शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 22:42 IST

तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील रनेरा गावानजीक सिलेगाव फाट्याजवळ दुचाकी चालकाने सायकलस्वारास जोरदार धडक दिली. या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देदोन जखमी : तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील घटना

आॅनलाईन लोकमतचुल्हाड (सिहोरा) : तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील रनेरा गावानजीक सिलेगाव फाट्याजवळ दुचाकी चालकाने सायकलस्वारास जोरदार धडक दिली. या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला. तर अन्य २ जण जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. मनोज शरणागत (२५) रा. सिहोरा असे मृत तरुणाचे नाव आहे.तुमसर-बपेरा राज्य मार्गावर खड्डेच खड्डे आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताची श्रृंखला सुरु झाली आहे. दररोज अपघात घडत आहेत. या खड्ड्यांनी दोन वर्षात ११ जणांचा बळी घेतला आहे. राज्य मार्गावरुन रहदारी करणारे वाहनधारक असुरक्षित असल्याचा अनुभव घेत आहेत. शनिवारी सिहोरा येथील मनोज शरणागत आणि तोषिण शेख हे दोघे मित्र दुचाकी क्रमांक एम एच ४० झेड ३७७२ ने तुमसरकडे निघाले. राज्यमार्गावर सिलेगावकडून सायकलने सुखलाल पारधी हे येत होते. यात दुचाकीने सायकलस्वारला जोरदार धडक दिली. या धडकेत मनोज शरणागत (२५) रा. सिहोरा हा गंभीर जखमी झाला. उपचाराकरिता नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेला तोषिण शेख आणि सायकलस्वार सुखलाल पारधी हे गंभीर जखमी झाले. गावकरी आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना तुमसरच्या रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. मनोजचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता तुमसर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. सिहोरा पोलीसांनी घटनेची नोंद केली असून तपास पोलीस निरीक्षक मनोहर कोरोटी यांच्या मार्गदर्शनात जयसिंग लिल्हारे करित आहेत.वाहनाच्या धडकेत वाहक जखमीचुल्हाड (सिहोरा) : तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील सिंदपुरी येथे राज्य मार्गाच्या कडेला उभा असलेल्या चैतन्य संजय शरणागत (५) वर्ष या बालकाला बपेराहून तुमसरकडे जाणाºया दुधाची वाहतूक करणाºया वाहनाने धडक दिली. जखमी बालकाला सिहोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. प्रत्यक्षदर्शीनी धडक देणाºया वाहनाचे क्रमांक एम एच ३६- ३२०७ असल्याची माहिती दिली आहे. तुमसर बपेरा राज्य मार्गावर दोन दिवसात दोन अपघात घडले. दुधाची वाहतुक करणाºया वाहनाने बालकाला धडक दिल्यानंतर सिलेगावात एका घराच्या सुरक्षा भिंतीला धडक दिली. या अज्ञात वाहनाचा शोध वाहतुक पोलीस सतीश सार्वे घेत आहेत.वळणावर फलक नाहीतराज्य मार्गाची थातुरमातुर दुरुस्ती, यामुळे मार्गाची स्थिती ‘जैसे थे’ आहे. या राज्य मार्गावर अनेक नागमोडी वळण आहेत. या वळणावर दिशादर्शक फलक लावण्यात आले नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग (शहर) चे यात सातत्याने दुर्लक्ष होत आहे. या विभागाच्या यंत्रणेला अपघाताला जबाबदार धरण्यात येत आहे.