शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

एक दिवस आधी पण तब्बल चार महिन्यांनी पोहचले केंद्राचे पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात २८ ते ३१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी आणि महापूर आला होता. पिकासह घरांचे प्रचंड नुकसान झाले होते. प्रशासनाच्यावतीने सर्व्र्हेक्षणही करण्यात आले. दरम्यान केंद्रीय पथक शुक्रवारी जिल्ह्यात दाखल होणार होते. मात्र नियोजित दौरा रद्द करत केंद्राचे पथक गुरूवारीच जिल्ह्यात दाखल झाले. कृषी मंत्रालयाचे संचालक आर.पी. सिंग व महेंद्र शहारे यांच्या नेतृत्वात पथक दुपारी जिल्ह्यात आले. अचानक आलेल्या या पथकामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.

ठळक मुद्देपूरग्रस्त भागाची पाहणी : प्रशासनाची तारांबळ, पिंडकेपार व खाकसीला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि महापुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तब्बल चार महिन्यानंतर केंद्राचे पथक गुरूवारी जिल्ह्यात दाखल झाले. शुक्रवारी असलेला नियोजित दौरा रद्द करत एक दिवस आधीच पथक जिल्ह्यात पोहचल्याने शासकीय यंत्रणेची एकच तारांबळ उडाली. भंडारा तालुक्यातील पिंडकेपार आणि पवनीच्या खाकसीला भेट दिली. त्यावेळी अद्यापही मदत मिळाली नसल्याचे अनेक शेतकऱ्यांनी या पथकापुढे सांगितले.भंडारा जिल्ह्यात २८ ते ३१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी आणि महापूर आला होता. पिकासह घरांचे प्रचंड नुकसान झाले होते. प्रशासनाच्यावतीने सर्व्र्हेक्षणही करण्यात आले. दरम्यान केंद्रीय पथक शुक्रवारी जिल्ह्यात दाखल होणार होते. मात्र नियोजित दौरा रद्द करत केंद्राचे पथक गुरूवारीच जिल्ह्यात दाखल झाले. कृषी मंत्रालयाचे संचालक आर.पी. सिंग व महेंद्र शहारे यांच्या नेतृत्वात पथक दुपारी जिल्ह्यात आले. अचानक आलेल्या या पथकामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. पथकाने भंडारा कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंडकेपार आणि पवनी तालुक्यातील खाकसी गावाला भेट देवून पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संदीप कदम, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योेगेश कुंभेझकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, कृषी सहायक संचालक रवींद्र भोेसले, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, तहसीलदार अक्षय पोयाम, जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे, उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, भंडारा कृषी अधिकारी अविनाश कोटांगले उपस्थित होते. दौरा सुरू करण्यापुर्वी केंद्रीय पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत जावून धान्याची पाहणी केली. सभापती रामलाल चौधरी यांनी धान्य प्रतवारीची माहिती पथकाला दिली. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी धानाचा उतारा ३० टक्क्यापर्यंत असल्याचे सांगितले. त्यानंतर या पथकाने पिंडकेपार गावाला भेट दिली. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या घराची पाहणी केली. तसेच शेतात, बांधावरही पथक पोहचले. यावेळी राकेश वंजारी, लक्ष्मण निंबार्ते, वसंत सार्वे या शेतकऱ्यांनी कैफियत मांडली. त्यानंतर पवनी तालुक्यातील गावांनाही भेट दिली. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही मदत मिळाले नसल्याचे या पथकापुढे सांगितले. वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे बेला, कोरंभी रस्ता वाहून गेला होता. प्रशासनाने हा रस्ता दुरूस्त करून दळणवळण व्यवस्था सुरळीत केली. त्याबद्दल या पथकाने समाधान व्यक्त        केले. 

अतिवृष्टीत १४४ गावे प्रभावित  जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापूराने भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, लाखांदूर तालुक्यातील १४४ गावे प्रभावित झाली होती. पुरात पाच हजार ३९८ घरांचे नुकसान झाले होते. तसेच चौघांचा मृत्यू झाला होता. १९ हजार ७९३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यासोबतच पाणीपुरवठा योजना, मत्स्यव्यवसाय, वीज वितरण, रस्ते, आरोग्य सेवा, सिंचन प्रकल्प आदींचेही मोठे नुकसान झाले. ही माहिती केंद्रीय पथकाला देण्यात आली.

 

टॅग्स :floodपूर