शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
3
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
4
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
5
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
6
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
7
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
8
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
9
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
10
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
11
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
12
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
13
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
14
रेल्वे तिकीट बुकिंगवर परिणाम दिसू लागला! बराच वेळ झाला तरी तत्काळ तिकीटे उपलब्ध होती...
15
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
16
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...
17
प्रेमासाठी बदललं जेंडर, पती निघाला फ्रॉड, पैसे-प्रॉपर्टीचा होता लालची, ट्रांसजेंडर अभिनेत्रीचा खुलासा
18
कळव्यातील महिलेच्या हत्येचं कोडं सुटलं, ४० हजार...; बिहारमधून दोघांना अटक, अल्पवयीन मुलाचाही समावेश
19
चमचमीत खायला आवडतं पण पावसाळ्यात थांबा; छोटासा निष्काळजीपणा अन् आजारांना आमंत्रण
20
आपल्या डोक्यात हवा गेली होती, म्हणूनच...; 'राशीचक्र'कार शरद उपाध्ये यांचं निलेश साबळेला खुलं पत्र

शेतमालाच्या भावात घट

By admin | Updated: June 21, 2014 01:00 IST

केंद्रात नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचे अच्छे दिन येणार असे वातावरण तयार केले.

कोंढा (कोसरा) : केंद्रात नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचे अच्छे दिन येणार असे वातावरण तयार केले. पण उन्हाळी धानाच्या भावात तसेच अनेक पिकाच्या भावात लक्षणीय घट झाली. बासमतीसारखे सुगंधी धान १३०० रूपये प्रति क्विंटल विकावे लागते. त्यामुळे व्यापारी मध्यस्थांसाठी चांगले दिवस आले, असे शेतकरी बोलत आहेत.परिसरात जून महिन्यात शेतकरी उन्हाळी धान पिकाची विक्री तसेच खरीप हंगामासाठी बी बियाणे खरेदी व शेतीचा हंगाम करण्यात व्यस्त असते. पेरणी करण्यासाठी वापरत असलेल्या बि-बियाणाचे भाव गगनाला भिडले आहे. नवीन सरकार केंद्रात आल्यानंतर बि-बियाणे यांचे भाव कमी होईल ती अपेक्षा पूर्ण झाली नाही. धानाला योग्य भत्तव मिळेल असे वाटत होते. पण शेतमालाच्या भावात लक्षणीय घट झाली आहे. बासमती धानाला खरेदी करणारे व्यापारी मातीमोल म्हणजे १३०० रूपये भाव देत आहेत. जून महिन्याच्या शेवटी घरोघरी मुलांचे गणवेश, शाळा प्रवेश वह्या पुस्तके याची खरेदीवर भर असते.अशावेळी किंमती वाढलेल्या दिसतील तेव्हा अच्छे दिन येणार ही एक कल्पनाच राहणार आहे. केंद्र सरकारने महागाई कमी करण्यासाठी आश्वासन दिले पण त्यासाठी कोणते पाऊले उचलणार हे जाहीर केले नाही. भाजीपाला, कांदे यांचे भाव वाढतच आहे तेव्हा सामान्य नागरिकांना याचा सामना करावा लागतो. शेतकऱ्याच्या भावाला मात्र बाजारपेठेत घट झाल्याची दिसते आहे. मुंगाच्या भावात क्विंटलला दोन हजार उळीद क्विंटलला ७०० रूपये गव्हाच्या क्विंटलला ४५० रूपये घट झाली आहे,असे सर्वच शेतमालाच्या भावात घट झाल्याने शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. (वार्ताहर)