शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 22:21 IST

अपूऱ्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळ निर्माण झाला आहे. हजारो हेक्टरवरील धान पीक नष्ट झाले आहे. त्यानंतरही शासनाने दुष्काळग्रस्तांच्या यादीतून भंडारा जिल्ह्याचे नाव वगळले आहे. संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा.

ठळक मुद्देशिवसेनेचे निवेदन : महिला रुग्णालयाचे बांधकाम करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अपूऱ्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळ निर्माण झाला आहे. हजारो हेक्टरवरील धान पीक नष्ट झाले आहे. त्यानंतरही शासनाने दुष्काळग्रस्तांच्या यादीतून भंडारा जिल्ह्याचे नाव वगळले आहे. संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा. तसेच जिल्हा महिला रुग्णालयाचे बांधकाम तातडीने सुरु करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात सोमवारी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. भंडारा जिल्ह्यात यंदा अपूºया व पावसाने दुष्काळ निर्माण झाला आहे. धान पीकाचे उत्पादन घटले आहे. आधारभूत धान खरेदी केंद्रावर आवक घटली आहे. असे असतांनाही शासनाने घोषित केलेल्या दुष्काळाच्या यादीत भंडारा जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नाही, त्यामुळे शेतकरी दुष्काळग्रस्तांना मिळणाºया लाभापासून वंचित राहणार आहेत. यासाठी शासनाने तात्काळ संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी मागणी करण्यात आली.भंडारा येथे स्वतंत्र जिल्हा महिला रुग्णालय मंजूर झाले आहे. त्यासाठी आवश्यक तो निधी शासनाने मंजूर केला आहे. दोन वर्षांपुर्वी शासनाने २५ लाख रुपये टोकन निधी उपलब्ध करुन दिला. पंरतू अनेक महिने लोटूनही बांधकाम विभागाने रुग्णालय बांधकामाचे अंदाजपत्रक तयार केले नाही. महिला रुग्णालयाकरिता राज्य शासन सकारात्मक आहेत. त्यानंतर चार कोटी २६ लाख रुपये उपलब्ध करुन देण्यात आले. एकंदरीत रुग्णालयाकरिता चार कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध असूनही पुढील कारवाई थंडबस्त्यात आहे. याप्रकरणी योग्य निर्देश देण्याची सुचना निवेदनातून करण्यात आली.या निवेदनावर शिवसेनेचे संजय रेहपाडे, लवकुश निर्वाण, प्रकाश मेश्राम, नरेश बावनकर, नितीन सेलोकर, नितीन पडोळे, नितेश वाडीभस्मे, मिलिंद खवास, नितेश पाटील, मनोहर जांगळे, जयंत परतेकी, दामोदर इटनकर, सुधीर लेंडे, मनोज जागळे, नरेश कारेमोरे, किशोन चन्ने, उपेंद्र बनकर, धनराज लांडे, सुरेश धुर्वे, राजेश बुराडे, किशोर यादव, देवानंद उके आदींच्या स्वाक्षºया आहेत.याप्रकरणात शासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आंदोलनाचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. आता शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.