शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

ग्राहक मंच कार्यालयात तक्रारदारांना ‘तारीख पे तारीख’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 22:14 IST

उद्योजक, व्यापारी यांच्यासह अन्य व्यवहारांमध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मागण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घ्यावी लागते.

ठळक मुद्देग्राहक मंच अध्यक्षाविना : पदभरती प्रक्रियेत उदासीनता

देवानंद नंदेश्वर ।आॅनलाईन लोकमतभंडारा : उद्योजक, व्यापारी यांच्यासह अन्य व्यवहारांमध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मागण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घ्यावी लागते. त्याठिकाणी सर्वसामान्य ग्राहकांना न्याय मिळतो. मात्र भंडारा येथे मागील सहा महिन्यांपासून जिल्हा ग्राहक तक्रार मंचच्या न्यायव्यवस्थेत अध्यक्षपद रिक्त आहे. परिणामी, ग्राहक न्यायाच्या प्रतिक्षेत ताटकळत आहेत. मागील सहा महिन्यांपासून ग्राहकांना ‘तारीख पे तारीख’ देण्यात येत असल्याने अनेक जण न्यायापासून वंचित ठरले आहेत.भंडारा जिल्हा तक्रार निवारण मंचात सहा महिन्यांपासून अध्यक्ष नसल्यामुळे अनेक प्रकरणे पडून आहेत. या सहा महिन्यात महावितरण कंपनी, उत्पादक कंपनी, बँक, बांधकाम व्यावसायिक व शेती व्यवसायामध्ये विविध कंपन्यांनी दिलेल्या बिलांमधून अनेकांची फसवणूक झालेली आहे. त्यामुळे शेकडो ग्राहकांनी विविध कारणास्तव ग्राहक मंचामध्ये धाव घेतली आहे. परंतू अध्यक्ष नसल्यामुळे सहा महिन्यांपासून एकालाही न्याय मिळालेला नाही. गणेशपूर मार्गावर निवारण मंचची प्रशस्त ईमारत आहे. या कार्यालयात अनेक कर्मचारी कार्यरत आहेत. या कार्यालयावर शासनाचा ५० ते ६० लाख रूपये वार्षिक खर्च होतो. परंतू अलिकडे अध्यक्ष नसल्यामुळे तक्रारदारांना ‘तारीख पे तारीख’ दिली जात आहे.अध्यक्षपद भरतीची प्रक्रिया १० पासूनजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्षपदाची मुलाखत प्रक्रिया १० ते २४ जानेवारीपर्यत ठेवण्यात आली आहे. या मुलाखतीतून अध्यक्षांची निवड करण्यात येईल. त्यानंतर प्रलंबित प्रकरणांचे निराकरण होणार असल्याची माहिती ग्राहक मंच कार्यालयातून मिळाली आहे.अध्यक्षांसह चार पदे रिक्तजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यालयात अध्यक्षांसह अधीक्षक, अभिलेखापाल, शिपाई असे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. ‘जागो ग्राहक जागो’ ही जाहिरात करण्यापलिकडे सरकारने फारशी जागृतीसाठी केली नसल्याचे येथे दिसून येत आहे.कायद्यापासून ग्राहकच वंचितभंडारा जिल्हा व तालुका प्रशासनातर्फे २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक संरक्षण दिन साजरा करण्यात आला. १९८६ साली या तारखेला ग्राहक संरक्षण कायदा पास झाला. या कायद्याच्या कक्षा वेळोवेळी रुंदावण्यात आल्या. हा कायदा सुटसुटीत असून, त्यांची यथायोग्य अंमलबजावणी झाली तर ग्राहकांवर अन्याय करणाºयांना नक्की जरब बसू शकेल. पण या संरक्षण कायद्यापासून ग्राहकच वंचित असल्याचा अनुभव आहे.ग्राहक मंचावरील भार कारणीभूतकमी खर्च व प्रकरणांचा झटपट निपटारा करून ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर असलेल्या ग्राहक मंचांवर कामाचा भार वाढत आहे. वाढत्या जागरुकतेमुळे फसवणूक झाल्यावर दाद मागणाºयांची संख्या वाढू लागली आहे. या ग्राहक मंचावर कामाचा तसेच प्रलंबित प्रकरणे वाढतआहे.वेबसाईटही ‘आऊटडेटेड’जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष एम.जी. चिलबुले हे सहा महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून अध्यक्षपद रिक्त आहे. मात्र शासकीय वेबसाईटवर अद्यापही चिलबुले यांच्यापूर्वी असलेले तत्कालीन अध्यक्ष ए.डी. आळशी यांचे नाव आहे. त्यांचा पाच वर्षाचा कालावधी २७ जानेवारी २०१९ पर्यत असल्याचे नमूद आहे. ही माहिती ‘अपडेट’ करण्यात आलेली नाही.