शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

एक दिवस आधी पण तब्बल चार महिन्यांनी पोहचले केंद्राचे पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात २८ ते ३१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी आणि महापूर आला होता. पिकासह घरांचे प्रचंड नुकसान झाले होते. प्रशासनाच्यावतीने सर्व्र्हेक्षणही करण्यात आले. दरम्यान केंद्रीय पथक शुक्रवारी जिल्ह्यात दाखल होणार होते. मात्र नियोजित दौरा रद्द करत केंद्राचे पथक गुरूवारीच जिल्ह्यात दाखल झाले. कृषी मंत्रालयाचे संचालक आर.पी. सिंग व महेंद्र शहारे यांच्या नेतृत्वात पथक दुपारी जिल्ह्यात आले. अचानक आलेल्या या पथकामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.

ठळक मुद्देपूरग्रस्त भागाची पाहणी : प्रशासनाची तारांबळ, पिंडकेपार व खाकसीला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि महापुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तब्बल चार महिन्यानंतर केंद्राचे पथक गुरूवारी जिल्ह्यात दाखल झाले. शुक्रवारी असलेला नियोजित दौरा रद्द करत एक दिवस आधीच पथक जिल्ह्यात पोहचल्याने शासकीय यंत्रणेची एकच तारांबळ उडाली. भंडारा तालुक्यातील पिंडकेपार आणि पवनीच्या खाकसीला भेट दिली. त्यावेळी अद्यापही मदत मिळाली नसल्याचे अनेक शेतकऱ्यांनी या पथकापुढे सांगितले.भंडारा जिल्ह्यात २८ ते ३१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी आणि महापूर आला होता. पिकासह घरांचे प्रचंड नुकसान झाले होते. प्रशासनाच्यावतीने सर्व्र्हेक्षणही करण्यात आले. दरम्यान केंद्रीय पथक शुक्रवारी जिल्ह्यात दाखल होणार होते. मात्र नियोजित दौरा रद्द करत केंद्राचे पथक गुरूवारीच जिल्ह्यात दाखल झाले. कृषी मंत्रालयाचे संचालक आर.पी. सिंग व महेंद्र शहारे यांच्या नेतृत्वात पथक दुपारी जिल्ह्यात आले. अचानक आलेल्या या पथकामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. पथकाने भंडारा कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंडकेपार आणि पवनी तालुक्यातील खाकसी गावाला भेट देवून पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संदीप कदम, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योेगेश कुंभेझकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, कृषी सहायक संचालक रवींद्र भोेसले, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, तहसीलदार अक्षय पोयाम, जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे, उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, भंडारा कृषी अधिकारी अविनाश कोटांगले उपस्थित होते. दौरा सुरू करण्यापुर्वी केंद्रीय पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत जावून धान्याची पाहणी केली. सभापती रामलाल चौधरी यांनी धान्य प्रतवारीची माहिती पथकाला दिली. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी धानाचा उतारा ३० टक्क्यापर्यंत असल्याचे सांगितले. त्यानंतर या पथकाने पिंडकेपार गावाला भेट दिली. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या घराची पाहणी केली. तसेच शेतात, बांधावरही पथक पोहचले. यावेळी राकेश वंजारी, लक्ष्मण निंबार्ते, वसंत सार्वे या शेतकऱ्यांनी कैफियत मांडली. त्यानंतर पवनी तालुक्यातील गावांनाही भेट दिली. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही मदत मिळाले नसल्याचे या पथकापुढे सांगितले. वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे बेला, कोरंभी रस्ता वाहून गेला होता. प्रशासनाने हा रस्ता दुरूस्त करून दळणवळण व्यवस्था सुरळीत केली. त्याबद्दल या पथकाने समाधान व्यक्त        केले. 

अतिवृष्टीत १४४ गावे प्रभावित  जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापूराने भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, लाखांदूर तालुक्यातील १४४ गावे प्रभावित झाली होती. पुरात पाच हजार ३९८ घरांचे नुकसान झाले होते. तसेच चौघांचा मृत्यू झाला होता. १९ हजार ७९३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यासोबतच पाणीपुरवठा योजना, मत्स्यव्यवसाय, वीज वितरण, रस्ते, आरोग्य सेवा, सिंचन प्रकल्प आदींचेही मोठे नुकसान झाले. ही माहिती केंद्रीय पथकाला देण्यात आली.

 

टॅग्स :floodपूर