शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

शेतात पाणी साचल्याने धानपिकाचे नुकसान

By admin | Updated: February 1, 2017 00:21 IST

जमनी येथील तलाठी साझा क्रमांक १३ मधील गट नंबर ८५/२ या शेतजमीनमध्ये घेण्यात आलेल्या धानपिकाचे नुकसान झाले आहे.

तहसीलदारांना निवेदन : नुकसानभरपाईची मागणीभंडारा : जमनी येथील तलाठी साझा क्रमांक १३ मधील गट नंबर ८५/२ या शेतजमीनमध्ये घेण्यात आलेल्या धानपिकाचे नुकसान झाले आहे. शेतीला लागून असलेल्या लेआऊट धारकाने पावसाचे वाहून जाणाऱ्या पाण्याचा मार्ग अडविल्यामुळे शेतपिकाचे नुकसान झाल्याचा आरोप भूपेंद्र वातुजी लांबट रा.दाभा यांनी केला आहे. या संंदर्भात दोषींवर दंड वसुलीची कारवाई करून झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी मागणीही लांबट यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित गट क्रमांकाच्या शेतीजवळ गैरअर्जदाराने गणेशनगरी ले आऊट नामक वसाहत निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे सदर ले आऊट बांधकाम प्रसंगी पुरातन काळापासून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गणेश नगरीजवळ असलेला मार्ग माती घालून बंद करण्यात आला. परिणामी पावसाचे पाणी लांबट यांच्या शेतातच साचून राहिले. त्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले. सद्यस्थितीत सदर जमीन उपजाऊ नसल्याने लांबट यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई देऊन दोषींवर दंड वसुलीची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)