शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतरही भय ईथे संपत नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:37 IST

माणुस जन्माला आल्यानंतर एक दिवस मृत्यू अटळ आहे. जगताना कितीतरी हालअपेष्ठा सहन करीत असतो. मानसन्मान, माझा-तुझा करीत जगत असतो.

ठळक मुद्दे२९४ गावांत स्मशानशेडची आवश्यकता : ५६९ स्मशानभूमीत हातपंपाची मागणी, रस्त्यांसह अतिक्रमणाचा प्रश्न बिकट

आॅनलाईन लोकमतभंडारा : माणुस जन्माला आल्यानंतर एक दिवस मृत्यू अटळ आहे. जगताना कितीतरी हालअपेष्ठा सहन करीत असतो. मानसन्मान, माझा-तुझा करीत जगत असतो. परंतु मरणानंतर सरणावर जाताना या समस्या कायम असल्याची प्रचिती भंडारा जिल्ह्यात येत आहे. चार दिवसांपूर्वी जवाहरनगर येथे कब्रस्थान नसल्यामुळे पार्थिवच ग्रामपंचायत कार्यालयात नेण्याची वेळ तेथील मुस्लिम बांधवावर आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील स्मशानभूमीची दुरावस्था, जागेचा अभाव आणि सुविधांबाबत मागोवा घेतला असता हे दाहक वास्तव उघडकीस आले.भंडारा जिल्ह्यातील ७७७ गावांचा कारभार ५४१ ग्रामपंचायतीमधून केला जातो. या ग्रामपंचायतींच्या अखत्यारितील स्मशानभूमीत सोयीसुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र अनेक गावांमध्ये स्मशानभूमीपर्यंत जनसुविधा योजना पोहचलेल्या नाहीत. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी जाणाºया नातेवाईकांना आजही अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.भंडारा जिल्ह्यातील ७७७ गावांपैकी केवळ ४८३ गावांमध्येच स्मशानशेडची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे २९४ गावांतील नागरिकांना पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याकरिता शेतशिवारात किंवा नदी-नाल्याच्या काठावर सोपस्कार आटोपावे लागत आहे. २०८ स्मशानभूमीत शेडसह पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी हातपंपाची व्यवस्था करण्यात आली. तर ५६९ स्मशानभूमी हातपंपापासून वंचित आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना एक तर घरुनच पाण्याची व्यवस्था करुन न्यावे लागते अन्यथा नदी-नाल्यांमध्ये असलेल्या पाण्यांवर अंत्यसंस्कारानंतरची प्रक्रिया आटोपावी लागते. उन्हाळ्याच्या दिवसात नदी-नाल्यांसह ओढयातील जलस्त्रोत आटल्याने आधीच शोकाकूल नातेवाईकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याची प्रचिती जिल्हावासियांना येत आहे.या सुविधांचा अभावअनेक गावात स्मशानभूमी असली तरी नागरिकांनी मागणी करुनही त्यांना जनसुविधा योजनेच्या निधीतून स्मशानभूमी किंवा तेथील सुविधा उपलब्ध करुन देण्यात प्रशासनाला यश आले नाही. अनेक स्मशानभूमीकडे जाणाºया रस्त्यांची समस्या आजही कायम आहे. पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी जाताना अनेकांना चिखलमाती तुडवित जावे लागते. यात अनेकदा मृतदेहाची विटंबनाही होते. स्मशानभूमीत शेड, पाण्याची सुविधा, सभागृह, विद्युत पुरवठा नसल्याने ग्रामस्थांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.स्मशानभूमीला अतिक्रमणाने घेरलेगाव तिथे स्मशानभूमी ही कागदोपत्री अस्तित्वात आहे. मात्र अनेक गावातील स्मशानभूमीवर दुर्लक्षितपणामुळे लगतच्या शेतकरी किंवा प्लॉट विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याचेही प्रकरण उघडकीस आले आहे. अनेक प्लॉट धारकांनी काही ठिकाणच्या स्मशानभूमीत तर चक्क प्लॉट पाडून त्याची नियमबाह्यरित्या विक्री केल्याचेही स्पष्ट झाले आहे. या प्रक्रियेत महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे आता स्मशानभूमीही सुरक्षीत नसल्याचे दिसून येते.कब्रस्थानाचाही प्रश्न ऐरणीवरजवाहरनगर : हिंदूंच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीची जागा जशी राखीव ठेवण्यात येते, तशीच मुस्लिम बांधवांसाठी कब्रस्थानची गरज असते. असे असले तरी अनेक गावांमध्ये तिथे स्मशानभूमी आणि कब्रस्थानसाठी जागाच उपलब्ध नसल्यामुळे वाद निर्माण होतात. काही ठिकाणी कब्रस्थान असले तरी तिथे कुठलिही सुविधा निर्माण करुन देण्यात आली नाही. त्यामुळे समस्या कायम राहत आहेत. ठाणा पेट्रोलपंप येथे कब्रस्थानची मागणी दुर्लक्षित असल्याने जवाहरनगर येथील अब्दुल मजीत शेख यांचे २ मार्चला निधन झाले. कब्रस्थान नसल्यामुळे संतप्त मुस्लिम बांधवांनी पार्थिवच ग्रामपंचायत कार्यालयात आणले होते.