शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
4
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
5
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
6
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
7
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
8
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
9
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
10
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
11
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
12
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
13
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
14
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
15
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
16
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
17
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
18
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
19
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

देव्हाडीतील रेल्वे तलावाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 22:44 IST

भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. परंतु जिल्ह्यातील तलावांची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. देव्हाडी येथील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रेल्वे तलावाची सध्या दुरवस्था झाली आहे. स्वच्छ भारत अभियान योजनेचा फज्जा उडाला आहे. सन १९५२ च्या लोकसभा निवडणुकीची प्रचारसभा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथे घेतली होती हे विशेष.

ठळक मुद्देतलवाला ऐतिहासिक महत्त्व : जलपर्णी वनस्पतीचा वेढा, माशांचा जीव धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. परंतु जिल्ह्यातील तलावांची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. देव्हाडी येथील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रेल्वे तलावाची सध्या दुरवस्था झाली आहे. स्वच्छ भारत अभियान योजनेचा फज्जा उडाला आहे. सन १९५२ च्या लोकसभा निवडणुकीची प्रचारसभा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथे घेतली होती हे विशेष.देव्हाडी तुमसर रोड येथे बाजार चौकात ब्रिटीशकालीन विस्तीर्ण रेल्वेच्या मालकीचा तलाव आहे. मागील तीन वर्षापासून तलावाची दूरावस्था झाली आहे. तलावात जलपर्णी वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढली असून सर्वत्र जलपर्णीची मोठी पाने पसरली आहेत. संपूर्ण तलावच जलपर्णीच्या विळख्यात गेला आहे. तलावात कचरा सुद्धा पडून आहे. येथील जीव जलपर्णीमुळे धोक्यात आले आहे. इतकी जलपर्णी वनस्पती तलावात आहे.सन १९५२ मध्ये राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भंडारा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविली होती. दरम्यान डॉ. बाबासाहेबांची जंगी प्रचारसभा याच तलावाच्या रिकाम्या जागेत घेतली होती. ही आठवण व तिचे महात्म्य आजही आहे.बाबासाहेबांच्या पदस्पर्धाने हा तलाव पावन झाला आहे. तलावावर रेतीची मालकी आहे. रेल्वे प्रशासनाने २५ मार्च रोजी तलाव स्वच्छता आणि गाळी, मासेमारी करिता निविदा प्रकाशित केली आहे. पाच वर्षाकरिता हा तलाव लिलाव करण्याचा निर्णय दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय अभियंत्यांनी काढला आहे. तलावाच्या शेजारीच रेल्वेचे कार्यालय व विभागीय अभियंत्यांची सदनिका आहे.तलावाच्या काठावरून तुडका व स्टेशनटोली गावाकडे जाणारा रस्ता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झुडपी जंगल तयार झाले आहे. वळणमार्ग वाहन धारकांकरिता धोकादायक ठरला आहे. तीन वर्षापुर्वी या रस्त्यावर एका युवकाचा अपघातात मृत्यू झाला होता. समोरचे वाहन येथे दिसत नाही.रेल्वे प्रशासन स्वच्छ भारत अभियान एक कदम स्वच्छता की ओर असे घोषवाक्य तयार करून मोठा गाजावाजा स्वच्छतेचा करीत आहे, परंतु प्रत्यक्षात येथे दिव्याखाली अंधार दिसत आहे. ऐतिहासिक तलावामध्ये पुनरूज्जीवन करण्याकरिता रेल्वे प्रशासनाने गंभीरतेने दखल घेण्याची गरज आहे.ऐतिहासिक महत्त्व व डॉ. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तलावाची दुरवस्थेला रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. स्वच्छ भारत अभियानाचा विसर रेल्वे प्रशासनाला पडला आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे तक्रार करणार आहे.-डॉ. पंकज कारेमोरे, तुमसर.