शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

आरक्षित आसनावरून उद्भवतात वाद

By admin | Updated: May 6, 2015 00:42 IST

विविध घटकांना प्रवास सुखकर व्हावा, यासाठी राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसमध्ये ६० पैकी तब्बल २० आसने ...

प्रवासी अनभिज्ञ : बस सुटण्यापूर्वीच जागा आरक्षित करणे आवश्यकतुमसर : विविध घटकांना प्रवास सुखकर व्हावा, यासाठी राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसमध्ये ६० पैकी तब्बल २० आसने आरक्षित केलेली आहेत. मात्र ठराविक घटकांसाठी आसन आरक्षित असले तरी ते आसन बसगाडी आगारातून सुटण्यापूर्वीच ताब्यात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे बस निघाल्यानंतर कोणत्याही आसनाचे आरक्षण ग्राह्य धरले जात नाहीत. पण तरीही या आरक्षित जागांवरून प्रवासादरम्यान अनेक सल्ले उपदेश सहकारी प्रवाशांकडून एकमेकांना दिले जातात. त्यातून बसमध्ये वादावादी होत असल्याचे चित्र बरेचदा पहावयास मिळते.राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसमध्ये महिलांसाठी ६, ज्येष्ठ नागरिकांसाठी ४, अपंग व्यक्तींकरिता २, स्वातंत्र्य सैनिकांसाठी २, खासदार आमदार यांच्यासाठी १, राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी यांच्यासाठी २ ाअणि वाहकासाठी १, पत्रकारांसाठी २ याप्रमाणे आसने आरक्षित केली आहेत.याबाबत बसच्या खिडकीजवळ तसेच आसनांवर उल्लेख केलेला असतो. परंतु या आसनांचे कुणी रितसर आरक्षण करताना दिसत नाही. तरीही बसमध्ये ही जागा महिलांसाठी राखीव आहे. येथे महिला उभी असताना पुरुष मात्र दिमाखात बसलेले आहेत. असे टोमणे प्रवासादरम्यान अनेकांना ऐकावयास मिळतात. पण हे आरक्षण एस.टी. बसमध्ये चढून सीटवर रुमाल टाकल्याप्रमाणे होत नाही. तर त्याकरिता प्रवाशाला निघण्यापूर्वीच या आसनांचे आरक्षण निश्चित करावे लागते किंवा बसस्थानकावर बसमध्ये चढल्यानंतर वाहकाकडून आपल्या आरक्षित जागेचे तिकीट घ्यावे लागते. स्थानकावरून बस निघाल्यानंतर दरम्यानचे स्थानक, थांबा या ठिकाणावरून या जागा आरक्षित होत नाहीत हे विशेष. प्रवासादरम्यान काही ज्येष्ठ नागरिक, महिला उभ्या असल्याचे पाहून काही प्रवासी त्यांच्या आरक्षित जागांवर बसलेल्या नियमांची माहिती नसताना नुसता आव आणताना दिसतात. (तालुका प्रतिनिधी)एसटी वाहक बसतात शांतदुसरीकडे मात्र दादागिरी करणाऱ्या प्रवाशांना बोलण्याची हिंमत कुणी दाखवत नाही. स्थानकावर बस लागताच खिडकीतून आतमध्ये रुमाल व सामान ठेवून त्या आसनवर आपला हक्क सांगणारे प्रवासी आहेत. राज्य परिवहन महामंडळाने प्रशासनाला आणि वाहकासोबत बसमधील प्रवाशांना हा प्रकार दिसत असताना ते मात्र शांत बसून असतात.आरक्षित जागांबाबत प्रवासी अनभिज्ञबसमध्ये आसनाच्या खिडकीजवळ जागांचे आरक्षण दिलेले असते. मात्र इतर नियम व कायद्याची माहिती ज्याप्रमाणे बसमध्ये लिहिलेली असते त्याप्रमाणे आरक्षित जागेबाबतच्या नियमांची माहिती एकाही बसमध्ये लिहिलेली नसते. त्याबाबत माहिती नसल्यामुळे या आरक्षित जागांवरून वाद उद्भवतात. बसचा संपूर्ण प्रवास कटकटीचा होऊन जातो.