शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

वादळग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी

By admin | Updated: July 2, 2014 23:14 IST

१० जून रोजी सायंकाळी अचानक जोरदार वादळासहित मुसळधार पावसामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक घरांचे छप्पर, कवेलू, टिनपत्रे उडून गेलेत, कित्येक घरांच्या भिंतींना तडे गेले.

कऱ्हांडला : १० जून रोजी सायंकाळी अचानक जोरदार वादळासहित मुसळधार पावसामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक घरांचे छप्पर, कवेलू, टिनपत्रे उडून गेलेत, कित्येक घरांच्या भिंतींना तडे गेले. हजारो वृक्षाची पडझड झाली. उन्हाळी धान पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. त्यामुळे लाखोची हानी झाली. लाखांदूर तालुक्यातील कऱ्हांडला, विरली बु., राजनी, विरली खुर्द, नांदेड, ईटान, दोनाड, रोहनी, खैरना, मोहरना, कुडेगाव, डोकेसरांडी, ओपारा, किरमटी आदी गावातील वादळग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जि.प. सदस्य मनोहर महावाडे यांनी केली आहे.विद्युत तारांची जोडणी करावी अशीही मागणी केलेली आहे. वादळाने विरली विद्युत उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या २२ गावातील झाडे विद्युत तारावर पडले. त्यामुळे विद्युत तारा आणि विद्युत खांब तुटल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झालेला आहे. २० दिवसांचा कालावधी लोटूनही अनेक शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा सुरू झालेला नाही. पावसाने डोळे वटारलेले असून पऱ्ह्यांना पाणी देण्याची समस्या शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे. मृग नक्षत्राच्या प्रारंभी जोरदार पावसाने हजेरी लावली. पाऊस चांगल्या प्रमाणात असून पावसाला सुरूवात झाली, असा अंदाज शेतकऱ्यांनी लावला. मोठ्या प्रमाणावर खरीप धान पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली. सध्या पाऊस थांबला असून पेरणी केलेले पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सिंचनाची सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल कोरडवाहू शेतकऱ्याप्रमाणे झाले आहे. पऱ्हे जगविण्यासाठी सिंचनाची सुविधा व्हावी या हेतूने विद्युत वितरण कंपनीने तुटलेल्या विद्युत तारा आणि विद्युत खांब जोडणी करून विद्युत प्रवाह सुरू करावा, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे. (वार्ताहर)