शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सासरा परिसरात ऊस क्षेत्रात घट

By admin | Updated: April 8, 2015 00:50 IST

सासरा व परिसरातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धानशेतीला तसेच अन्य बागायती शेतीला फाटा देवून मोठ्या उत्सुकतेने ऊस शेतीची निवड केली.

शेतकऱ्यांनी फिरविली पाठ : कारखान्यांचा नियोजनशून्य कारभारसासरा : सासरा व परिसरातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धानशेतीला तसेच अन्य बागायती शेतीला फाटा देवून मोठ्या उत्सुकतेने ऊस शेतीची निवड केली. सन २०११-१२ ला देव्हाडा साखर कारखान्याने शेतकऱ्यांना नानाविध प्रलोभने देवून ऊस शेती करायला भाग पाडले. त्यासाठी नियोजनाप्रमाणे ऊस तोडणी, उचलणी व बिलींग योग्य वेळेत पार पाडले. कारखान्याची नियोजनबद्धता व तत्परता विचारात घेवून सासरा व परिसरातील शेतकऱ्यांनी सन २०१२-१३ या गाळप हंगामात सानगडी केंद्रात १३४ हेक्टर शेतजमीनीत २१५ शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली. एकट्या सासरा गावात ११८ शेतकऱ्यांनी एकूण ६० हेक्टर जमिनीत लागवड केली होती. यापैकी आक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त प्रति टन १०० रूपये देऊ केले. या गाळप हंगामात देव्हाडा साखर कारखान्याच्या नियोजनशून्य कारभाराचा शेतकऱ्यांना प्रत्यय आला. हळूहळू शेतकऱ्यांनी ऊस शेतीकडे पाठ फिरवायला सुरू केली.सन २०१२-१३ मध्ये जाहीर केलेले अतिरिक्त प्रती टन १०० रूपये अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाही. परिणामी शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. याच कालावधीत लाखांदूर येथे साखर कारखाना सुरू झाला. देव्हाडा येथे प्रतिटन १७०० रूपये तर लाखांदूर येथे प्रतिटन १८०० रूपये भाव अद्यापही देण्यात येत आहे. पहिल्यावर्षी लाखांदूर कारखान्यानेही ऊस तोडणी, उचल व बिलींग वेळेत दिले पण आज दोन्ही कारखान्याचे चित्र उलट झाल्याचे दिसत आहे. या कारखान्याच्या प्रशासकीय यंत्रणेचे मजूरांवर नियंत्रण नसल्याने कारखान्याकडून मिळणाऱ्या प्रतीटन तोडणी खर्चा व्यतिरिक्त मजूर वर्गाने प्रतीटन २०० ते ४०० रूपयेपर्यंत जादा दर घेऊन शेतकऱ्यांची लूट केली आहे. याविषयी अनेकदा तक्रार करूनही शेतकऱ्यांच्या होणाऱ्या लूटीची दखल घेण्यात न आल्याने तसेच कारखान्यात बिघाड आहे, गाड्याखाली नाहीत, असे नानाविध कारणे पुढे करून शेतकऱ्यांचा तोडलेला ऊस १५ ते २० दिवस पाडून ठेवण्याचाही अनुभव शेतकऱ्यांना आला. परिणामी शेतकऱ्यांनी ऊसशेतीकडे पाठ फिरवली.ऊसशेती करत असतानी शेतकऱ्यांना बराच मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना या चार वर्षाच्या काळात कोणत्याही प्रकारचा गोड अनुभव आला नसल्याच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. अजूनही साखर कारखान्याच्या प्रशासकीय यंत्रणेत नियोजनशून्यता आढळून येत आहे. परिणामी शेतकऱ्यांनी ऊस शेतीकडे पाठ फिरवून पारंपरिक धानशेती व बागायती शेतीचीच निवड केल्याचे दिसून येत आहे. परिणामी सासरा व परिसरात ऊस क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. (वार्ताहर)