शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
4
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
5
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
6
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
7
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
8
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
9
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
10
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
11
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
12
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
13
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
14
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
15
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
16
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
17
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
18
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
19
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...

तिथे फेकली जातात मृत जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 22:16 IST

वस्तू महाग आणि जीवन स्वस्त आहे की काय? या अर्विभावात नगरपालिका प्रशासनाचे कार्य सुरू असल्याचे दिसून येत आहे. पालिका प्रशासनाच्या हद्दीत येणाऱ्या शहराच्या सीमावर्ती भागात चक्क मृत जनावरे फेकली जात असून वायु प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देजुन्या राष्ट्रीय महामार्गावरील प्रकार : वायू प्रदूषणामुळे आरोग्याला धोका

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वस्तू महाग आणि जीवन स्वस्त आहे की काय? या अर्विभावात नगरपालिका प्रशासनाचे कार्य सुरू असल्याचे दिसून येत आहे. पालिका प्रशासनाच्या हद्दीत येणाऱ्या शहराच्या सीमावर्ती भागात चक्क मृत जनावरे फेकली जात असून वायु प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्व देऊन केंद्र शासनाने चार वर्षांपूर्वी स्वच्छ भारत अभियानाला प्रारंभ केला. याची सुरूवात घराघरातून करण्यात आली. शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, व्यापरी प्रतिष्ठाने, सर्वजनिक ठिकाणे यासह सर्वच महत्वपूर्ण केंद्रांवर स्वच्छतेचा ध्यास हा मूलमंत्र देऊन अभियानाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. मात्र भंडारा शहर याला अपवाद ठरत आहे. राष्ट्रीय स्वच्छता अभियानात राज्य पातळीवर ५० व्या क्रमांकावर असलेल्या भंडारा शहराला समाधान मानावे लागले.शहराच्या अंतर्गत भागातही हवी तेवढी स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. यासाठी केवळ पालिका प्रशासन जबाबदार नाही. शहरातील नाल्यासह रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिगारे दिसून येत आहे.भंडारा शहरात पुर्वेकडून एण्ट्री करीत असताना दुर्गंधीमुळे स्वच्छतेबाबत भंडाराकरांची मान आपसुकच खाली जाते. बैल बाजार परिसर ते टी-पार्इंटपर्यतच्या भागात शहरात मृत जनावरे आणून येथे फेकून दिली जातात. यासह सडलेला भाजीपाला व अन्य कचराही राजरोसपणे तिथेच फेकला जात आहे. नगर पालिका प्रशसानाने टी-र्पांटजवळील डाव्या बाजुकडील जागा मारबत दहनासाठी ठरवून दिली असून त्याच ठिकाणी ‘कचरा फेकू नये’ असा फलकही लावण्यात आलेला आहे. जिथे फलक तिथेच सर्वात जास्त कचरा फेकला जात असल्याचे दृष्य भंडाऱ्यात पहावयास मिळत आहे.परिसरातील नागरिक त्रस्तजुन्या राष्ट्रीय महामार्र्गाहून येत असताना उजव्या बाजुला ग्रामसेवक कॉलनी आहे. याच कॉलनीसमोर बीटीबी सब्जी मंडी, जलशुद्धीकरण केंद्र आहे. ग्रामसेवक कॉलनीला लागुनच प्रोफेसर कॉलनी, शासकीय धान्य गोदाम व बाजुला जिल्हा सामान्य रूग्णालय आहे. जुन्या महामार्गावरील दुर्गधींचा सर्वात जास्त त्रास येथील कॉलनीवासियांना सहन करावा लागतो. येथुन रहदारी करताना तोंडावर रूमाल घेऊनच जावे लागते. वायुप्रदुषणामुळे विविध आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही.