शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

‘कमकासूर’ समस्यांनी ग्रासलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 22:30 IST

तुमसर तालुक्यातील कमकासूर हे गाव बावनथडी प्रकल्पामुळे बाधित असून ज्या ठिकाणी पुनर्वसन करुन हे गाव बसविण्यात आले, त्याठिकाणी कोणत्याही प्रकारची आवश्यक व्यवस्था शासनाने केलेली नाही.

ठळक मुद्देनागरी सुविधांचा अभाव: पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरीच

लोकमत न्यूज नेटवर्कजांब (लोहारा) : तुमसर तालुक्यातील कमकासूर हे गाव बावनथडी प्रकल्पामुळे बाधित असून ज्या ठिकाणी पुनर्वसन करुन हे गाव बसविण्यात आले, त्याठिकाणी कोणत्याही प्रकारची आवश्यक व्यवस्था शासनाने केलेली नाही. कमकासूर हे गाव सुसूरडोह गट ग्रामपंचायतीकडे येत असून याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष असल्याची गावकºयांची तक्रार आहे.कमकासूर येथे इलेक्ट्रानिक विजेची व्यवस्था नाही, पिण्यायोग्य पाण्याची व्यवस्था नाही. आरोग्य विभागाने येथील पाणी तपासणी केली असता पिण्यास अयोग्य ठरविले. गावातील नाल्याचे केरकचरा व माती अपसा केलेला नाही.खांबावर पथदिवे नाहीत.गावाला लागून असलेल्या जंगलामुळे जंगली प्राण्याची भीती आहे. गावातील हातपंपामध्ये ब्लिचिंग पावडरची व्यवस्था ग्रामपंचायत करीत नाही. दूषित पाणी गावकºयांना उपयोगात आणावे लागते. पुनर्वसन ठिकाणी लोकांना रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. कमकासूर या गावात शंभर टक्के आदिवासी लोक असून कायद्यानुसार आदिवासींना भूमीहीन करता येत नाही. कमकासूर पुनर्वसन गावाच्या अवतीभोवती दुसºया गावातील लोक स्वत:ची मालकीची जमीन असून त्यांनी अतिक्रमण केले आहेत. त्यांनाच प्रशासकीय विभागाचे जमिनीचे पट्टे दिले आहे. ज्या आदिवासीच्या जमिनी बळकावून बावनथडी प्रकल्प तयार झाला आहे. त्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून जमिन मिळाली नाही. त्यांना भुमिहिन केले आहे. बेरोजगारांना रोजगार नाही. गाव पुनर्वसन झाल्यापासून ग्रामपंचायत, तहसील विभाग, पुनर्वसन विभाग, जिल्हा परिषद इतर प्रशासकीयविभागाने अजुनपर्यंत लोकांची समस्या जाणून घेतलेली नाही व त्यांना नागरिक व्यवस्था करुन दिलेली नाही.येथील आदिवासी शासनाच्या योजनेपासून वंचित आहेत. वरील समस्यांना कंटाळून आदिवासी समाज आता जुन्या गावाकडे शेतीवाडी करण्यास व वनकामे करण्यास स्थलांतरीत होण्याच्या मार्गावर आहेत. अन्यथा महसुल विभागाने उरनिर्वाह करीत प्रत्येक कुटूंबाला जमीन उपलब्ध करुन द्यावी.कमकासुर येथील विद्युतमिटर ५ वर्षापूर्वीच विद्युत विभागाने काढून नेल्याने शाळा डिजीटल करता येत नाही. याचा शैक्षणिक विकासावर वाईट परिणाम होत आहे. जुनी सुुसुरडोह ग्रामपंचायत कमकासुर गावाकडे अजिबात लक्ष देत नसल्यामुळे व सद्या स्थितीत १२ ते १५ किलो मिटर अंतर असल्याने कमकासुर येथील गावकºयांना त्रास होत आहे. तरी कमकासुर, रामपूर, हमेशा व गायमुख देवस्थान हे गाव मिळून नवी ग्रामपंचायत तयार करण्याची मागणी गावकºयांनी केली आहे.