इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वारूळातून मुंग्या निघाव्या, तशी स्थिती शहरातील अतिक्रमणाची झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर अतिक्रमण निर्मूलन मोहीम कोरोना संक्रमणाच्या काळात थंडी पडली. जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने २३४ चा टप्पा ओलांडल्यानंतरही नागरिक प्रतिबंधात्मक आदेश पायदळी तुडवीत आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर अतिक्रमणाला पुन्हा खतपाणी मिळत असून त्यातून पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.भंडारा शहराची लोकसंख्या दीड लाखांवर आहे. लॉकडाऊन शिथिल होताच हळूहळू परवानगीने दुकाने उघडायलाही सुरूवात झाली. मात्र परवानगी देताना जिल्हा प्रशासनाने अटी व शर्तीला प्राधान्य द्यावे, असे बजावून सांगितले. कुठल्याही दुकानातील सामान रस्त्यावर येणार नाही, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, तोंडावर मास्क असणे अनिवार्य आदी नियम घालून दिले. मात्र याला बहुतांश ठिकाणी हरताळ फासल्याचे दिसून येते. दर दिवशी पालिका कर्मचाऱ्यांना मुख्य रस्त्यावरून फेरफटका मारावा लागतो. त्यानंतरही स्थिती आवाक्याबाहेर जात असल्याचे दिसून येत आहे. अधिकारी, कर्मचारी निघून गेल्यावर ‘जैसे थे’ अशी स्थिती असते. आम्ही कुणाचेही ऐकणार नाही, असाच अविर्भाव जणू पाहायला मिळत आहे.टॅक्स भरूनही दिलासा नाहीफेरीवाले, हातठेलेचालक यासह अन्य किरकोळ दुकानदारांना त्यांच्या हक्काची जागा व दुकान उपलब्ध करून देण्यात येईल, असा मानस पालिका प्रशासनाने व्यक्त केला होता. मात्र गाळे तयार असतानाही त्याचे अजुनही वाटप झाले नाही. मोठ्या बाजारातून बसस्थानकाकडे जाणाºया रस्त्याची अक्षरश: वाट लागली असून १२ फुटाचा रस्ता पाच फुटाचा बनला आहे. येथे व्यापाऱ्यांना स्वत:चेच वाहन आतमध्ये आणायला जीकरिचे जात आहे. आम्ही टॅक्स भरूनही पालिका प्रशासन अतिक्रमण धारकांना बळ देत असेल तर टॅक्स भरून उपयोग तरी काय, असा सवाल व्यापारी विचारीत आहेत. अशीच स्थिती खातरोड मार्गाची दिसून येत आहे. रेल्वे लाईन ते म्हाडा कॉलोनीकडे जाणाºया रस्त्याच्या डाव्या साईडला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींना व पालिका पदाधिकाºयांना हे दिसत नसावेत तर नवलच.भंडारा शहरात कोरोनाबाधीतांची संख्या वाढत आहे. फारच आवश्यकता असेल तर घरातून बाहेर पडा. विणाकारण घराबाहेर जाऊ नका. आवश्यकता असल्यास मास्क व फिजीकल डिस्टन्सिंगचे पुर्णपणे पालन करा. व्यवसायीकांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. कर्मचारी घरोघरी जावुन सर्व्हेक्षण करीत आहे, त्यांना खरी माहिती द्यावी जेणेकरुन टारगेट व फोकस करुन भविष्यकालीन उपाययोजना करता येईल.- विनोद जाधव,मुख्याधिकारी, नगरपरिषद भंडारा
अतिक्रमणाचा विळखा अन् कोरोनाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:01 IST
भंडारा शहराची लोकसंख्या दीड लाखांवर आहे. लॉकडाऊन शिथिल होताच हळूहळू परवानगीने दुकाने उघडायलाही सुरूवात झाली. मात्र परवानगी देताना जिल्हा प्रशासनाने अटी व शर्तीला प्राधान्य द्यावे, असे बजावून सांगितले. कुठल्याही दुकानातील सामान रस्त्यावर येणार नाही, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, तोंडावर मास्क असणे अनिवार्य आदी नियम घालून दिले.
अतिक्रमणाचा विळखा अन् कोरोनाचा धोका
ठळक मुद्देनियम पायदळी : उद्रेक झाल्यावर सांभाळणार काय?, पालिका प्रशासनाची कारवाई सुरुच