शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
3
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
4
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
5
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
6
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
7
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
8
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
9
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
10
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
11
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
12
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
13
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
14
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
15
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
16
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
17
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
18
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
19
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
20
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!

घातक इकाॅर्निया हाेऊ शकते जैविक पध्दतीने नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:42 IST

भंडारा : विशालपात्र असलेल्या वैनगंगा नदीला घातक इकाॅर्नियाचा विळखा सुटता सुटत नाही. दरवर्षी इकाॅर्नियाने वैनगंगेचे पात्र झाकले जात आहे. ...

भंडारा : विशालपात्र असलेल्या वैनगंगा नदीला घातक इकाॅर्नियाचा विळखा सुटता सुटत नाही. दरवर्षी इकाॅर्नियाने वैनगंगेचे पात्र झाकले जात आहे. विविध उपाय केल्यानंतरही इकाॅर्नियाचे नियंत्रण शक्य झाले नाही. मात्र आता जैविक पध्दतीने इकाॅर्नियाचे निर्मूलन शक्य आहे. पाने कुरतडणारे विविल कीटक या इकाॅर्नियावर साेडल्यास काही दिवसात इकाॅर्नियाचे निर्मूलन शक्य आहे.

जलकुंभी अर्थात इकाॅर्निया ही एक पाण्यात तरंगणारी वनस्पती आहे. तिला बेंगाल टेरर म्हणूनही ओळखले जाते. मुख्यत: ही वनस्पती ब्राझीलची असून ती भारतासह जगभरात पसरली आहे. एका राेपाला आठ ते दहा जांभळ्या रंगाची आकर्षक फुले लागतात आणि त्यापासून प्रत्येक वर्षी एक हजार बीज तयार हाेतात. त्यामुळे ही वनस्पती अत्यंत वेगाने वाढते. भंडारा शहराजवळून वाहणाऱ्या वैनगंगेला इकाॅर्नियाने गिळंकृत केले आहे. ही वनस्पती पाण्यावर एखाद्या लाॅनसारखी पसरली आहे. पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण करण्यासाेबतच सूर्यकिरणेही पाण्यापर्यंत पाेहाेचत नाहीत. पाण्यातील ऑक्सिजनच्या मात्रेत अडथळा निर्माण करते. त्यामुळे जल वनस्पती, मासे व इतर प्राणी मृत्युमुखी पडतात. मासेमारीवर त्याचा परिणाम हाेताे. ही एक माेठी गंभीर समस्या झाली आहे.

जलकुंभीच्या नियंत्रणात जैविक नियंत्रण अत्यंत प्रभावी ठरू शकते. पाने खाणारे कीटक या परिसरात साेडल्यास त्यातून ही वनस्पती नष्ट करता येऊ शकते. एकरी एक हजार कीटक साेडल्यास हे कीटक वनस्पतीला खाऊन नष्ट करू शकतात. यासाेबत एकात्मिक व्यवस्थापन आणि रासायनिक नियंत्रण पध्दतही आहे. परंतु यासाठी प्रशासनाच्या पुढाकाराची गरज आहे.

बाॅक्स

जबलपूरच्या संशाेधन संस्थेत मिळतात कीटक

इकाॅर्निया नियंत्रणात महत्त्वाची भूमिका विविल कीटक बजावू शकतात. या कीटकाला शास्त्रीय भाषेत नाेओकेटीनस इकाॅर्नी असे म्हणतात. भारतीय कृषी संशाेधन परिषदेअंतर्गत येणाऱ्या जबलपूर येथील डायरेक्टर ऑफ विड रिसर्च येथे हे कीटक उपलब्ध आहेत. एका कीटकाची किंमत साधारणत: ५० रुपये असून एकराला एक हजार ते दीड हजार कीटक लागतात. एकदा कीटक इकाॅर्नियावर साेडल्यानंतर त्यांची संख्या वाढत जाते. त्यामुळे पुन्हा कीटक विकत घेण्याची गरज राहत नाही. यातून इकाॅर्नियाचे नियंत्रण हाेऊ शकते.

काेट

वैनगंगा नदीच्या प्रदूषणात इकाॅर्नियाने माेठी भर घातली आहे. या वनस्पतीला समूळ नष्ट करण्यासाठी जैविक किंवा एकात्मिक व्यवस्थापन आवश्यक आहे. विविल नामक कीटक हा प्रभावी ठरू शकताे. पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी इकाॅर्नियाचे नियंत्रण आवश्यक आहे.

- डाॅ. पी. बी. मेश्राम, वनसंशाेधन संस्थेचे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ, साकाेली