शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
3
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
6
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
7
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
8
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
9
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
10
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
11
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
12
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
13
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
14
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
15
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
16
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
17
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
18
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
19
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
20
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद

रेल्वे प्रवाशांचा जीव धोक्यात

By admin | Updated: February 12, 2015 00:35 IST

मुंबई-हावडा प्रमुख रेल्वे मार्गावर ओव्हरलोड कोळसा मालवाहू रेल्वे गाड्यांमुळे रेल्वे प्रवाशांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे.

मोहन भोयर तुमसरमुंबई-हावडा प्रमुख रेल्वे मार्गावर ओव्हरलोड कोळसा मालवाहू रेल्वे गाड्यांमुळे रेल्वे प्रवाशांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. पर्यावरण नियमांचे येथे सर्रास उल्लंघन होत आहे. दररोज या रेल्वे मार्गावर सुमारे ८० कोळसा वाहून कसे नेले जात आहे हा मुख्य प्रश्न येथे उपस्थित होतो.कोलवाशरीज मधला कोळसा गंतव्यवस्थानकावर मालगाड्यातून नेला जातो. प्रत्येक कोळसा मालगाडी ही ओव्हरलोड असते. मालडब्ब्यांच्या अगदी टोकापर्यंत कोळसा येथे ठासून भरला असतो. मुंबई-हावडा या प्रमुख रेल्वे मार्गावर कोळसा भरलेल मालवाहू रेल्वेगाड्या दिवसभर धावतात. सर्वच कोळसा भरलेल्या मालगाड्या ओव्हरलोडच असतात. सरासरी या कोळसा मालवाहू गाड्यांची गती ६० ते ७० कि़मी. प्रति तास असते. ठासून भरलेल्या कोळसा दगडी व भूकटीमय असते. भरधाव वेगाने धावणाऱ्या या गाड्यांतून कोळसा खाली पडतो. ढिगाऱ्यासारखा कोळशामुळे प्रवाशांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. शेकडो प्रवाशी फलाटावर गाडीच्या प्रतिक्षेत उभे असतात. मालवाहू कोळसा रेल्वे गाडीतून अलगद पडतो. कधी तो डोळ्यात तर कधी शरीराला इजा करत पडत जातो. क्षणात काय झाले हे प्रवाशांना कळत नाही. पर्यावरण नियमाचे येथे सर्रास उल्लंघन होत आहे. क्षमतेपेक्षा अधिक कोळसा येथे मालवाहू रेल्वेगाड्यात सर्रास नेला जात आहे. कोळशासारखा ज्वलनशिल तथा आरोग्यास अपायकारक कोळशाला वाहून नेतानी तो क्षमतेपेक्षा जास्त वाहून नेता येत नाही. तसेच त्या कोळशावर प्लॉस्टिक तथा तत्सम कापड छाकून नेणे बंधनकारक आहे. नियमावर बोट ठेवणारे रेल्वे प्रशासन यासंदर्भात काहीच बोलायला तयार नाही.मागील अनेक महिन्यापासून बिनबोभाट कोळशाची ओव्हरलोड वाहतूक सर्रास सुरू आहे. तुमसरपासून केवळ ८१ कि़मी. अंतरावर दक्षिण पूर्व रेल्वेचे विभागीय कार्यालय नागपूर येथे आहे. नागपूर पलीकडून हा कोळसा वाहून नेला जात आहे. येथे रेल्वे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.