शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

उद्दिष्टाच्या ६७ टक्केच पीक कर्ज वाटप

By admin | Updated: July 14, 2015 01:09 IST

खरीप हंगामातील शेतकऱ्यांना १०० टक्के पीक कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट सरकारने बँकांना दिले असताना

देवानंद नंदेश्वर ल्ल भंडारा : खरीप हंगामातील शेतकऱ्यांना १०० टक्के पीक कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट सरकारने बँकांना दिले असताना आतापर्यंत ६७ हजार ७२८ शेतकऱ्यांना ३१२ कोटी ४२ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. हे प्रमाण दिलेल्या उद्दिष्टांच्या ६७ टक्के इतकेच असल्याचे दिसून आले आहे.भंडारा जिल्ह्यात २३ पिक कर्जवाटप करणाऱ्या बँका आहेत. यात १८ राष्ट्रीयकृत, ३ खासगी, तर २ रिजनल रुरल बॅक व भंडारा जिल्हा मध्यवर्ती बॅकेचा समावेश आहे. यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४६४ कोटी २५ लाख रुपयांचे खरीप पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ठ देण्यात आले होते. मात्र खाजगी तसेच शासकिय बँकांनी शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटपाबद्दलची दाखविलेली अनास्था यामुळे उद्दिष्ठपुर्ती होऊ शकली नाही. मागील वर्षी ३९० कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. यात ६२ हजार ८१४ शेतकऱ्यांना २६४ कोटी ३६ लाख शेतकऱ्यांना त्यावेळी कर्ज वाटप झाले होते. जिल्हा बँकेने केले सर्वाधिक वाटप आतापर्यंत सर्वाधिक पिक कर्जवाटप जिल्हा मध्यवर्ती बँकने बँकेने केले. त्याची टक्केवारी ८२ आहे. यापाठोपाठ विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने ५७, राष्ट्रीयकृत बँक ४५, तर खासगी बॅकांनी केवळ १५ टक्के खरीप पिक कर्ज वाटप केले. मागीलवर्षी जिल्हा मध्यवर्ती बँकने १०५ टक्के, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने ६०, राष्ट्रीयकृत बँकेने २० तर खासगी बॅकांनी केवळ १२ टक्के खरीप पिक कर्जवाटप केले होते. पुनर्गठन ८.९२ कोटींचे जिल्ह्यातील ८६३ शेतकऱ्यांपैकी आतापर्यत ७३३ शेतकऱ्यांच्या ८ कोटी ९२ लाख रुपयांच्या पिक कर्जाचे बँकांनी पुर्नगठण केले. वास्तविक पुर्नगठण यापेक्षा जास्त करावयास हवे होते. मात्र बँका तेही पुर्ण करू शकल्या नाही. ३५ शेतकऱ्यांनी कर्ज घेण्यास नकार दिला आहे.