शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

संचारबंदीमुळे व्यावसायिकांची उलाढाल झाली ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:35 IST

चुल्हाड ( सिहोरा ) : गत वर्षभरापासून सातत्याने कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर कधी लॉकडाऊन, तर कधी ...

चुल्हाड ( सिहोरा ) : गत वर्षभरापासून सातत्याने कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर कधी लॉकडाऊन, तर कधी संचारबंदी लावण्यात येत असल्याने अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. मात्र यामुळे हेच व्यावसायिक बँकेच्या कर्जात अडकले आहेत. व्यवसाय बंद असल्याने अनेकांचे कर्जाचे हप्ते थकले असून, व्यावसायिक प्रचंड मानसिक तणावात आहेत. शासन स्तरावर मोफत अन्नधान्य वितरित करण्यात येत असले तरी व्यावसायिकांना मात्र शासनाने कोणती मदत दिलेली नाही.

सिहोरा परिसरात अनेकांनी याबाबत आपबिती व्यक्त केली आहे. कोरोना विषाणू संसर्गचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन लॉकडाऊन घोषित करीत आहे. व्यवसाय भरभराटीच्या कालावधीतच लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. यामुळे व्यावसायिक अडचणीत येत आहेत. सिहोरा परिसरातील व्यावसायिकांनी दुकाने थाटण्यासाठी पतसंस्था, बँका अन्य संस्थांचे कर्ज घेतले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात चालणारे हंगामी व्यवसाय बंद राहत असल्याने कर्ज फेडण्याची चिंता अनेकांना सतावत आहे. परंतु, गेल्या वर्षांपासून याच उन्हाळ्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. ऐन सणासुदीत व्यवसायही ठप्प होते. यामुळे व्यावसायिकांवर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. गेल्या वर्षीच्या काहींनी व्यवसाय पुनर्जीवित करण्यासाठी बँकांची दारे ठोठावावी लागली. मात्र, आता पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. शासन स्तरावर शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य वितरित करण्यात येत आहेत. परंतु व्यावसायिकाच्या कर्जाचा विचार कुणी करीत नाहीत. यामुळे अनेक व्यावसायिकांना कर्ज फेडण्यासाठी दागदागिने सावकाराकडे गहाण ठेवावे लागत आहेत. व्यावसायिकांपाठोपाठ रोजगार शोधून उदरनिर्वाह करणाऱ्या कामगार, मजुरांचेसुद्धा हाल होत आहेत. कर्ज थकले असताना व्याज मात्र सुरूच आहे. व्याजदर व्यावसायिकांना मृत्यूच्या दारात नेत असल्याचे दिसून येत आहे. व्यावसायिकांच्या वेदना, समस्या, अडचणीचे गांभीर्य लक्षात घेत सरकारने मदत करावी अशी मागणी आहे.

बॉक्स

सर्वसामान्यांनी जगावे तरी कसे?

लॉकडाऊन कालावधीत महागाईने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. खाद्यतेल कढईतून गायब होतेय की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे दर वाढविले जात नाहीत. मात्र, किराणा दुकानातील साहित्य महागले आहे. किराणा खरेदी करताना सर्वसामान्य घामाघूम होत आहेत. एकीकडे रोजगार नाही, पैसा नाही, कुटुंबीयांचे उदरनिर्वाहची चिंता असल्याने अनेकांना शारीरिक व्याधींचा सामना करावा लागत आहे.

कोट

गतवर्षी लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे व्यावसायिक वाढत्या कर्जाच्या थकीत हप्त्याने चिंतीत आहेत. बँका, पतसंस्थांचे कर्ज, व्याज वाढत आहे. यामुळे सरकारने व्यावसायिकांचे तीन वर्षांपर्यंतचे व्याज रद्द करायला पाहिजे. केंद्र व राज्य शासनाने व्यावसायिकांचे मदतीला धावून आले पाहिजे.

राजा रामवाणी, अध्यक्ष, व्यापारी संघटना सिहोरा.

कोट

लॉकडाऊनमुळे लहान व्यावसायिकाचे व्यवसाय बंद झाले आहेत. ते पुन्हा बेरोजगार झाले असून, त्यांनाही सरकारने मदतीचा हात दिला पाहिजे, त्यांच्याही खांद्यावर कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी आहे. सर्व जनतेला मदतीचा हात देताना या घटकांचाही विचार करण्याची गरज आहे.

किशोर राहगडाले, युवा नेते बिनाखी.