शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 22:21 IST

अपूऱ्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळ निर्माण झाला आहे. हजारो हेक्टरवरील धान पीक नष्ट झाले आहे. त्यानंतरही शासनाने दुष्काळग्रस्तांच्या यादीतून भंडारा जिल्ह्याचे नाव वगळले आहे. संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा.

ठळक मुद्देशिवसेनेचे निवेदन : महिला रुग्णालयाचे बांधकाम करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अपूऱ्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळ निर्माण झाला आहे. हजारो हेक्टरवरील धान पीक नष्ट झाले आहे. त्यानंतरही शासनाने दुष्काळग्रस्तांच्या यादीतून भंडारा जिल्ह्याचे नाव वगळले आहे. संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा. तसेच जिल्हा महिला रुग्णालयाचे बांधकाम तातडीने सुरु करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात सोमवारी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. भंडारा जिल्ह्यात यंदा अपूºया व पावसाने दुष्काळ निर्माण झाला आहे. धान पीकाचे उत्पादन घटले आहे. आधारभूत धान खरेदी केंद्रावर आवक घटली आहे. असे असतांनाही शासनाने घोषित केलेल्या दुष्काळाच्या यादीत भंडारा जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नाही, त्यामुळे शेतकरी दुष्काळग्रस्तांना मिळणाºया लाभापासून वंचित राहणार आहेत. यासाठी शासनाने तात्काळ संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी मागणी करण्यात आली.भंडारा येथे स्वतंत्र जिल्हा महिला रुग्णालय मंजूर झाले आहे. त्यासाठी आवश्यक तो निधी शासनाने मंजूर केला आहे. दोन वर्षांपुर्वी शासनाने २५ लाख रुपये टोकन निधी उपलब्ध करुन दिला. पंरतू अनेक महिने लोटूनही बांधकाम विभागाने रुग्णालय बांधकामाचे अंदाजपत्रक तयार केले नाही. महिला रुग्णालयाकरिता राज्य शासन सकारात्मक आहेत. त्यानंतर चार कोटी २६ लाख रुपये उपलब्ध करुन देण्यात आले. एकंदरीत रुग्णालयाकरिता चार कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध असूनही पुढील कारवाई थंडबस्त्यात आहे. याप्रकरणी योग्य निर्देश देण्याची सुचना निवेदनातून करण्यात आली.या निवेदनावर शिवसेनेचे संजय रेहपाडे, लवकुश निर्वाण, प्रकाश मेश्राम, नरेश बावनकर, नितीन सेलोकर, नितीन पडोळे, नितेश वाडीभस्मे, मिलिंद खवास, नितेश पाटील, मनोहर जांगळे, जयंत परतेकी, दामोदर इटनकर, सुधीर लेंडे, मनोज जागळे, नरेश कारेमोरे, किशोन चन्ने, उपेंद्र बनकर, धनराज लांडे, सुरेश धुर्वे, राजेश बुराडे, किशोर यादव, देवानंद उके आदींच्या स्वाक्षºया आहेत.याप्रकरणात शासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आंदोलनाचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. आता शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.