शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
2
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
3
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
4
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
5
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
6
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
7
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
8
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
11
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
12
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
13
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
14
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
15
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
16
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
17
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
18
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
19
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!

पवनीतील पर्यटन संकुलाची दैनावस्था

By admin | Updated: November 17, 2015 00:40 IST

तालुक्यातील पर्यटन स्थळ व भेटी देणारे पर्यटक यांचा विचार करुन शासनाने निसर्गरम्य बालसमुद्र तलावाच्या काठावर पर्यटन संकुल मंजूर केले.

शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष : कोट्यवधी रुपयांची वास्तू ठरत आहे ‘शो-पीस’, पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर अशोक पारधी पवनी तालुक्यातील पर्यटन स्थळ व भेटी देणारे पर्यटक यांचा विचार करुन शासनाने निसर्गरम्य बालसमुद्र तलावाच्या काठावर पर्यटन संकुल मंजूर केले. पर्यटन संकूलाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले. कंत्राटदाराला कामाचे देयक न मिळाल्यामुळे किरकोळ काम रखडले आहेत. त्यामुळे हस्तांतरणाची प्रक्रीया रखडली आहे. सध्या बांधकाम झालेल्या पर्यटन संकूलाची दैनावस्था सुरु झाली आहे.प्राचीन व ऐतिहासीक वारसा असलेले पवनी नगर विदर्भाची काशी म्हणून संबोधल्या जाते. व्यापारासाठी भूतकाळात प्रसिध्द असलेल्या नगराचे संरक्षणासाठी मानवनिर्मित इंग्रजी 'यु' आकाराची संरक्षण भिंत व जवाहर गेटपासून काही अंतरापर्यंत भिंतीवर बांधलेली तटबंदी, परकोट (किल्ला), विदर्भातील अष्टविनायकापैकी एक असेलेले पंचानन गणेश (सर्वतोभद्र) किंवा पंचमुखी गणेश, धरणीधर गणेश मंदिर, वैजेश्वर देवस्थान, मुरलीधर मंदिर, गधादेव, जगन्नाथ मंदीर, दिवाणघाट, वैजेश्वर घाट, पुरातत्व विभागाने उत्खनन करुन शोभलेले मंडप, बुध्द स्तुप व त्याचे अवशेष, चंडीका मंदिर, विठ्ठल रुखमाई मंदिर, दत्त मंदिर, राम मंदिर, देम्बेस्वामी साधना मंदिर व शिल्पकतेचा उत्तम नमुना असलेले गरुड खांब तसेच गोसीखुर्द धरण, कऱ्हांडला पवनी अभयारण्य, रुयाळ येथील महासमाधीभूमी परिसर, कोरंभी डोंगरावरील महादेव मंदिर, ठाणा येथील निसर्गरम्य चंडीकामंदिर व अभयाण्यामुळे प्रवेशास बंदी असलेले ढिवरढुटी असे अनेक पर्यटक स्थळ पवनी तालुक्यात आहे.ही सर्व स्थळे एका दिवसात पाहणे शक्य नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने पर्यटन मंत्रालयाने पवनी येथे ७ वर्षांपूर्वी पर्यटन संकूल प्रस्तावित करुन बांधकाम सुरु केले. थाटात भुमिपूजन झाले. अल्पावधीत बांधकाम पूर्ण करण्याचे आश्वासन तत्कालीन मंत्र्यानी दिले. पंरतु लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही, अशी म्हण आहे. अगदी तसेच पर्यटन संकुलाचे बाबतीत झाले.कोट्यवधीचे हे पर्यटन संकूल बांधून तयार आहे. पर्यटकाना रमवेल असे स्थळ निवडण्यात आले. परंतु शासनाचे दुर्लक्षामुळे कोट्यवधी रुपये खर्च झालेली इमारत धुळखात पडलेली आहे. छतावर स्लॅप ऐवजी टीनपत्रे वापरली असल्याने ती उडू लागली आहेत. पावसाचे पाणी गळून सिलिंगचे पिओपी गळून पडत आहे.झालेली रंगरंगोटी खराब होत आहे. पर्यटन विभाग या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याने पर्यटकात नाराजीचा सूर आहे. पर्यटन संकूल पर्यटकांच्या सेवेसाठी लवकर सुरु करावे, अशी मागणी जोर धरत आहे.