शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मनपटलावरील अस्वस्थ जाणीवा प्रगट करण्याचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 22:18 IST

‘प्रेम म्हणजे पे्रम असतं, तुमचं आमचं सेम असतं’. प्रेमाची अनुभूती घेतली नाही असा कुणी आढळणार नाही. मात्र अलीकडे डे संस्कृतीत व्हॅलेंटाईनचा बोलबाला आहे. व्हॅलेंटाईन वीक साजरा करणाऱ्या तरुणाईला ओढ लागली आहे ती १४ फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या व्हॅलेंटाईन डेची.

ठळक मुद्देआज व्हॅलेंटाईन डे : तरुणाईत उत्साह, हळव्या प्रीतीची बिजे

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : ‘प्रेम म्हणजे पे्रम असतं, तुमचं आमचं सेम असतं’. प्रेमाची अनुभूती घेतली नाही असा कुणी आढळणार नाही. मात्र अलीकडे डे संस्कृतीत व्हॅलेंटाईनचा बोलबाला आहे. व्हॅलेंटाईन वीक साजरा करणाऱ्या तरुणाईला ओढ लागली आहे ती १४ फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या व्हॅलेंटाईन डेची. मनपटलावरील अस्वस्थ जाणीवांना कलात्मक पद्धतीने प्रगट करण्यासाठी तरुणाई आसुसली आहे.गत काही वर्षांपासून महानगरात साजरा होणारा व्हॅलेंटाईन डे गाव खेड्यापर्यंत पोहचला आहे. प्रेमाचे प्रगटीकरण करण्याचा हा हक्काचा दिवस खास तरुणाईत उत्साहाने साजरा होतो. अलीकडे व्हॅलेंटाईन सप्ताह साजरा होवू लागला आहे. ७ फेब्रुवारीपासून एकापाठोपाठ एक डे साजरे होत आहे. ७ फेब्रुवारीला रोझ डे, त्यानंतर प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमीस डे, किस डे, हग डे साजरे होतात. आणि या सर्वांचा शेवट होतो व्हॅलेंटाईन डे ने.तरुणाई वर्षभर या दिवसाची चातकासारखी प्रतिक्षा करीत असतात. जीवलगाचा प्रत्यक्ष होकार मिळविण्यासाठी कोणताही धोका नको म्हणून आदीपासून वातावरण निर्मीती केली जाते. जगभरात या दिवशी प्रेमाला भरते आलेले असते. शहरी तरुणाई या दिवशी उत्साहात दिसून येते. शाळा महाविद्यालयाचे वातावरणही गुलाबी होऊन जाते, असा हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी गुलाब पुष्पांची उधळण केली जाते. प्रेम म्हणजे केवळ प्रियशीसोबत असलेले नव्हे. तर आई, बहिण, भाऊ मित्र मैत्रीणी कुणीही असू शकतात. मनाचा हळव्या प्रितीला अलगदपणे उकलत जाणारा हा दिवस होय.भारतीय संस्कृतीत अशा दिनाला फारसे महत्व नाही. परंतु जागतिकीकरण आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून आता हा दिवस गावखेड्यात पोहचला आहे. यातून अनेकदा भानगडी निर्माण होण्याची शक्यता असते. परंतु प्रेमात सर्व काही क्षम्य असत.गुलाब पुष्पांच्या रंगाचे महत्वगुलाब पुष्प हा प्रेमाचे प्रतीक असले तरी त्याच्या रंगावरुन तो कुणाला दायचा हे ठरविले जाते. पिवळ्या रंगाचा गुलाब मित्र मैत्रिणींना दिला जातो. नारंगी रंगाचा गुलाब ज्या व्यक्तीकडे इच्छा व्यक्त करायची आहे त्याला. तर पांढरा गुलाब ज्या व्यक्तीला आपण दुखावले आहे त्याला आणि लाल रंगाचा गुलाब खास प्रेमभाव व्यक्त करण्यासाठी दिला जातो.