शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
3
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
4
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
5
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
6
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
7
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
8
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
9
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
10
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
11
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
12
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
13
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
14
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
15
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
16
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
17
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
19
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
20
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ

वादळग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी

By admin | Updated: July 2, 2014 23:14 IST

१० जून रोजी सायंकाळी अचानक जोरदार वादळासहित मुसळधार पावसामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक घरांचे छप्पर, कवेलू, टिनपत्रे उडून गेलेत, कित्येक घरांच्या भिंतींना तडे गेले.

कऱ्हांडला : १० जून रोजी सायंकाळी अचानक जोरदार वादळासहित मुसळधार पावसामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक घरांचे छप्पर, कवेलू, टिनपत्रे उडून गेलेत, कित्येक घरांच्या भिंतींना तडे गेले. हजारो वृक्षाची पडझड झाली. उन्हाळी धान पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. त्यामुळे लाखोची हानी झाली. लाखांदूर तालुक्यातील कऱ्हांडला, विरली बु., राजनी, विरली खुर्द, नांदेड, ईटान, दोनाड, रोहनी, खैरना, मोहरना, कुडेगाव, डोकेसरांडी, ओपारा, किरमटी आदी गावातील वादळग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जि.प. सदस्य मनोहर महावाडे यांनी केली आहे.विद्युत तारांची जोडणी करावी अशीही मागणी केलेली आहे. वादळाने विरली विद्युत उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या २२ गावातील झाडे विद्युत तारावर पडले. त्यामुळे विद्युत तारा आणि विद्युत खांब तुटल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झालेला आहे. २० दिवसांचा कालावधी लोटूनही अनेक शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा सुरू झालेला नाही. पावसाने डोळे वटारलेले असून पऱ्ह्यांना पाणी देण्याची समस्या शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे. मृग नक्षत्राच्या प्रारंभी जोरदार पावसाने हजेरी लावली. पाऊस चांगल्या प्रमाणात असून पावसाला सुरूवात झाली, असा अंदाज शेतकऱ्यांनी लावला. मोठ्या प्रमाणावर खरीप धान पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली. सध्या पाऊस थांबला असून पेरणी केलेले पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सिंचनाची सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल कोरडवाहू शेतकऱ्याप्रमाणे झाले आहे. पऱ्हे जगविण्यासाठी सिंचनाची सुविधा व्हावी या हेतूने विद्युत वितरण कंपनीने तुटलेल्या विद्युत तारा आणि विद्युत खांब जोडणी करून विद्युत प्रवाह सुरू करावा, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे. (वार्ताहर)