शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
8
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
11
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
12
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
13
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
14
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
15
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
16
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
17
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
18
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
19
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
20
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक

देव्हाडीतील रेल्वे तलावाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 22:44 IST

भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. परंतु जिल्ह्यातील तलावांची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. देव्हाडी येथील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रेल्वे तलावाची सध्या दुरवस्था झाली आहे. स्वच्छ भारत अभियान योजनेचा फज्जा उडाला आहे. सन १९५२ च्या लोकसभा निवडणुकीची प्रचारसभा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथे घेतली होती हे विशेष.

ठळक मुद्देतलवाला ऐतिहासिक महत्त्व : जलपर्णी वनस्पतीचा वेढा, माशांचा जीव धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. परंतु जिल्ह्यातील तलावांची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. देव्हाडी येथील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रेल्वे तलावाची सध्या दुरवस्था झाली आहे. स्वच्छ भारत अभियान योजनेचा फज्जा उडाला आहे. सन १९५२ च्या लोकसभा निवडणुकीची प्रचारसभा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथे घेतली होती हे विशेष.देव्हाडी तुमसर रोड येथे बाजार चौकात ब्रिटीशकालीन विस्तीर्ण रेल्वेच्या मालकीचा तलाव आहे. मागील तीन वर्षापासून तलावाची दूरावस्था झाली आहे. तलावात जलपर्णी वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढली असून सर्वत्र जलपर्णीची मोठी पाने पसरली आहेत. संपूर्ण तलावच जलपर्णीच्या विळख्यात गेला आहे. तलावात कचरा सुद्धा पडून आहे. येथील जीव जलपर्णीमुळे धोक्यात आले आहे. इतकी जलपर्णी वनस्पती तलावात आहे.सन १९५२ मध्ये राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भंडारा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविली होती. दरम्यान डॉ. बाबासाहेबांची जंगी प्रचारसभा याच तलावाच्या रिकाम्या जागेत घेतली होती. ही आठवण व तिचे महात्म्य आजही आहे.बाबासाहेबांच्या पदस्पर्धाने हा तलाव पावन झाला आहे. तलावावर रेतीची मालकी आहे. रेल्वे प्रशासनाने २५ मार्च रोजी तलाव स्वच्छता आणि गाळी, मासेमारी करिता निविदा प्रकाशित केली आहे. पाच वर्षाकरिता हा तलाव लिलाव करण्याचा निर्णय दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय अभियंत्यांनी काढला आहे. तलावाच्या शेजारीच रेल्वेचे कार्यालय व विभागीय अभियंत्यांची सदनिका आहे.तलावाच्या काठावरून तुडका व स्टेशनटोली गावाकडे जाणारा रस्ता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झुडपी जंगल तयार झाले आहे. वळणमार्ग वाहन धारकांकरिता धोकादायक ठरला आहे. तीन वर्षापुर्वी या रस्त्यावर एका युवकाचा अपघातात मृत्यू झाला होता. समोरचे वाहन येथे दिसत नाही.रेल्वे प्रशासन स्वच्छ भारत अभियान एक कदम स्वच्छता की ओर असे घोषवाक्य तयार करून मोठा गाजावाजा स्वच्छतेचा करीत आहे, परंतु प्रत्यक्षात येथे दिव्याखाली अंधार दिसत आहे. ऐतिहासिक तलावामध्ये पुनरूज्जीवन करण्याकरिता रेल्वे प्रशासनाने गंभीरतेने दखल घेण्याची गरज आहे.ऐतिहासिक महत्त्व व डॉ. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तलावाची दुरवस्थेला रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. स्वच्छ भारत अभियानाचा विसर रेल्वे प्रशासनाला पडला आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे तक्रार करणार आहे.-डॉ. पंकज कारेमोरे, तुमसर.