शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

‘कमकासूर’ समस्यांनी ग्रासलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 22:30 IST

तुमसर तालुक्यातील कमकासूर हे गाव बावनथडी प्रकल्पामुळे बाधित असून ज्या ठिकाणी पुनर्वसन करुन हे गाव बसविण्यात आले, त्याठिकाणी कोणत्याही प्रकारची आवश्यक व्यवस्था शासनाने केलेली नाही.

ठळक मुद्देनागरी सुविधांचा अभाव: पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरीच

लोकमत न्यूज नेटवर्कजांब (लोहारा) : तुमसर तालुक्यातील कमकासूर हे गाव बावनथडी प्रकल्पामुळे बाधित असून ज्या ठिकाणी पुनर्वसन करुन हे गाव बसविण्यात आले, त्याठिकाणी कोणत्याही प्रकारची आवश्यक व्यवस्था शासनाने केलेली नाही. कमकासूर हे गाव सुसूरडोह गट ग्रामपंचायतीकडे येत असून याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष असल्याची गावकºयांची तक्रार आहे.कमकासूर येथे इलेक्ट्रानिक विजेची व्यवस्था नाही, पिण्यायोग्य पाण्याची व्यवस्था नाही. आरोग्य विभागाने येथील पाणी तपासणी केली असता पिण्यास अयोग्य ठरविले. गावातील नाल्याचे केरकचरा व माती अपसा केलेला नाही.खांबावर पथदिवे नाहीत.गावाला लागून असलेल्या जंगलामुळे जंगली प्राण्याची भीती आहे. गावातील हातपंपामध्ये ब्लिचिंग पावडरची व्यवस्था ग्रामपंचायत करीत नाही. दूषित पाणी गावकºयांना उपयोगात आणावे लागते. पुनर्वसन ठिकाणी लोकांना रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. कमकासूर या गावात शंभर टक्के आदिवासी लोक असून कायद्यानुसार आदिवासींना भूमीहीन करता येत नाही. कमकासूर पुनर्वसन गावाच्या अवतीभोवती दुसºया गावातील लोक स्वत:ची मालकीची जमीन असून त्यांनी अतिक्रमण केले आहेत. त्यांनाच प्रशासकीय विभागाचे जमिनीचे पट्टे दिले आहे. ज्या आदिवासीच्या जमिनी बळकावून बावनथडी प्रकल्प तयार झाला आहे. त्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून जमिन मिळाली नाही. त्यांना भुमिहिन केले आहे. बेरोजगारांना रोजगार नाही. गाव पुनर्वसन झाल्यापासून ग्रामपंचायत, तहसील विभाग, पुनर्वसन विभाग, जिल्हा परिषद इतर प्रशासकीयविभागाने अजुनपर्यंत लोकांची समस्या जाणून घेतलेली नाही व त्यांना नागरिक व्यवस्था करुन दिलेली नाही.येथील आदिवासी शासनाच्या योजनेपासून वंचित आहेत. वरील समस्यांना कंटाळून आदिवासी समाज आता जुन्या गावाकडे शेतीवाडी करण्यास व वनकामे करण्यास स्थलांतरीत होण्याच्या मार्गावर आहेत. अन्यथा महसुल विभागाने उरनिर्वाह करीत प्रत्येक कुटूंबाला जमीन उपलब्ध करुन द्यावी.कमकासुर येथील विद्युतमिटर ५ वर्षापूर्वीच विद्युत विभागाने काढून नेल्याने शाळा डिजीटल करता येत नाही. याचा शैक्षणिक विकासावर वाईट परिणाम होत आहे. जुनी सुुसुरडोह ग्रामपंचायत कमकासुर गावाकडे अजिबात लक्ष देत नसल्यामुळे व सद्या स्थितीत १२ ते १५ किलो मिटर अंतर असल्याने कमकासुर येथील गावकºयांना त्रास होत आहे. तरी कमकासुर, रामपूर, हमेशा व गायमुख देवस्थान हे गाव मिळून नवी ग्रामपंचायत तयार करण्याची मागणी गावकºयांनी केली आहे.