शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

‘डीसी रूल’चा प्रस्ताव तातडीने निकाली काढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:01 IST

राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकांमध्ये समाविष्ठ असणाऱ्या १४ शहरांसाठी राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने सन २०१७ मध्ये स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध केली होती. परंतु या नियमावलीमध्ये मोठ्या प्रमाणात तृटी असल्याने त्यामध्ये सुधारणा करीत फेरफार करण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे ऑक्टोबर २०१८ मध्ये सादर करण्यात आला. तेव्हापासून हा प्रस्ताव धूळखात पडून आहे.

ठळक मुद्देबांधकाम व्यवसाय ठप्प : क्रेडाई संघटनेची राज्य शासनाकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातील तत्कालीन भाजप सरकारच्या कार्यकाळात समान विकास नियंत्रण नियमावली (डीसी रूल) चा तिढा निर्माण झाला होता. त्यावर मार्ग काढण्यासाठी आघाडी सरकारने फेब्रुवारी महिन्यात बैठक आयोजित केली होती. तुर्तास कोरोनाच्या संकटामुळे त्यावर ठोस निर्णय होवू शकला नसल्याचा परिणाम बांधकाम व्यवसायावर झाला असून हा प्रस्ताव राज्य शासनाने तातडीने निकाली काढण्याची मागणी बांधकाम क्षेत्रातील क्रेडाई संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकांमध्ये समाविष्ठ असणाऱ्या १४ शहरांसाठी राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने सन २०१७ मध्ये स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध केली होती. परंतु या नियमावलीमध्ये मोठ्या प्रमाणात तृटी असल्याने त्यामध्ये सुधारणा करीत फेरफार करण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे ऑक्टोबर २०१८ मध्ये सादर करण्यात आला. तेव्हापासून हा प्रस्ताव धूळखात पडून आहे.यासंदर्भात क्रेडाई संघटनेच्या वतीने विद्यमान आघाडी सरकारला निवेदन देण्यात आल्यानंतर बांधकाम व्यवसायाशी निगडीत राज्यातील सर्व घटकांची संयुक्तीक बैठक फेब्रुवारी २०२० मध्ये नगरविकास विभागात आयोजित करून समान डिसी रूलच्या संदर्भात माहिती देण्यात आली होती. त्या बैठकीत पार पडलेल्या चर्चेनुसार नियमावलीचे सुधारित पुस्तक तयार करण्यात आले होते. मात्र अद्यापही नियमावली प्रसिद्धी करण्यात आली नाही. या नियमावलीचे मुळ प्रारूप मार्च २०१९ मध्ये राजपत्रामध्ये जाहीर केले होते. त्यावेळी या प्रारूपावर सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. विद्यमान राज्य शासनाने समान विकास नियंत्रण नियमावली तातडीने लागू केल्यास ठप्प पडलेल्या बांधकाम व्यवसायाला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा के्रडाई भंडाराचे जिल्हाध्यक्ष विजय निखार यांनी शासनाकडे निवेदनातून केली आहे.तर आतापर्यंत तिढा निकाली निघाला असतातत्कालीन राज्य सरकारच्या कार्यकाळात विकास नियंत्रण नियमावलीच्या मुद्यावरून संभ्रमावस्था असल्याचे दिसून येते. त्यानंतर समान डिसीरूलचा प्रस्ताव लागू न होण्यामागे २०१९ मधील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता, नवीन सरकार स्थापनेसाठी झालेला विलंब व आता कोरोनामुळे बांधकाम क्षेत्राला ग्रहण लागल्याची परिस्थिती आहे.