शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

एक दिवस आधी पण तब्बल चार महिन्यांनी पोहचले केंद्राचे पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात २८ ते ३१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी आणि महापूर आला होता. पिकासह घरांचे प्रचंड नुकसान झाले होते. प्रशासनाच्यावतीने सर्व्र्हेक्षणही करण्यात आले. दरम्यान केंद्रीय पथक शुक्रवारी जिल्ह्यात दाखल होणार होते. मात्र नियोजित दौरा रद्द करत केंद्राचे पथक गुरूवारीच जिल्ह्यात दाखल झाले. कृषी मंत्रालयाचे संचालक आर.पी. सिंग व महेंद्र शहारे यांच्या नेतृत्वात पथक दुपारी जिल्ह्यात आले. अचानक आलेल्या या पथकामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.

ठळक मुद्देपूरग्रस्त भागाची पाहणी : प्रशासनाची तारांबळ, पिंडकेपार व खाकसीला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि महापुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तब्बल चार महिन्यानंतर केंद्राचे पथक गुरूवारी जिल्ह्यात दाखल झाले. शुक्रवारी असलेला नियोजित दौरा रद्द करत एक दिवस आधीच पथक जिल्ह्यात पोहचल्याने शासकीय यंत्रणेची एकच तारांबळ उडाली. भंडारा तालुक्यातील पिंडकेपार आणि पवनीच्या खाकसीला भेट दिली. त्यावेळी अद्यापही मदत मिळाली नसल्याचे अनेक शेतकऱ्यांनी या पथकापुढे सांगितले.भंडारा जिल्ह्यात २८ ते ३१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी आणि महापूर आला होता. पिकासह घरांचे प्रचंड नुकसान झाले होते. प्रशासनाच्यावतीने सर्व्र्हेक्षणही करण्यात आले. दरम्यान केंद्रीय पथक शुक्रवारी जिल्ह्यात दाखल होणार होते. मात्र नियोजित दौरा रद्द करत केंद्राचे पथक गुरूवारीच जिल्ह्यात दाखल झाले. कृषी मंत्रालयाचे संचालक आर.पी. सिंग व महेंद्र शहारे यांच्या नेतृत्वात पथक दुपारी जिल्ह्यात आले. अचानक आलेल्या या पथकामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. पथकाने भंडारा कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंडकेपार आणि पवनी तालुक्यातील खाकसी गावाला भेट देवून पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संदीप कदम, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योेगेश कुंभेझकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, कृषी सहायक संचालक रवींद्र भोेसले, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, तहसीलदार अक्षय पोयाम, जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे, उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, भंडारा कृषी अधिकारी अविनाश कोटांगले उपस्थित होते. दौरा सुरू करण्यापुर्वी केंद्रीय पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत जावून धान्याची पाहणी केली. सभापती रामलाल चौधरी यांनी धान्य प्रतवारीची माहिती पथकाला दिली. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी धानाचा उतारा ३० टक्क्यापर्यंत असल्याचे सांगितले. त्यानंतर या पथकाने पिंडकेपार गावाला भेट दिली. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या घराची पाहणी केली. तसेच शेतात, बांधावरही पथक पोहचले. यावेळी राकेश वंजारी, लक्ष्मण निंबार्ते, वसंत सार्वे या शेतकऱ्यांनी कैफियत मांडली. त्यानंतर पवनी तालुक्यातील गावांनाही भेट दिली. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही मदत मिळाले नसल्याचे या पथकापुढे सांगितले. वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे बेला, कोरंभी रस्ता वाहून गेला होता. प्रशासनाने हा रस्ता दुरूस्त करून दळणवळण व्यवस्था सुरळीत केली. त्याबद्दल या पथकाने समाधान व्यक्त        केले. 

अतिवृष्टीत १४४ गावे प्रभावित  जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापूराने भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, लाखांदूर तालुक्यातील १४४ गावे प्रभावित झाली होती. पुरात पाच हजार ३९८ घरांचे नुकसान झाले होते. तसेच चौघांचा मृत्यू झाला होता. १९ हजार ७९३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यासोबतच पाणीपुरवठा योजना, मत्स्यव्यवसाय, वीज वितरण, रस्ते, आरोग्य सेवा, सिंचन प्रकल्प आदींचेही मोठे नुकसान झाले. ही माहिती केंद्रीय पथकाला देण्यात आली.

 

टॅग्स :floodपूर