शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चालक-वाहकांच्या मनमानीचा कळस

By admin | Updated: October 22, 2014 23:13 IST

बसचालक आणि वाहकांच्या मनमानीमुळे प्रवासी त्रस्त झाले असून, नियोजित थांब्यावर बस न थांबविणे, सुट्या पैशांसाठी प्रवाशांची अडवणूक करणे, वेळेची नियमितता न पाळणे अशा प्रकारात वाढ झाल्याचे दिसत आहे.

भंडारा : बसचालक आणि वाहकांच्या मनमानीमुळे प्रवासी त्रस्त झाले असून, नियोजित थांब्यावर बस न थांबविणे, सुट्या पैशांसाठी प्रवाशांची अडवणूक करणे, वेळेची नियमितता न पाळणे अशा प्रकारात वाढ झाल्याचे दिसत आहे.प्रवाशांच्या सेवेसाठी असे राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीचे घोषवाक्य आहे. परंतु याच घोषवाक्याचा विसर एसटी कर्मचाऱ्यांना पडलेला दिसत असून, बसचालक आणि वाहकांच्या मनमानीमुळे भंडारा, साकोली, पवनी तालुक्यातील प्रवासी त्रस्त झाल्याचे चित्र दिसत आहे. भंडारा, साकोली, पवनी मार्गावर अनेक ठिकाणी बसस्थांबे आहेत. या ठिकाणी बस थांबविणे आवश्यक असताना बसचालक आणि वाहकही ती काळजी घेत नसल्याचे दिसते. बसचालकांच्या या मनमानीमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप होतो. वेळेवर बस न मिळाल्याने त्यांची विविध कामेही खोळंबतात. त्याशिवाय प्रवास भाड्यावरूनही बसवाहक प्रवाशांची अडवणूक करीत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. प्रवाशांकडे नेमके सुटे पैसे नसल्यास त्यांना वाहकांकडून उद्धटपणाची वागणूक देण्यात येत. तिकिटावर लिहून उर्वरित पैसे नंतर देण्याचे सांगण्यात येते. परंतु प्रवास संपल्यानंतर प्रवासी वाहकांकडे उर्वरित पैशांची मागणी करतात त्यावेळी उलट प्रवाशांच्या उर्वरित पैशांचे गणित जुळवून त्यांच्याकडे दहा रूपये, वीस रूपयांची नोट देवून त्याचे सुटे घेवून हिशोब चुकता करण्याचा सल्ला देण्यात येतो, त्याशिवाय अनेक वाहक आणि चालक वेळेचे भानही ठेवत असल्याचे दिसत नाही. उपहारगृह किंवा इतर ठिकाणी उभे राहून गप्पा ठोकत असल्याचे दिसतात. त्यामुळे प्रवाशांना ठरलेल्या ठिकाणी वेळेवर पोहोचता येत नाही. (नगर प्रतिनिधी)