शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

दुष्काळ घोषित करून एकरी २५ हजारांची मदत द्या

By admin | Updated: September 16, 2015 00:33 IST

संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा व शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रूपयाची आर्थिक मदत द्यावी,

शेतकरी संकटात : वाडीभस्मे यांची मागणीसाकोली : संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा व शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रूपयाची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच तालुका अध्यक्ष हेमकृष्ण वाडीभस्मे यांनी केली आहे.कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ अशा या चक्रव्यूहात शेतकरी जीवन जगत आहे. मागील तीन वर्षापासून शेतकरी दुष्काळाच्या चक्रव्यूहात सापडला आहे. याहीवर्षी सुरुवातीला दमदार पाऊस पडला. मात्र त्यानंतर पाऊस बेपत्ताच झाला. अधामधात पाऊस येतो व जातो. मात्र शेतीला समाधानकारक पाणी अजुनही मिळाला नाही. या अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील तलाव, नदी नाले, बोळ्या पुर्णपणे भरले नाही. त्यामुळे उन्हाळ्यापर्यंत जलसाठा पुरणार नाही, अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.या अडचणीतूनही शेतकऱ्यांनी कसेबसे पिक वाचविण्याचा प्रयत्न केला.मात्र आता पुन्हा करपा व खोडकीडा या रोगाने धनपिकावर हैदोस घातला. त्यामुळे शेतकरी पुरता खचला आहे. यावर्षीही उत्पन्न मिळेल याची हमखास हमी नाही त्यामुळे शासनाने भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून एकरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वाडीभस्मे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)