शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

वडिलांच्या न्यायासाठी मुलीचे उपोषण

By admin | Updated: June 1, 2017 00:30 IST

पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या दडपशाही धोरणामुळे वडसा येथे कार्यरत असलेले शाखा अभियंता देवनाथ नंदनवार यांना २२ महिन्यांपासून वेतन मिळाले नाही.

प्रकरण पाटबंधारे विभागाचे : नंदनवार कुटुंबीयांनी पुकारला प्रशासनाविरुध्द एल्गार लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या दडपशाही धोरणामुळे वडसा येथे कार्यरत असलेले शाखा अभियंता देवनाथ नंदनवार यांना २२ महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. याबाबत त्यांनी वेळोवेळी वरिष्ठांना पत्रव्यवहार केला. मात्र दखल घेतली नाही. त्यामुळे नंदनवार यांनी आज बुधवारपासून भंडारा सिंचन मंडळ कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. वडिलांना न्याय मिळावा यासाठी त्यांच्या दहा वर्षीय चिमुकलीनेही उपोषण सुरु केले आहे.इडियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभागीय वडसा येथे शाखा अभियंता म्हणून कार्यरत असलेले देवनाथ नंदनवार यांच्यावर विभागीय अधिकारी टी. के. मेंढे, कार्यकारी अभियंता एच. वाय. छप्परघरे यांनी वेळोवेळी अन्याय केल्याची ३२४ पानांची तक्रार नंदनवार यांनी वरिष्ठांना केली आहे. या उपरांतही त्यांना न्याय मिळाला नाही. आॅगस्ट २०१४ ते नोव्हेंबर २०१४, आॅगस्ट २०१५ ते डिसेंबर २०१५, फरवरी २०१६, एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ अशा २२ महिन्यांचे वेतन व भत्ते अधिकाऱ्यांनी अडविले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीचे व कर्जाचे डोंगर वाढले आहे. या अन्यायाविरुध्द नंदनवार यांनी गिरोला पहाडी येथील भंडारा सिंचन मंडळ कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.वडिलांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळावा यासाठी देवनाथ नंदनवार यांची दहा वर्षीय चिमुकली निहारिका व त्यांची पत्नी अर्चना याही उपोषणाला बसल्या आहेत. दहा वर्षीय चिमुकलीने वडिलांच्या न्यायासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. प्रशासनाने चिमुकलीच्या उपोषणाची दखल वेळीच घेवून नंदनवार यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. उपोषणादरम्यान नंदनवार कुटुंबियाच्या जीवीताला धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे.