शहरं
Join us  
Trending Stories
1
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
2
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
3
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
4
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
5
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
6
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
7
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
8
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
9
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
10
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
11
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
13
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
14
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
15
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
16
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
17
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
18
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
19
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
20
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?

सावली निर्माण करण्यासाठी उन्हातच उभे राहावे लागते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 22:27 IST

आपल्याला आपली सावली निर्माण करायची असेल तर उन्हात उभे राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध सिने कलाकार गिरीश पांडे, मुंबई यांनी केले.

ठळक मुद्देगिरीश पांडे : लाखनी येथे ग्रेट भेट कवी कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आपल्याला आपली सावली निर्माण करायची असेल तर उन्हात उभे राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध सिने कलाकार गिरीश पांडे, मुंबई यांनी केले.राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचालित विवेकानंद सार्वजनिक वाचनालय आणि समर्थ विद्यालय, लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. शंकरराव भदाडे यांच्या स्मृति प्रीत्यर्थ ग्रेट भेट कवी आणि कलावंतांशी कार्यक्रम समर्थ विद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून कवी लोकनाथ यशवंत लाभले होते. कवी लोकनाथ यशवंत यांच्या कविता वर्ग १० ते एम. ए. पर्यतच्या अभ्यासक्रमाला असून प्रत्यक्ष कवींनी कविता सादरीकरण केले.कवी लोकनाथ यशवंत यांनी विद्यार्थ्यांना आपले ज्ञान हे व्यापक करा, लहान लहान गोष्टी मधून मार्ग काढायला शिकले पाहिजे. आपले अनुभव सांगताना ते म्हणाले, मी दहाव्या वर्गात तीनदा नापास झालो मात्र आज एम. ए. ला कविता आहे, हे केवळ माझ्यातील कविमनामुळे सिद्ध झाले. माझी कविता ही गरीब, दु:ख, दिन हे जिथे असेल, त्यांच्या उत्थानासाठी लिहिलेली आहे.सुप्रसिद्ध सिने अभिनेता गिरीश पांडे यांनी सांगितले की, वाचन, मनन आणि लेखन हे या विश्वाचे गमक आहे. मराठी बोलणे लिहिणे यातून आपले व्यक्तिमत्व कळते. मी अमिताभ बच्चन यांच्या सोबत काम करत असतांना त्यांच्या भाषिक समृद्धतेचा संस्कार अनुभवता आला. आपल्याला आपली सावली निर्माण करायची असेल तर उन्हात उभे राहणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.कार्यक्रमाला मुख्याध्यापक दा. ई. प्रधान, डॉ संजय निंबेकर, डॉ सुरेश खोब्रागडे, किशोर आळे, राजेंद्र भदाडे, विकास खेडीकर, प्रशांत ढोमने, श्रीकृष्ण पटले, शिवलाल निखाडे, अ‍ॅड कोमलदादा गभणे, अतुल भांडारकर, विजया घनमारे, सी. एम. बागडे, कारवट, देशपांडे, ग्रंथपाल पवन पडोळे यांच्यासह तालुक्यातील कवी उपस्थित होते. प्रास्ताविक अजिंक्य भांडारकर, संचालन अक्षय मासुरकर तर आभार गोवर्धन शेंडे यांनी मानले.