शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

‘डीसी रूल’चा प्रस्ताव तातडीने निकाली काढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:01 IST

राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकांमध्ये समाविष्ठ असणाऱ्या १४ शहरांसाठी राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने सन २०१७ मध्ये स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध केली होती. परंतु या नियमावलीमध्ये मोठ्या प्रमाणात तृटी असल्याने त्यामध्ये सुधारणा करीत फेरफार करण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे ऑक्टोबर २०१८ मध्ये सादर करण्यात आला. तेव्हापासून हा प्रस्ताव धूळखात पडून आहे.

ठळक मुद्देबांधकाम व्यवसाय ठप्प : क्रेडाई संघटनेची राज्य शासनाकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातील तत्कालीन भाजप सरकारच्या कार्यकाळात समान विकास नियंत्रण नियमावली (डीसी रूल) चा तिढा निर्माण झाला होता. त्यावर मार्ग काढण्यासाठी आघाडी सरकारने फेब्रुवारी महिन्यात बैठक आयोजित केली होती. तुर्तास कोरोनाच्या संकटामुळे त्यावर ठोस निर्णय होवू शकला नसल्याचा परिणाम बांधकाम व्यवसायावर झाला असून हा प्रस्ताव राज्य शासनाने तातडीने निकाली काढण्याची मागणी बांधकाम क्षेत्रातील क्रेडाई संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकांमध्ये समाविष्ठ असणाऱ्या १४ शहरांसाठी राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने सन २०१७ मध्ये स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध केली होती. परंतु या नियमावलीमध्ये मोठ्या प्रमाणात तृटी असल्याने त्यामध्ये सुधारणा करीत फेरफार करण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे ऑक्टोबर २०१८ मध्ये सादर करण्यात आला. तेव्हापासून हा प्रस्ताव धूळखात पडून आहे.यासंदर्भात क्रेडाई संघटनेच्या वतीने विद्यमान आघाडी सरकारला निवेदन देण्यात आल्यानंतर बांधकाम व्यवसायाशी निगडीत राज्यातील सर्व घटकांची संयुक्तीक बैठक फेब्रुवारी २०२० मध्ये नगरविकास विभागात आयोजित करून समान डिसी रूलच्या संदर्भात माहिती देण्यात आली होती. त्या बैठकीत पार पडलेल्या चर्चेनुसार नियमावलीचे सुधारित पुस्तक तयार करण्यात आले होते. मात्र अद्यापही नियमावली प्रसिद्धी करण्यात आली नाही. या नियमावलीचे मुळ प्रारूप मार्च २०१९ मध्ये राजपत्रामध्ये जाहीर केले होते. त्यावेळी या प्रारूपावर सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. विद्यमान राज्य शासनाने समान विकास नियंत्रण नियमावली तातडीने लागू केल्यास ठप्प पडलेल्या बांधकाम व्यवसायाला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा के्रडाई भंडाराचे जिल्हाध्यक्ष विजय निखार यांनी शासनाकडे निवेदनातून केली आहे.तर आतापर्यंत तिढा निकाली निघाला असतातत्कालीन राज्य सरकारच्या कार्यकाळात विकास नियंत्रण नियमावलीच्या मुद्यावरून संभ्रमावस्था असल्याचे दिसून येते. त्यानंतर समान डिसीरूलचा प्रस्ताव लागू न होण्यामागे २०१९ मधील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता, नवीन सरकार स्थापनेसाठी झालेला विलंब व आता कोरोनामुळे बांधकाम क्षेत्राला ग्रहण लागल्याची परिस्थिती आहे.