शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

घरच्या भाकरी खाऊन प्रचार करण्याचे दिवस आता संपले

By admin | Updated: September 29, 2014 00:39 IST

एक काळ होता. पक्षाशी निष्ठावान कार्यकर्ते घरच्या भाकरी खाऊन उमेदवाराच्या प्रचार कामासाठी पायाला भिंगरी लावून गावोगाव फिरत होते. गावातील प्रतिष्ठित व्यक्तीने एखाद्या उमेदवाराच्या

भंडारा : एक काळ होता. पक्षाशी निष्ठावान कार्यकर्ते घरच्या भाकरी खाऊन उमेदवाराच्या प्रचार कामासाठी पायाला भिंगरी लावून गावोगाव फिरत होते. गावातील प्रतिष्ठित व्यक्तीने एखाद्या उमेदवाराच्या पारड्यात मते टाकण्याचे आदेश दिले की, संपूर्ण गाव त्या उमेदवाराला मतदान करीत असायचे. त्या काळात प्रत्येक कार्यकर्ता दिवसभर परिश्रम घेऊन उमेदवारांच्या विजयासाठी जीवाचे रान करीत होता. दिवसभर चिवडा खाऊन सायकलने गाव अन् गाव प्रचारासाठी पिंजून काढत होते. आता प्रचार मोहीम ही संगणक युगात बदलेली आहे. काळ बदलला तशा प्रचाराच्या तऱ्हाही बदलल्या आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. त्यामुळे पैशाशिवाय आता कोणतेच काम होत नाही.निवडणुका आल्या म्हणजे कार्यकर्तेही आता दिवाळी साजरी करु लागलेत. एरव्ही पाच वर्षे लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांना विचारत नाही. मग आता का यांना सोडायचे, असे कार्यकर्ते बोलू लागलेत. निवडणुकीची तारीख ठरली. जे उमेदवार निश्चित आहेत त्यांच्याकडे प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी तयार आहे. वाहनांची बुकिंग झाली आहे. कार्यकर्त्यांना रोजंदारीही ठरली आहे. ४०० रुपए रोज, दोन वेळचा नाश्ता, दोन-तीन वेळा चहा आणि रात्रीचे जेवण, तेही हॉटेल किंवा धाब्यावरच असे करार कार्यकर्त्यांशी झाले आहेत. सकाळी १० वाजता गांड्यामध्ये बसायचे व मतदारसंघात फिरायचे. ज्या उमेदवारांची उमेदवारी निश्चितच आहे त्यांचे कार्यकर्ते कामालाही लागले आहेत.दि. १ आॅक्टोंबरपासून प्रचाराची रणधुमाळी सुरु होईल. त्यानंतर डोळ्यात तेल घालून उमेदवारांना यंत्रणा राबवावी लागणार आहे. त्यासाठी विश्वासातील कार्यकर्तेही हिमतीला हवेत. दररोज जर प्रचार मोहीम सांभाळायची असेल तर निष्ठावान कार्यकर्त्यांचीही फळी उमेदवाराला तयार ठेवावी लागणार आहे. असे इमाने इतबारे पक्षाचे काम करणारे कार्यकर्तेही आहेत. दि.१ आॅक्टोंबरपासून प्रचार सुरु होईल. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघातील चारचाकी वाहने उमेदवारांनी आरक्षित केले आहेत. उमेदवारी अर्ज भरतांना आपले शक्तीप्रदर्शन दाखविण्यासाठी कार्यकर्त्यांची जुळवाजुळव सुरु झाली आहे. पक्षांतर्फे अधिकृत उमेदवारांच्या नावांची घोषणा होताच या प्रक्रियेला दोन दिवसांत अधिक वेग येणार आहे. तेव्हाच विधानसभा निवडणुकीचे जिल्हयातील चित्र स्पष्ट होईल. आता केव्हा एकदाची निवडणूक सुरु होते आणि निवडणूक प्रक्रियेला गती येते याची प्रतीक्षा कार्यकर्त्यांना आहे.(प्रतिनिधी)