शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याच्या अपूर्ण बांधकामामुळे शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:31 IST

२५ लोक १४ के बारव्हा: लाखांदूर तालुक्यातील बोथली येथील शेतकरी दौलत तुकाराम तोंडरे यांची गट क्रमांक १६८ आराजी ३ ...

२५ लोक १४ के

बारव्हा: लाखांदूर तालुक्यातील बोथली येथील शेतकरी दौलत तुकाराम तोंडरे यांची गट क्रमांक १६८ आराजी ३ तीन एकर मालकी हक्काची जमीन आहे. यांच्या जमिनीमधून मासळ वितरिकेच्या एल-३ थ्री लघुकालव्याचे २०१८ मध्ये बांधकाम करण्यात आले आहे. त्या अगोदर मुख्य डाव्या कालव्यावरून मासळ वितरिकेचे बांधकाम सुरू असताना गुंजेपार किन्ही येथील शेतकऱ्यांनी जमिनीचा मोबदला कमी आहे. म्हणून सुरू असलेल्या बांधकामात अडथळा आणून सुरू असलेले काम बंद पाडले. तेव्हापासून नहराचे बांधकाम किन्ही गुंजेपारच्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत काम करून पुढील गोसे प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंद केले. कालव्याचे काम अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे मुख्य डाव्या कालव्यावरून मासळ वितरिकेच्या कालव्यावरून पाणी वाहात येऊन किन्ही गुंजेपारच्या शेतकऱ्यांच्या शेतात साचत आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे.

पुढे कालव्याचे बांधकाम नसल्यामुळे पाणि वाहात येऊन या शेतकऱ्याच्या शेतात साचून राहतो. त्यामुळे संपूर्ण धान पीक पाण्याखाली येऊन सडतो. शेतातील पाणी काढण्यासाठी तीन वर्षांपूर्वी संबंधित विभागाला तक्रारी दाखल केल्यानंतर सन-२०२० मध्ये एल थ्री कालव्यावर गट क्रमांक १६८ जमिनीमध्ये चुकीच्या ठिकाणी कालव्याच्या खालून मोठे सिमेंटचे पाईप टाकण्यात आले. दोन्ही बाजूला १० दहा ते १२ फुटाचे टाके बनवून ४ चार ते ५ पाच लाख रुपये खर्च करून डिएचपीसी बनविण्यात आली. चुकीच्या ठिकाणी डिएचपीसी बनविण्यात आल्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. याला सर्वस्वी जबाबदार सबंधित विभागाचे अधिकारी आहेत. त्याच प्रमाणे मासळ वितरिकेच्या एल -३ थ्री लघु कालव्याचे बांधकाम माती भरून करावयाचे होते. मात्र काव्यावर माती भरतांना तांत्रिकदृष्ट्या कालव्याचे लेव्हल बरोबर नसून कालव्याच्या पारिवर कमी प्रमाणात मुरूम टाकल्या मुळे कालव्याच्या पारिवर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. त्याचप्रमाणे कालव्याच्या पोटामध्ये मध्ये भागात एकही मुरूम टाकलेला नाही.व कालव्यातून शेतामध्ये पाणी जाण्यासाठी बनविलेल्या सिमेंटच्या गेटा ह्या चुकीच्या पध्दतीने बनविण्यात आल्यामुळे कालव्याच्या प्रत्येक गेटवर टिन आडवे करून पाणी द्यावे लागते. आणि गेट जमिनीच्या खाली असल्यामुळे उलट शेतातील पाणी कालव्यामध्ये वाहात जातो. या साठी संबंधित विभागाला ४ चार वर्षांपासून सतत तक्रारी करूनसुध्दा आतापर्यंत कोणतीही कार्यवाही न करता चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार करून शेतकऱ्याची दिशाभूल केली आहे.

प्रकरण अलगट येऊ नये म्हणून दोन वर्षांनंतर तहसीलदार लाखांदूर यांना अर्ज लिहून अतिवृष्टीमुळे नुकसान झाली आहे तरी तहसील कार्यालयामार्फत नुकसान देण्यात यावी. असे गोसे खुर्द डावा कालवा येथील अधिकाऱ्यांनी खोटे पत्रव्यवहार केले आहे. शेतकऱ्यांची नुकसान ही अपूर्ण व निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे झाली आहे. हे माहीत असूनसुद्धा हेतुपुरस्सर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत नुकसान भरपाई न देता दरवर्षी नुकसान करण्याच्या उद्देशाने शासनाला अजूनपर्यंत माहिती दिली नाही. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करून झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी. दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी परिसरातील संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे.