शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
विकसित भारताचा संकल्प निश्चितच पूर्ण होईल: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
3
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
4
कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?
5
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
6
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
7
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
8
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
9
"माझी काय चूक?, उलट मी तिला वाचवलंय...", आधी पलाश मुच्छलसोबतचे 'ते' चॅट्स अन् आता कोरिओग्राफरचं नवं स्टेटस
10
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
11
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
12
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
13
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
14
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
15
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
16
इथिओपियातून दिल्लीत आली ज्वालामुखीची राख; तब्बल १२ वर्षांनंतर हेली गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक 
17
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
18
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!
19
Sheikh Hasina: नऊ किलो सोनं, महागड्या आणि मौल्यवान वस्तू; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड!
20
'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."
Daily Top 2Weekly Top 5

तिथे फेकली जातात मृत जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 22:16 IST

वस्तू महाग आणि जीवन स्वस्त आहे की काय? या अर्विभावात नगरपालिका प्रशासनाचे कार्य सुरू असल्याचे दिसून येत आहे. पालिका प्रशासनाच्या हद्दीत येणाऱ्या शहराच्या सीमावर्ती भागात चक्क मृत जनावरे फेकली जात असून वायु प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देजुन्या राष्ट्रीय महामार्गावरील प्रकार : वायू प्रदूषणामुळे आरोग्याला धोका

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वस्तू महाग आणि जीवन स्वस्त आहे की काय? या अर्विभावात नगरपालिका प्रशासनाचे कार्य सुरू असल्याचे दिसून येत आहे. पालिका प्रशासनाच्या हद्दीत येणाऱ्या शहराच्या सीमावर्ती भागात चक्क मृत जनावरे फेकली जात असून वायु प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्व देऊन केंद्र शासनाने चार वर्षांपूर्वी स्वच्छ भारत अभियानाला प्रारंभ केला. याची सुरूवात घराघरातून करण्यात आली. शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, व्यापरी प्रतिष्ठाने, सर्वजनिक ठिकाणे यासह सर्वच महत्वपूर्ण केंद्रांवर स्वच्छतेचा ध्यास हा मूलमंत्र देऊन अभियानाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. मात्र भंडारा शहर याला अपवाद ठरत आहे. राष्ट्रीय स्वच्छता अभियानात राज्य पातळीवर ५० व्या क्रमांकावर असलेल्या भंडारा शहराला समाधान मानावे लागले.शहराच्या अंतर्गत भागातही हवी तेवढी स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. यासाठी केवळ पालिका प्रशासन जबाबदार नाही. शहरातील नाल्यासह रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिगारे दिसून येत आहे.भंडारा शहरात पुर्वेकडून एण्ट्री करीत असताना दुर्गंधीमुळे स्वच्छतेबाबत भंडाराकरांची मान आपसुकच खाली जाते. बैल बाजार परिसर ते टी-पार्इंटपर्यतच्या भागात शहरात मृत जनावरे आणून येथे फेकून दिली जातात. यासह सडलेला भाजीपाला व अन्य कचराही राजरोसपणे तिथेच फेकला जात आहे. नगर पालिका प्रशसानाने टी-र्पांटजवळील डाव्या बाजुकडील जागा मारबत दहनासाठी ठरवून दिली असून त्याच ठिकाणी ‘कचरा फेकू नये’ असा फलकही लावण्यात आलेला आहे. जिथे फलक तिथेच सर्वात जास्त कचरा फेकला जात असल्याचे दृष्य भंडाऱ्यात पहावयास मिळत आहे.परिसरातील नागरिक त्रस्तजुन्या राष्ट्रीय महामार्र्गाहून येत असताना उजव्या बाजुला ग्रामसेवक कॉलनी आहे. याच कॉलनीसमोर बीटीबी सब्जी मंडी, जलशुद्धीकरण केंद्र आहे. ग्रामसेवक कॉलनीला लागुनच प्रोफेसर कॉलनी, शासकीय धान्य गोदाम व बाजुला जिल्हा सामान्य रूग्णालय आहे. जुन्या महामार्गावरील दुर्गधींचा सर्वात जास्त त्रास येथील कॉलनीवासियांना सहन करावा लागतो. येथुन रहदारी करताना तोंडावर रूमाल घेऊनच जावे लागते. वायुप्रदुषणामुळे विविध आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही.