शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

सीटी-1 वाघ जेरबंद; नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2022 23:23 IST

नरभक्षी सीटी १ वाघाने मागील १० महिन्यांपूर्वी विदर्भातील भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील विविध वनपरिक्षेत्रातील जंगलात आतंक माजविले होते. या वाघाने नियमित अंतराने ३ जिल्ह्यांतील विविध जंगल क्षेत्रातील एकूण १३ पेक्षा अधिक व्यक्तींची शिकार केली होती. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील ४, गडचिरोली जिल्ह्यातील ६ व चंद्रपूर जिल्ह्यातील ३ व्यक्तींचा समावेश आहे.

दयाल भोवतेलाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तीन जिल्ह्यात धुमाकूळ घालून १३ जणांचा बळी घेणाऱ्या सीटी १ वाघाला वन विभागाने अखेर जेरबंद केले आहे. तब्बल १० महिन्यांनंतर नरभक्षी सीटी वन वाघाला जेरबंद करताच लाखांदूर तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गत तीन आठवड्यांपासून वाघ हुलकावणी देत होता. तालुक्याच्या सीमेला लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वनपरिक्षेत्रात वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले.नरभक्षी सीटी १ वाघाने मागील १० महिन्यांपूर्वी विदर्भातील भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील विविध वनपरिक्षेत्रातील जंगलात आतंक माजविले होते. या वाघाने नियमित अंतराने ३ जिल्ह्यांतील विविध जंगल क्षेत्रातील एकूण १३ पेक्षा अधिक व्यक्तींची शिकार केली होती. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील ४, गडचिरोली जिल्ह्यातील ६ व चंद्रपूर जिल्ह्यातील ३ व्यक्तींचा समावेश आहे.नरभक्षी वाघाने शिकार केल्याच्या घटना उघडकीस आल्यानंतर वनविभागांसह नागरिकांमध्ये प्रचंड दहशत व रोष व्यक्त केला जात होता.  नरभक्षी वाघाला तीन दिवसांत जेरबंद करण्याचे निर्देश मागील २ दिवसांपूर्वी शासनाने निर्गमित केले होते. १३ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती एकलपूर जंगल शिवारात नरभक्षी वाघाला डार्ट अंतर्गत बेशुद्ध करून पिंजऱ्यात कैद करण्यात आले आहे. निर्देशानुसार वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाघाला जेरबंद करण्याचे आव्हान पूर्ण करीत यश प्राप्त केल्याने नागरिकांत आनंद व्यक्त केला जात आहे. 

१५ दिवसांपासून देत होता हुलकावणी- १५ दिवसांत दोन व्यक्तींची शिकार करणाऱ्या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने वनपरिक्षेत्रांतर्गत तब्बल ६० ट्रॅप कॅमेरे व ठिकठिकाणी मचाणी उभारून त्यावर शार्प शूटर तैनात केले होते.  १५ दिवसांपासून वनविभाग वाघाच्या मागावर होते.

लाखांदूर तालुक्यातील चार जणांची शिकार- लाखांदूर तालुक्यातील विविध जंगलात नरभक्षी वाघाने एकूण ४ व्यक्तींची शिकार केल्याच्या घटना उघडकीस आली आहे. त्यामध्ये २७ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास दहेगाव जंगलात जलाऊ लाकडे गोळा करण्यासाठी गेलेल्या स्थानिक लाखांदूर येथील प्रमोद चौधरी नामक ५४ वर्षीय इसमाची शिकार केली होती तर ४ एप्रिल रोजी इंदोरा येथील जंगलात जयपाल कुंभरे (४०) वर्षीय नामक इसमाची मोहफुल गोळा करताना शिकार केली होती.  २१ सप्टेंबर रोजी विनय खगेण मंडल (४५) रा अरुणनगर नामक इसमाची मासे पकडण्यासाठी गेला असता वाघाने शिकार केली. या घटनेला आठवडा लोटत नाही तोच कन्हाळगाव शेतशिवारात मालकी शेतातील धान पिकाची पाहणी करण्यासाठी अन्य एका साथीदारासह गेलेल्या तेजराम कार नामक शेतकऱ्यावर वाघाने हल्ला चढवून ठार केले. नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 

 

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग