शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 22:21 IST

अपूऱ्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळ निर्माण झाला आहे. हजारो हेक्टरवरील धान पीक नष्ट झाले आहे. त्यानंतरही शासनाने दुष्काळग्रस्तांच्या यादीतून भंडारा जिल्ह्याचे नाव वगळले आहे. संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा.

ठळक मुद्देशिवसेनेचे निवेदन : महिला रुग्णालयाचे बांधकाम करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अपूऱ्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळ निर्माण झाला आहे. हजारो हेक्टरवरील धान पीक नष्ट झाले आहे. त्यानंतरही शासनाने दुष्काळग्रस्तांच्या यादीतून भंडारा जिल्ह्याचे नाव वगळले आहे. संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा. तसेच जिल्हा महिला रुग्णालयाचे बांधकाम तातडीने सुरु करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात सोमवारी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. भंडारा जिल्ह्यात यंदा अपूºया व पावसाने दुष्काळ निर्माण झाला आहे. धान पीकाचे उत्पादन घटले आहे. आधारभूत धान खरेदी केंद्रावर आवक घटली आहे. असे असतांनाही शासनाने घोषित केलेल्या दुष्काळाच्या यादीत भंडारा जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नाही, त्यामुळे शेतकरी दुष्काळग्रस्तांना मिळणाºया लाभापासून वंचित राहणार आहेत. यासाठी शासनाने तात्काळ संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी मागणी करण्यात आली.भंडारा येथे स्वतंत्र जिल्हा महिला रुग्णालय मंजूर झाले आहे. त्यासाठी आवश्यक तो निधी शासनाने मंजूर केला आहे. दोन वर्षांपुर्वी शासनाने २५ लाख रुपये टोकन निधी उपलब्ध करुन दिला. पंरतू अनेक महिने लोटूनही बांधकाम विभागाने रुग्णालय बांधकामाचे अंदाजपत्रक तयार केले नाही. महिला रुग्णालयाकरिता राज्य शासन सकारात्मक आहेत. त्यानंतर चार कोटी २६ लाख रुपये उपलब्ध करुन देण्यात आले. एकंदरीत रुग्णालयाकरिता चार कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध असूनही पुढील कारवाई थंडबस्त्यात आहे. याप्रकरणी योग्य निर्देश देण्याची सुचना निवेदनातून करण्यात आली.या निवेदनावर शिवसेनेचे संजय रेहपाडे, लवकुश निर्वाण, प्रकाश मेश्राम, नरेश बावनकर, नितीन सेलोकर, नितीन पडोळे, नितेश वाडीभस्मे, मिलिंद खवास, नितेश पाटील, मनोहर जांगळे, जयंत परतेकी, दामोदर इटनकर, सुधीर लेंडे, मनोज जागळे, नरेश कारेमोरे, किशोन चन्ने, उपेंद्र बनकर, धनराज लांडे, सुरेश धुर्वे, राजेश बुराडे, किशोर यादव, देवानंद उके आदींच्या स्वाक्षºया आहेत.याप्रकरणात शासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आंदोलनाचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. आता शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.