शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

देव्हाडीतील रेल्वे तलावाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 22:44 IST

भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. परंतु जिल्ह्यातील तलावांची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. देव्हाडी येथील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रेल्वे तलावाची सध्या दुरवस्था झाली आहे. स्वच्छ भारत अभियान योजनेचा फज्जा उडाला आहे. सन १९५२ च्या लोकसभा निवडणुकीची प्रचारसभा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथे घेतली होती हे विशेष.

ठळक मुद्देतलवाला ऐतिहासिक महत्त्व : जलपर्णी वनस्पतीचा वेढा, माशांचा जीव धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. परंतु जिल्ह्यातील तलावांची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. देव्हाडी येथील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रेल्वे तलावाची सध्या दुरवस्था झाली आहे. स्वच्छ भारत अभियान योजनेचा फज्जा उडाला आहे. सन १९५२ च्या लोकसभा निवडणुकीची प्रचारसभा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथे घेतली होती हे विशेष.देव्हाडी तुमसर रोड येथे बाजार चौकात ब्रिटीशकालीन विस्तीर्ण रेल्वेच्या मालकीचा तलाव आहे. मागील तीन वर्षापासून तलावाची दूरावस्था झाली आहे. तलावात जलपर्णी वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढली असून सर्वत्र जलपर्णीची मोठी पाने पसरली आहेत. संपूर्ण तलावच जलपर्णीच्या विळख्यात गेला आहे. तलावात कचरा सुद्धा पडून आहे. येथील जीव जलपर्णीमुळे धोक्यात आले आहे. इतकी जलपर्णी वनस्पती तलावात आहे.सन १९५२ मध्ये राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भंडारा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविली होती. दरम्यान डॉ. बाबासाहेबांची जंगी प्रचारसभा याच तलावाच्या रिकाम्या जागेत घेतली होती. ही आठवण व तिचे महात्म्य आजही आहे.बाबासाहेबांच्या पदस्पर्धाने हा तलाव पावन झाला आहे. तलावावर रेतीची मालकी आहे. रेल्वे प्रशासनाने २५ मार्च रोजी तलाव स्वच्छता आणि गाळी, मासेमारी करिता निविदा प्रकाशित केली आहे. पाच वर्षाकरिता हा तलाव लिलाव करण्याचा निर्णय दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय अभियंत्यांनी काढला आहे. तलावाच्या शेजारीच रेल्वेचे कार्यालय व विभागीय अभियंत्यांची सदनिका आहे.तलावाच्या काठावरून तुडका व स्टेशनटोली गावाकडे जाणारा रस्ता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झुडपी जंगल तयार झाले आहे. वळणमार्ग वाहन धारकांकरिता धोकादायक ठरला आहे. तीन वर्षापुर्वी या रस्त्यावर एका युवकाचा अपघातात मृत्यू झाला होता. समोरचे वाहन येथे दिसत नाही.रेल्वे प्रशासन स्वच्छ भारत अभियान एक कदम स्वच्छता की ओर असे घोषवाक्य तयार करून मोठा गाजावाजा स्वच्छतेचा करीत आहे, परंतु प्रत्यक्षात येथे दिव्याखाली अंधार दिसत आहे. ऐतिहासिक तलावामध्ये पुनरूज्जीवन करण्याकरिता रेल्वे प्रशासनाने गंभीरतेने दखल घेण्याची गरज आहे.ऐतिहासिक महत्त्व व डॉ. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तलावाची दुरवस्थेला रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. स्वच्छ भारत अभियानाचा विसर रेल्वे प्रशासनाला पडला आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे तक्रार करणार आहे.-डॉ. पंकज कारेमोरे, तुमसर.