शहरं
Join us  
Trending Stories
1
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
2
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
3
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
4
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
5
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
6
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
7
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
8
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
9
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
10
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
11
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
12
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
13
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
14
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
15
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
16
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
17
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
18
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
19
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
20
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!

गरदेव यात्रेत उसळला भाविकांचा जनसमुदाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 22:25 IST

१५० वर्षाची जत्रेची परंपरा कायम ठेवण्यासाठी नेरला ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला.

ठळक मुद्देपोलिसांचा चोख बंदोबस्त : नेरल्यात लोकसहभाग, पालांदुरात लोकगीत कार्यक्रम

विशाल रणदिवे/मुखरू बागडे ।आॅनलाईन लोकमतअड्याळ/पालांदूर: १५० वर्षाची जत्रेची परंपरा कायम ठेवण्यासाठी नेरला ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला. सहा महिण्यापूर्वीपासूनच गरदेव खांबाच्या बांधकामाला सुरुवात केली. यासाठी साडेतीन लाखांची लोकवर्गनी ज़मा केली. यातून गरदेव खांब उभारल्यात आल्यामुळेच नेरला गावातील गरदेव यात्रेची परंपरा मात्र कायम राहिली.आधीसारखे जंगल राहिले नाही आणि त्यामुळे गरदेवासाठी लागणारे मजबुत व लांब खांब सुध्दा मिळत नसल्यामुळे नेरला ग्रामस्थ तसेच पंच कमेटीने सिमेंट खांब उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ग्रामस्थांनी मिळेल तेवढी लोकवर्गणी गोळा केली. गरदेव यात्रेदरम्यान गावाला जत्रेचे स्वरुप आले होते. तीस ते चाळीस गावातील ग्रामस्थ ही गरदेव यात्रा बघायला येतात. या गावातील गरदेव यात्रा ही धुलीवंदनाच्या दिवशी होत असली तरी गावात कुणीही रंग खेळत नाही, हे विशेष. गरदेव यात्रेदरम्यान या गावातील ग्रामस्थ तसेच यात्रेत येणारा कुठलाही ग्रामस्थ मात्र ही परंपरा आजही कायम ठेवतांना दिसतात. नेरला गावातील गरदेव यात्रा दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी धुलीवंदनाच्या दिवशी उत्साहात पार पडली. यात्रेदरम्यान कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून ग्रामपंचायत सरपंच अनिल कोदाणे यांनी आधीच पोलिस बंदोबस्त मागितला. मागील वर्षीपेक्षा यावर्षी यात्रेत येणाºयांची संख्या मात्र जास्ती होती. यात्रेतील भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गरदेव यात्रेचे आजही ग्रामीण भागात महत्व आहे. श्रध्दा व विश्वास आजही कायम बघायला मिळते. गावातील प्रत्येक घरात आठवडापूर्वीच गरदेव यात्रा व दर्शनासाठी पाहुणे मंडळी येणे सुरु होते. त्यामुळे या दिवशी मुलगा-मुलगी पाहणे, लग्न कार्यजोडणे यानिमित्ताने होते. यासाठी नेरला ग्रामवासीय, गरदेव भक्तांनी यात्रेसाठी पुढाकार घेतला.पालांदुरात खंडोबा रायाच्या ‘ऊदो-ऊदो’ चा गजरपालांदूर चौ. : फाल्गुन पौर्णिमा अर्थात होळी म्हणजे आनंदाची पर्वणीच. हिंदू संस्कृतीत होळी व धुळवडीला विशेष महत्व आहे. पौराणीक महाराष्टÑाच्या संस्कृतीत प्रत्येक सणाला विशेषत्व असते. दुर्गुणांची होळी करी सद्गुणांची पेरणी असा हा आनंदोत्सवाचा सण म्हणजेच होळी. होळीचा पाडवा म्हणजे रंगपंचमी, रंगपंचमी म्हणजे विविध रंगाची उधळण करीत विविधतेत एकता निर्माण करुन गुण्यागोविंदाने समाजमन फुलविण्याचा प्रामाणिक प्रयत्नांचा सण. सकाळच्या सत्रात रंग उधळून मौजमजा करायची. दुसºया सत्रात गावातच गरदेव यात्रेत सहभागी होवून गोडगाठी एकमेकांना देत शुभेच्छांचा वर्षाव करायचा, म्हणजे शिमगा सण साजरा करायचा. पालांदुरात दुसºया सत्रात गरदेव यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. जेष्ठ मंडळी गरदेव यात्रेत एखाद्या झाडाखाली मोकळ्या जागेत बसून संभाव्या वरवधू, पिकपाणी, सुखदु:ख या विषयात चर्चेचे गुऱ्हाळ मांडतात. काही गावात भजनीमंडळी रंग उत्सवादरम्यान उत्कृष्ठ भजन गात रोज बक्षीस मिळवून त्या मोबदलयात रात्रीला पानदानाच नियोजन करतात. यातून सलोखा टिकून एकमेकांविषयी आपुलकी वाढिचे मोठे महत्व तयार झाले आहे. गरदेव यात्रेत पुजारी मनोभावे गरदेवाची पुजा करुन पारंपारिक वाद्य डहाके वाजवीत लोकगीताची झलकार सादर करुन रोख बक्षीस मिळवितात. खंडोबा देवाचे नाव घेत बक्षीस दात्यांचे नाव विविध अलंकाराने सजवून त्यांचा सन्मानाने उल्लेख करतात. दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही गरदेव यात्रा शांततेत पार पडली. गावकऱ्यांनी सार्थ हजेरी लावीत जत्रेचा आनंद द्विगुणीत केला. यात्रेतून छोट्या-मोठ्या व्यावसायीकांना अर्थार्जन झाले.