शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

एक दिवस आधी पण तब्बल चार महिन्यांनी पोहचले केंद्राचे पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात २८ ते ३१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी आणि महापूर आला होता. पिकासह घरांचे प्रचंड नुकसान झाले होते. प्रशासनाच्यावतीने सर्व्र्हेक्षणही करण्यात आले. दरम्यान केंद्रीय पथक शुक्रवारी जिल्ह्यात दाखल होणार होते. मात्र नियोजित दौरा रद्द करत केंद्राचे पथक गुरूवारीच जिल्ह्यात दाखल झाले. कृषी मंत्रालयाचे संचालक आर.पी. सिंग व महेंद्र शहारे यांच्या नेतृत्वात पथक दुपारी जिल्ह्यात आले. अचानक आलेल्या या पथकामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.

ठळक मुद्देपूरग्रस्त भागाची पाहणी : प्रशासनाची तारांबळ, पिंडकेपार व खाकसीला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि महापुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तब्बल चार महिन्यानंतर केंद्राचे पथक गुरूवारी जिल्ह्यात दाखल झाले. शुक्रवारी असलेला नियोजित दौरा रद्द करत एक दिवस आधीच पथक जिल्ह्यात पोहचल्याने शासकीय यंत्रणेची एकच तारांबळ उडाली. भंडारा तालुक्यातील पिंडकेपार आणि पवनीच्या खाकसीला भेट दिली. त्यावेळी अद्यापही मदत मिळाली नसल्याचे अनेक शेतकऱ्यांनी या पथकापुढे सांगितले.भंडारा जिल्ह्यात २८ ते ३१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी आणि महापूर आला होता. पिकासह घरांचे प्रचंड नुकसान झाले होते. प्रशासनाच्यावतीने सर्व्र्हेक्षणही करण्यात आले. दरम्यान केंद्रीय पथक शुक्रवारी जिल्ह्यात दाखल होणार होते. मात्र नियोजित दौरा रद्द करत केंद्राचे पथक गुरूवारीच जिल्ह्यात दाखल झाले. कृषी मंत्रालयाचे संचालक आर.पी. सिंग व महेंद्र शहारे यांच्या नेतृत्वात पथक दुपारी जिल्ह्यात आले. अचानक आलेल्या या पथकामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. पथकाने भंडारा कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंडकेपार आणि पवनी तालुक्यातील खाकसी गावाला भेट देवून पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संदीप कदम, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योेगेश कुंभेझकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, कृषी सहायक संचालक रवींद्र भोेसले, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, तहसीलदार अक्षय पोयाम, जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे, उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, भंडारा कृषी अधिकारी अविनाश कोटांगले उपस्थित होते. दौरा सुरू करण्यापुर्वी केंद्रीय पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत जावून धान्याची पाहणी केली. सभापती रामलाल चौधरी यांनी धान्य प्रतवारीची माहिती पथकाला दिली. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी धानाचा उतारा ३० टक्क्यापर्यंत असल्याचे सांगितले. त्यानंतर या पथकाने पिंडकेपार गावाला भेट दिली. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या घराची पाहणी केली. तसेच शेतात, बांधावरही पथक पोहचले. यावेळी राकेश वंजारी, लक्ष्मण निंबार्ते, वसंत सार्वे या शेतकऱ्यांनी कैफियत मांडली. त्यानंतर पवनी तालुक्यातील गावांनाही भेट दिली. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही मदत मिळाले नसल्याचे या पथकापुढे सांगितले. वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे बेला, कोरंभी रस्ता वाहून गेला होता. प्रशासनाने हा रस्ता दुरूस्त करून दळणवळण व्यवस्था सुरळीत केली. त्याबद्दल या पथकाने समाधान व्यक्त        केले. 

अतिवृष्टीत १४४ गावे प्रभावित  जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापूराने भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, लाखांदूर तालुक्यातील १४४ गावे प्रभावित झाली होती. पुरात पाच हजार ३९८ घरांचे नुकसान झाले होते. तसेच चौघांचा मृत्यू झाला होता. १९ हजार ७९३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यासोबतच पाणीपुरवठा योजना, मत्स्यव्यवसाय, वीज वितरण, रस्ते, आरोग्य सेवा, सिंचन प्रकल्प आदींचेही मोठे नुकसान झाले. ही माहिती केंद्रीय पथकाला देण्यात आली.

 

टॅग्स :floodपूर