शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

पत्नीपाठोपाठ पतीचाही मृत्यू

By admin | Updated: September 29, 2014 00:37 IST

तालुक्यातील झिरोबा येथील एका दाम्पत्याला डेंग्यू आजाराची लागण झाली. यात पत्नीचा मृत्यू झाला. तर उपचारादरम्यान अल्पावधीतच पतीचाही मृत्यू झाला. मनाबाई नामदेव देसाई

डेंग्यूने घेतला बळी : झिरोबा येथील घटना, गावात हळहळलाखांदूर : तालुक्यातील झिरोबा येथील एका दाम्पत्याला डेंग्यू आजाराची लागण झाली. यात पत्नीचा मृत्यू झाला. तर उपचारादरम्यान अल्पावधीतच पतीचाही मृत्यू झाला. मनाबाई नामदेव देसाई (५०) व पती नामदेव अशी मृतांची नावे आहेत. झिरोबा येथील मनाबाई नामदेव देसाई (५०) व पती नामदेव यांना डेंग्यूची लागण झाली होती. मिनाबाईचा १८ सप्टेंबरला डेंग्यूने मृत्यू झाला होता. तर पती नामदेव यांना नागपूर येथील मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मागील दहा दिवसांपासून नामदेव हे मृत्यूशी झुंज देत होते. अखेर दहा दिवसानंतर डेंग्यू या आजाराशी असलेली त्यांची झुंज संपली अन् त्यांना मृत्यूने कवटाळले. डेंग्यू आजाराने पती, पत्नीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मात्र डेंग्यूमुळे पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. डेंग्यू आजाराने तालुक्यात थैमान घातले असताना आरोग्य विभागाने अद्याप ठोस पावले उचलली नसल्या कारणाने दररोज खासगी व ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल होत आहेत. डेंग्यू आजाराच्या उपचाराकरिता लागणारा खर्च जास्त असल्याने तो पलवत नसल्याने अनेक ग्रामस्थ शासकीय आरोग्य सुविधांची आस धरून आहेत. यात त्यांची प्रकृती खालावत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात डेंग्यू आजाराच्या तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा नाही. सोबतच उपचारासाठी लागणारे साहित्य नाही. त्यामुळे खासगी प्रयोगशाळेत केवळ डेंग्यू आहे किंवा नाही या संबंधाने तपासणी करण्यापलीकडे ग्रामीणांना पर्याय उरला नाही. आर्थिक बाब पुढे येत असल्याने रूग्ण खासगी रुग्णालयाकडे धाव घेत नाही. सद्यस्थितीत खासगी व शासकीय रुग्णालयात शेकडो डेंग्यूचे रुग्ण उपचाराकरिता भरती आहेत. यात शाळकरी मुलांपासून वयोवृद्धापर्यंत रुग्णांचा समावेश आहे. मृतक नामदेवला एक मुलगा व दोन मुली आहेत. आरोग्य विभाग तथा ग्रामपंचायतीने ठोस पावले उचलून आरोग्यासंदर्भात जनजागृती व फवारणी न केल्यास डेंग्यूने मृत्यूची संख्या झपाट्याने वाढणार अशी भिती व्यक्त केली जात आहे. आरोग्य विभागाने त्वरीत दखल घेऊन तालुक्यतील अनेक गावांमध्ये आरोग्य शिबीर लावावे, अशी नागरिकांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)