शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

राज्य मार्गावर पाण्यातून वाहनांचा धोकादायक प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:06 IST

रामटेक-गोंदिया राज्य मार्गावर सखल भागात रपटा आहे. सतत पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहत आहे. दीड ते दोन फुटापेक्षा जास्त पाणी वाहत आहे. वाहनांचा सदर रस्त्यावर धोकादायक प्रवास सुरु आहे. रपटा व रस्ता पाण्याने समतल झाल्याने रस्ता कुठे आहे ते वाहनधारकांना दिसत नाही. पाण्याचा प्रवाहाची गती जास्त आहे. सदर रस्ता मोठा वर्दळीचा आहे.

ठळक मुद्देरामटेक-गोंदिया राज्यमार्ग : बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, वर्दळीचा रस्ता

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : रामटेक-गोंदिया राज्य मार्गावर सखल भागात रपटा आहे. सतत पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहत आहे. दीड ते दोन फुटापेक्षा जास्त पाणी वाहत आहे. वाहनांचा सदर रस्त्यावर धोकादायक प्रवास सुरु आहे. रपटा व रस्ता पाण्याने समतल झाल्याने रस्ता कुठे आहे ते वाहनधारकांना दिसत नाही. पाण्याचा प्रवाहाची गती जास्त आहे. सदर रस्ता मोठा वर्दळीचा आहे.गत २४ तासात तुमसर तालुक्यात संततधार सुरु आहे. तुडका, तामसवाडी शिवारात एक रपटा तुडूंब भरून वाहत आहे. रामटेक गोंदिया राज्यमार्ग मोठा वर्दळीचा असून जड वाहने व लहान वाहनाचा पाण्याच्या प्रवाहातून वाहतूक करणे सुरु आहे. रपटा व रस्ता पाण्यामुळे एकच दिसत आहे. पाण्याचा प्रवाहाची गती जास्त आहे. दुचाकीस्वारांचा जीव येथे धोक्यात आहे.रपट्यला सुरक्षा कठडे नाही. त्यामुळे रस्ता कुठे आहे. याचा अंदाज येत नाही. रपट्याच्या पुढे वळण आहे. त्यामुळे नेमक्या रस्त्याचा अंदाज येथे चुकतो. रात्रीला वाहनधारकांना येथे बराच वेळ थांबावे लागते. स्थानिकांना विचारल्यावरच वाहनधार येथून पुढे जातात. प्रथमदर्शनी हा मोठा नाला तर नाही ना असा प्रश्न पडतो. बाजूला शेतशिवारात पाणीच पाणी असल्याने वाहनधारक येथे थांबतात. सोमवारी रात्री अनेक वाहने येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभी होती.सार्वजनिक बांधकाम विभागाने रपट्यावर पुल बांधकाम करण्याची गरज आहे. किमान रपट्यावर सुरक्षेकरिता कठडे तयार करणे गरजेचे आहे. मागील अनेक वर्षापासून पावसाळ्यात वाहनधारकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे.सुरक्षित प्रवासाची हमी सार्वजनिक बांधकाम विभाग देतो. परंतु येथे तो विसर पडलेला दिसत आहे. रात्री येथे किमान चौकीदार ठेवण्याची गरज आहे. महत्वपूर्ण रस्त्याचा येथे संबंधित विभागाला विसर पडलेला दिसत आहे. विभागाचे कार्यालय येथून केवळ तीन कि.मी. अंतरावर आहे हे विशेष. इतर रस्त्याची काय काळजी घेत असतील हा संशोधनाचा विषय आहे. संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.रस्ता सुरक्षिततेची हमी शासन घेते. येथे रामटेक गोंदिया महत्वपूर्ण रस्ता पाण्याखाली आला आहे. रपट्याचे पुलात रुपांतर बांधकाम विभागाने का केले नाही. अपघाताला संबंधित विभागालाच जबाबदार ठरवावे लागेल.-डॉ.पंकज कारेमोरे, युवा काँग्रेस नेते, तुमसर.