शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

घरच्या भाकरी खाऊन प्रचार करण्याचे दिवस आता संपले

By admin | Updated: September 29, 2014 00:39 IST

एक काळ होता. पक्षाशी निष्ठावान कार्यकर्ते घरच्या भाकरी खाऊन उमेदवाराच्या प्रचार कामासाठी पायाला भिंगरी लावून गावोगाव फिरत होते. गावातील प्रतिष्ठित व्यक्तीने एखाद्या उमेदवाराच्या

भंडारा : एक काळ होता. पक्षाशी निष्ठावान कार्यकर्ते घरच्या भाकरी खाऊन उमेदवाराच्या प्रचार कामासाठी पायाला भिंगरी लावून गावोगाव फिरत होते. गावातील प्रतिष्ठित व्यक्तीने एखाद्या उमेदवाराच्या पारड्यात मते टाकण्याचे आदेश दिले की, संपूर्ण गाव त्या उमेदवाराला मतदान करीत असायचे. त्या काळात प्रत्येक कार्यकर्ता दिवसभर परिश्रम घेऊन उमेदवारांच्या विजयासाठी जीवाचे रान करीत होता. दिवसभर चिवडा खाऊन सायकलने गाव अन् गाव प्रचारासाठी पिंजून काढत होते. आता प्रचार मोहीम ही संगणक युगात बदलेली आहे. काळ बदलला तशा प्रचाराच्या तऱ्हाही बदलल्या आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. त्यामुळे पैशाशिवाय आता कोणतेच काम होत नाही.निवडणुका आल्या म्हणजे कार्यकर्तेही आता दिवाळी साजरी करु लागलेत. एरव्ही पाच वर्षे लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांना विचारत नाही. मग आता का यांना सोडायचे, असे कार्यकर्ते बोलू लागलेत. निवडणुकीची तारीख ठरली. जे उमेदवार निश्चित आहेत त्यांच्याकडे प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी तयार आहे. वाहनांची बुकिंग झाली आहे. कार्यकर्त्यांना रोजंदारीही ठरली आहे. ४०० रुपए रोज, दोन वेळचा नाश्ता, दोन-तीन वेळा चहा आणि रात्रीचे जेवण, तेही हॉटेल किंवा धाब्यावरच असे करार कार्यकर्त्यांशी झाले आहेत. सकाळी १० वाजता गांड्यामध्ये बसायचे व मतदारसंघात फिरायचे. ज्या उमेदवारांची उमेदवारी निश्चितच आहे त्यांचे कार्यकर्ते कामालाही लागले आहेत.दि. १ आॅक्टोंबरपासून प्रचाराची रणधुमाळी सुरु होईल. त्यानंतर डोळ्यात तेल घालून उमेदवारांना यंत्रणा राबवावी लागणार आहे. त्यासाठी विश्वासातील कार्यकर्तेही हिमतीला हवेत. दररोज जर प्रचार मोहीम सांभाळायची असेल तर निष्ठावान कार्यकर्त्यांचीही फळी उमेदवाराला तयार ठेवावी लागणार आहे. असे इमाने इतबारे पक्षाचे काम करणारे कार्यकर्तेही आहेत. दि.१ आॅक्टोंबरपासून प्रचार सुरु होईल. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघातील चारचाकी वाहने उमेदवारांनी आरक्षित केले आहेत. उमेदवारी अर्ज भरतांना आपले शक्तीप्रदर्शन दाखविण्यासाठी कार्यकर्त्यांची जुळवाजुळव सुरु झाली आहे. पक्षांतर्फे अधिकृत उमेदवारांच्या नावांची घोषणा होताच या प्रक्रियेला दोन दिवसांत अधिक वेग येणार आहे. तेव्हाच विधानसभा निवडणुकीचे जिल्हयातील चित्र स्पष्ट होईल. आता केव्हा एकदाची निवडणूक सुरु होते आणि निवडणूक प्रक्रियेला गती येते याची प्रतीक्षा कार्यकर्त्यांना आहे.(प्रतिनिधी)