शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

मुलींच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 22:30 IST

मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करावे लागते ही काळाची गरज आहे, कारण आज मुलामुलींचे गुणोत्तर प्रमाणात घट झाली आहे.

ठळक मुद्देविनिता साहू : मुलीच्या जन्माचे स्वागत सप्ताहाचा समारोप

आॅनलाईन लोकमतभंडारा : मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करावे लागते ही काळाची गरज आहे, कारण आज मुलामुलींचे गुणोत्तर प्रमाणात घट झाली आहे. जिल्हयात हा अभिनव कार्यक्रम आयोजित करुन मुलींच्या जन्माचे प्रमाण आपणास वाढवावयाचे आहे, हा संदेश राज्यात सर्व दूर पर्यंत पोहचवायचा आहे. मुलीचा जन्म घेऊन आज मी या पदावर आहे. याबद्दल मला अभिमान आहे. म्हणून मुलींना जगू दया, शिकु दया व सक्षम करुन मुलीच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण निर्माण करा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले.मुलीच्या जन्माचे स्वागत या सप्ताहाचा समारोप जिल्हा परिषद सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवीशेखर धकाते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिता बढे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी कमलेश भंडारी, शिक्षणाधिकारी माध्यमिक दत्तात्रय मेंढेकर उपस्थित होते.विनिता साहू पुढे म्हणाल्या, मुलींना वाईट नजनेतून पाहू नये, असे पालकांनी मुलांना सांगावे. त्यासाठी परीवर्तन आवश्यक आहे. मुली व मूले समान आहेत ही भावना त्यांच्यात निर्माण करणे गरजेचे आहे. मुलींचे घरुन पळून जाण्याचे प्रमाण जिल्हयात फार आहे. तसेच पळवून नेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने कार्यशाळा व फिरते पोलीस स्टेशनद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. प्रेम, आदर, व जगण्याचे स्वातंत्र घरात मिळाल्यास मुली पळून जाणार नाहीत. मुलींना आपुलकीने वागविण्याची जाबाबदारी कुटुंबाने स्विकारावी. यावेळी मनोजकुमार सुर्यवंशी म्हणाले, मुलीच्या जन्माचे गुणोत्तर प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यात हा दर केवळ ९८२ एवढा आहे. मुलींच्या जन्माचे दर वाढविण्यावर भर देण्यासाठी लिंग परिक्षण चाचणी करणाऱ्यावर जिल्हा प्रशासन व जिल्हापरिषदेच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत या मोहिमेचे आपण साक्षीदार म्हणून काम करा, समाज भावना बदला. कारण प्रत्येक आईला आपले बाळं जिवापेक्षा मोठे असते. पशुपक्ष्यांना सुध्दा भावना असतात मग मानवाला का नाही. मुली मुलांपेक्षा कर्तव्यदक्ष आहेत. त्या कोणताही कार्यभार सक्षमपणे साभाळतात. मानसिकता बदला तरच मुलींचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. भंडारा जिल्हयाचे मुलींचे गुणोत्तर प्रमाणात वाढ करुन देशात नाव कमवा. मुली असलेल्या मातांचे समुपदेशन करा, असेही ते म्हणाले.यावेळी या सप्ताहानिमित्त जिल्ह्यात आयोजित विविध स्पर्धांच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन स्मिता गालफाडे यांनी केले तर आभार माधूरी माथूरकर यांनी मानले.