शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

सासरा परिसरात ऊस क्षेत्रात घट

By admin | Updated: April 8, 2015 00:50 IST

सासरा व परिसरातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धानशेतीला तसेच अन्य बागायती शेतीला फाटा देवून मोठ्या उत्सुकतेने ऊस शेतीची निवड केली.

शेतकऱ्यांनी फिरविली पाठ : कारखान्यांचा नियोजनशून्य कारभारसासरा : सासरा व परिसरातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धानशेतीला तसेच अन्य बागायती शेतीला फाटा देवून मोठ्या उत्सुकतेने ऊस शेतीची निवड केली. सन २०११-१२ ला देव्हाडा साखर कारखान्याने शेतकऱ्यांना नानाविध प्रलोभने देवून ऊस शेती करायला भाग पाडले. त्यासाठी नियोजनाप्रमाणे ऊस तोडणी, उचलणी व बिलींग योग्य वेळेत पार पाडले. कारखान्याची नियोजनबद्धता व तत्परता विचारात घेवून सासरा व परिसरातील शेतकऱ्यांनी सन २०१२-१३ या गाळप हंगामात सानगडी केंद्रात १३४ हेक्टर शेतजमीनीत २१५ शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली. एकट्या सासरा गावात ११८ शेतकऱ्यांनी एकूण ६० हेक्टर जमिनीत लागवड केली होती. यापैकी आक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त प्रति टन १०० रूपये देऊ केले. या गाळप हंगामात देव्हाडा साखर कारखान्याच्या नियोजनशून्य कारभाराचा शेतकऱ्यांना प्रत्यय आला. हळूहळू शेतकऱ्यांनी ऊस शेतीकडे पाठ फिरवायला सुरू केली.सन २०१२-१३ मध्ये जाहीर केलेले अतिरिक्त प्रती टन १०० रूपये अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाही. परिणामी शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. याच कालावधीत लाखांदूर येथे साखर कारखाना सुरू झाला. देव्हाडा येथे प्रतिटन १७०० रूपये तर लाखांदूर येथे प्रतिटन १८०० रूपये भाव अद्यापही देण्यात येत आहे. पहिल्यावर्षी लाखांदूर कारखान्यानेही ऊस तोडणी, उचल व बिलींग वेळेत दिले पण आज दोन्ही कारखान्याचे चित्र उलट झाल्याचे दिसत आहे. या कारखान्याच्या प्रशासकीय यंत्रणेचे मजूरांवर नियंत्रण नसल्याने कारखान्याकडून मिळणाऱ्या प्रतीटन तोडणी खर्चा व्यतिरिक्त मजूर वर्गाने प्रतीटन २०० ते ४०० रूपयेपर्यंत जादा दर घेऊन शेतकऱ्यांची लूट केली आहे. याविषयी अनेकदा तक्रार करूनही शेतकऱ्यांच्या होणाऱ्या लूटीची दखल घेण्यात न आल्याने तसेच कारखान्यात बिघाड आहे, गाड्याखाली नाहीत, असे नानाविध कारणे पुढे करून शेतकऱ्यांचा तोडलेला ऊस १५ ते २० दिवस पाडून ठेवण्याचाही अनुभव शेतकऱ्यांना आला. परिणामी शेतकऱ्यांनी ऊसशेतीकडे पाठ फिरवली.ऊसशेती करत असतानी शेतकऱ्यांना बराच मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना या चार वर्षाच्या काळात कोणत्याही प्रकारचा गोड अनुभव आला नसल्याच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. अजूनही साखर कारखान्याच्या प्रशासकीय यंत्रणेत नियोजनशून्यता आढळून येत आहे. परिणामी शेतकऱ्यांनी ऊस शेतीकडे पाठ फिरवून पारंपरिक धानशेती व बागायती शेतीचीच निवड केल्याचे दिसून येत आहे. परिणामी सासरा व परिसरात ऊस क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. (वार्ताहर)