शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

आंतरराज्य पुलावरून धोकादायक वाहतूक पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 05:00 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या अलीकडे जेसीबीने मोठी नाली खोदली काही दिवस वाहतूक बंद राहिली. सदर नाली एका बाजूने पुन्हा बुजवण्यात आली व तिथून दुचाकी वाहने दुचाकी वाहनांच्या वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. त्याठिकाणी माती भरण्यात आली. जीव धोक्यात घालून दुचाकीस्वार येथून वाहने नेत आहे त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. दोन्ही राज्यातील नागरिकांच्या समावेश,: महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांची दुभाजक म्हणून बावनथडी नदी आहे येथील नागरिकांच्या एकमेकाशी दररोज संबंध येतो नातेवाईकांची संख्या जास्त आहे.

ठळक मुद्देदोन्ही राज्यातील नागरिकांच्या समावेश : वाहनधारकांना अपघाताची शक्यता, जिल्हा प्रशासन लक्ष देणार काय?

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बावनथडी नदीवरील आंतरराज्य पुलाला हादरे बसत असल्यामुळे भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी २७ सप्टेंबर रोजी या पुलावरून सर्वच वाहनांकरिता बंदी घातली होती. पुलावर प्रवेश करताना दोन्ही बाजूला मोठीं नाली खोदली परंतु एका बाजूने बुजवण्यात आली. तिथून दुचाकी वाहतूक सुरू असून वाहनधारकांना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.बावनथडी नदीवरील आंतरराज्य पूल धोकादायक स्थितीत आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी २७ सप्टेंबर रोजी पूल बंद करण्याचे आदेश दिले पुलावरून जर मध्यम व हलक्या वाहनांना बंदी घालण्यात आली. सुरुवातीला पूल बंद करण्यात आला होता. परंतु तिथून दुचाकी किंवा चारचाकी वाहन वाहनांची वाहतूक सुरू झाली होती. याप्रकरणी सर्वप्रथम लोकमत'ने प्रशासनाचे लक्ष वेधले होते.त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या अलीकडे जेसीबीने मोठी नाली खोदली काही दिवस वाहतूक बंद राहिली. सदर नाली एका बाजूने पुन्हा बुजवण्यात आली व तिथून दुचाकी वाहने दुचाकी वाहनांच्या वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. त्याठिकाणी माती भरण्यात आली. जीव धोक्यात घालून दुचाकीस्वार येथून वाहने नेत आहे त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. दोन्ही राज्यातील नागरिकांच्या समावेश,: महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांची दुभाजक म्हणून बावनथडी नदी आहे येथील नागरिकांच्या एकमेकाशी दररोज संबंध येतो नातेवाईकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्यांचे ये-जा असते पर्यायी पूल म्हणून बपेरा राज्य मार्गाच्या वापर करण्याचे सूचना देण्यात आलेल्या आहेत. सुमारे पंचवीस किलोमीटरच्या फेरा सदर नागरिकांना करावा लागतो.वेळ पैसा लागत असल्यामुळे दुचाकीस्वारांनी येथे शक्कल लढविली. .पुलाच्या अलीकडे असलेली नाली त्यांनी बुजविली व तेथून आता दुचाकीची वाहतूक सर्रास सुरू आहे.जीव धोक्यात घालून प्रवास: वाहन धारक येथून जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत मुलाची उंची जास्त आहे. मातीवरून वाहन जाताना तडे जाण्याची भीती जास्त आहे. त्यामुळे तिथे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा प्रशासनाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने व पोलीस प्रशासन सुद्धा येथे गंभीर दखल घेण्याची गरज आहे.दुरुस्ती केव्हा होणारपुलावरून वाहतूक बंद होऊन आता पंचवीस दिवस झाले आहेत परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने अजून कोणत्याही प्रकारचे काम येथे सुरू केलेले नाही दोन राज्यांना जोडणारा हा महत्त्वपूर्ण पूल असून सदर पुलाचे काम तात्काळ सुरू करण्याची गरजेचे झाले आहे. र्वांनी बांधकाम विभागाचे नियोजन कमी पडल्याचे दिसत आहे. याचा फटका जनसामान्यांना बसत आहे. विशेष म्हणजे २५ दिवसांपूर्वी पुल बंद करूनही कोणत्याही हालचाली या ठिकाणी दिसत नाहीत त्यामुळे दोन्ही राज्यातील सीमेवर राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड असंतोष दिसत आहे. सदर पुलाची दुरुस्ती करून हा फुल वाहतुकीकरिता पवत करावा अशी मागणी चिखल्या चे माजी सरपंच दिलीप सोनवणे व माझे जिल्हा परिषद सदस्य संगीता सोनवणे यांनी केली आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी