शेतकऱ्यांनी ऊस शेतीकडे पाठ फिरवायला सुरू केली.सन २०१२-१३ मध्ये जाहीर केलेले अतिरिक्त प्रती टन १०० रूपये अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाही. परिणामी शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. याच कालावधीत लाखांदूर येथे साखर कारखाना सुरू झाला. देव्हाडा येथे प्रतिटन १७०० रूपये तर लाखांदूर येथे प्रतिटन १८०० रूपये भाव अद्यापही देण्यात येत आहे. पहिल्यावर्षी लाखांदूर कारखान्यानेही ऊस तोडणी, उचल व बिलींग वेळेत दिले पण आज दोन्ही कारखान्याचे चित्र उलट झाल्याचे दिसत आहे. या कारखान्याच्या प्रशासकीय यंत्रणेचे मजूरांवर नियंत्रण नसल्याने कारखान्याकडून मिळणाऱ्या प्रतीटन तोडणी खर्चा व्यतिरिक्त मजूर वर्गाने प्रतीटन २०० ते ४०० रूपयेपर्यंत जादा दर घेऊन शेतकऱ्यांची लूट केली आहे. याविषयी अनेकदा तक्रार करूनही शेतकऱ्यांच्या होणाऱ्या लूटीची दखल घेण्यात न आल्याने तसेच कारखान्यात बिघाड आहे, गाड्याखाली नाहीत, असे नानाविध कारणे पुढे करून शेतकऱ्यांचा तोडलेला ऊस १५ ते २० दिवस पाडून ठेवण्याचाही अनुभव शेतकऱ्यांना आला. परिणामी शेतकऱ्यांनी ऊसशेतीकडे पाठ फिरवली.ऊसशेती करत असतानी शेतकऱ्यांना बराच मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना या चार वर्षाच्या काळात कोणत्याही प्रकारचा गोड अनुभव आला नसल्याच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. अजूनही साखर कारखान्याच्या प्रशासकीय यंत्रणेत नियोजनशून्यता आढळून येत आहे. परिणामी शेतकऱ्यांनी ऊस शेतीकडे पाठ फिरवून पारंपरिक धानशेती व बागायती शेतीचीच निवड केल्याचे दिसून येत आहे. परिणामी सासरा व परिसरात ऊस क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. (वार्ताहर)